शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

चिर्ले लॉजिस्टिक पार्कचे पुढचे पाऊल; तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यासासह मास्टर प्लॅनची तयारी

By नारायण जाधव | Updated: March 30, 2024 20:58 IST

सिडकोच्या या प्रकल्पासाठी बेलोंडेखार हद्दीतील दादर पाडा, धुतूम, चिर्ले, गावठाण, जांभूळपाडा, वेश्वी, दिघोडे या गावांतील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत.

नवी मुंबई : जेएपीएचा वाढता विस्तार आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने गती पकडल्यानंतर या परिसरात आवश्यक असलेल्या इंटिग्रेटेड लॉजिस्टिक पार्कचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी सिडकोने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. यानुसार चिर्ले परिसरातील नियोजित ७०० ते ७५० हेक्टर क्षेत्रावरील एकात्मिक लॉजिस्टिक पार्क (Ilp)च्या विकासासाठी तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यास अहवाल आणि मास्टर प्लॅनची तयार करण्यासाठी सिडकोने पाऊल उचलले आहे.

सिडकोच्या या प्रकल्पासाठी बेलोंडेखार हद्दीतील दादर पाडा, धुतूम, चिर्ले, गावठाण, जांभूळपाडा, वेश्वी, दिघोडे या गावांतील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांच्या विरोध आहे. यामुळे दोन वर्षांपासून प्रकल्पाने आतापर्यंत पाहिजे तशी गती पकडलेली नाही. असे असतानाही सिडकोने तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यास अहवाल आणि मास्टर प्लॅनची तयारी चालविली आहे. नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी बंदराच्या मधोमध लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सिडकोने जांभूळपाडा, बेलोंडेखार व चिर्ले गावातील असंपादित जमिनी साडेबावीस टक्के योजनेंतर्गत संपादित करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता. त्याअंतर्गत आसपासच्या गावांतील ग्रामस्थांशी सतत चर्चा करून व त्यांना सिडकोला जमीन देण्यासाठी प्रोत्साहित करताना साडेबावीस टक्के योजनेचे फायदे व उलवे परिसरात भूखंड देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, हे भूखंड वाटप रखडलेले आहे. ही पार्श्वभूमी असतानाही सिडकोने आता तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यास अहवाल आणि मास्टर प्लॅनची तयारी चालविल्याने त्याविषयी काय प्रतिक्रिया उमटते, याकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.भूखंड वाटपास गती मिळण्यासाठी हे करासिडकोने प्रलंबित साडेबारा टक्के भूखंडाच्या वाटपासह चिर्ले लॉजिस्टिक पार्कसाठी कबूल केलेल्या साडेबावीस टक्के भूखंड वाटपासाठी ठाणे तालुक्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातही गावनिहाय लिंकेजची अट काढून टाकावी. रायगड जिह्यातील लिंकेज सेक्टरची अट शिथिल करून उरण व पनवेल तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना खारघर, उलवे, जासई, तळोजा, करंजाडे, रोडपाली आदी परिसरात शिल्लक असलेल्या जागेवर भूखंडाचे वाटप करावे, अशी प्रकल्पग्रस्तांची जुनी मागणी आहे. मात्र, तिलाही सिडकोकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण