शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

घणसोली मलनि:स्सारण केंद्र बंद प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; नॅटकनेक्टच्या तक्रारीवरुन शहर विकास विभागाला चौकशीचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 11:42 IST

पुरेशी भरपाई देण्याची मागणी करत, पाटील यांनी मलनि:स्सारण प्रकल्प बंद पाडला आहे.

नवी मुंबई: घणसोलीमधून प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याला ठाणे खाडीत सोडण्याच्या संदर्भात पर्यावरणवाद्यांच्या तक्रारीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर विकास विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये जलद गतीने विकास होणा-या घणसोली येथील प्रति दिन ३७ दशलक्ष लीटर (एमएलडी) क्षमतेचा मलनि:स्सारण प्रकल्प बंद पडण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. हा प्रकल्प उभारण्यात आलेला भूखंड विवादात अडकला आहे. लोकमतने याबाबत सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. 

यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट ठाणे खाडीत सोडले जात असल्याने तिथल्या जैवविविधतेवर आणि पर्यावरणावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे. मलनि:स्सारण प्रकल्प वारंवार बंद पडत आहे. तो संपूर्ण क्षमतेवर कार्यरत नसल्यामुळे बहुतांश सांडपाणी खाडीत प्रवाहित होत असल्याची स्थानिक लोकांनी तक्रार केली आहे.

या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेतील (मनपा) स्त्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार घणसोली गावाचे रहिवासी कान्हा पाटील यांनी घणसोलीतील सेक्टर १५ मध्ये असलेल्या त्यांच्या मालकीच्या भूखंडावर उभारलेल्या या प्रकल्पावर हरकत घेतली आहे. त्यांच्या आरोपानुसार सिडकोने या भूखंडाचा ताबा घेतलेला नाही.

पुरेशी भरपाई देण्याची मागणी करत, पाटील यांनी मलनि:स्सारण प्रकल्प बंद पाडला आहे.नॅटकनेक्टच्या तक्रारीला प्रतिसाद देत, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शहर विकास विभाग-१चे प्रमुख सचिव असीम गुप्ता यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. शहर विकास विभाग-१मध्ये सिडको आणि नवी मुंबई मनपा दोघांचा आंतर्भाव होतो.नवी मुंबई मनपाने प्रकल्प उघडण्यासाठी पोलिसांची देखील मदत घेतली होती, परंतु आता एक आठवड्यापेक्षा जास्त काळापासून हा प्रकल्प बंद आहे.नवी मुंबई मनपा सिडकोच्या समन्वयाने या समस्येचे समाधान काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे नवी मुंबई मनपाचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले. प्रक्रिया न केलेले पाणी खाडीत सोडण्यावर तीव्र चिंता व्यक्त करताना नॅटकनेक्टने सांगितले की यामुळे खाडीतले मासे आणि खेकडेच नाही तर संपूर्ण जलचर विविधता धोक्यात आली आहे. यामुळे जैवविविधता आणि खाडीतले मासे व खेकडे खाणा-या लोकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होणार आहे, असे कुमार म्हणाले. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा टाक्यांमध्ये केले जाणारे संग्रहण सुध्दा लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे कुमार यांनी सांगितले.

या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याची आणि लोकहितासाठी नवी मुंबई मनपाला आपले काम यथायोग्य पध्दतीने करु देण्याची नॅटकनेक्टने सिडकोला विनंती केली आहे. “२१व्या शतकातील शहरामध्ये अशाप्रकारची समस्या कायम स्वरुपी असता कामा नये” असे ते म्हणाले.

वनशक्ती एनजीओच्या सागरशक्ती या समुद्री शाखेचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले की, प्रक्रिया न केलेले सांडपाणी खाडीतील प्राणी व वनस्पतींसाठी विनाशक आहे. खरेतर मुंबईमध्ये सुध्दा ब-याच ठिकाणी खाडीत सांडपाणी थेट प्रवाहित केले जाते. परंतु अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नाहीत अशी खंत पवार यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदे