शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

घणसोली मलनि:स्सारण केंद्र बंद प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; नॅटकनेक्टच्या तक्रारीवरुन शहर विकास विभागाला चौकशीचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 11:42 IST

पुरेशी भरपाई देण्याची मागणी करत, पाटील यांनी मलनि:स्सारण प्रकल्प बंद पाडला आहे.

नवी मुंबई: घणसोलीमधून प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याला ठाणे खाडीत सोडण्याच्या संदर्भात पर्यावरणवाद्यांच्या तक्रारीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर विकास विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये जलद गतीने विकास होणा-या घणसोली येथील प्रति दिन ३७ दशलक्ष लीटर (एमएलडी) क्षमतेचा मलनि:स्सारण प्रकल्प बंद पडण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. हा प्रकल्प उभारण्यात आलेला भूखंड विवादात अडकला आहे. लोकमतने याबाबत सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. 

यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट ठाणे खाडीत सोडले जात असल्याने तिथल्या जैवविविधतेवर आणि पर्यावरणावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे. मलनि:स्सारण प्रकल्प वारंवार बंद पडत आहे. तो संपूर्ण क्षमतेवर कार्यरत नसल्यामुळे बहुतांश सांडपाणी खाडीत प्रवाहित होत असल्याची स्थानिक लोकांनी तक्रार केली आहे.

या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेतील (मनपा) स्त्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार घणसोली गावाचे रहिवासी कान्हा पाटील यांनी घणसोलीतील सेक्टर १५ मध्ये असलेल्या त्यांच्या मालकीच्या भूखंडावर उभारलेल्या या प्रकल्पावर हरकत घेतली आहे. त्यांच्या आरोपानुसार सिडकोने या भूखंडाचा ताबा घेतलेला नाही.

पुरेशी भरपाई देण्याची मागणी करत, पाटील यांनी मलनि:स्सारण प्रकल्प बंद पाडला आहे.नॅटकनेक्टच्या तक्रारीला प्रतिसाद देत, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शहर विकास विभाग-१चे प्रमुख सचिव असीम गुप्ता यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. शहर विकास विभाग-१मध्ये सिडको आणि नवी मुंबई मनपा दोघांचा आंतर्भाव होतो.नवी मुंबई मनपाने प्रकल्प उघडण्यासाठी पोलिसांची देखील मदत घेतली होती, परंतु आता एक आठवड्यापेक्षा जास्त काळापासून हा प्रकल्प बंद आहे.नवी मुंबई मनपा सिडकोच्या समन्वयाने या समस्येचे समाधान काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे नवी मुंबई मनपाचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले. प्रक्रिया न केलेले पाणी खाडीत सोडण्यावर तीव्र चिंता व्यक्त करताना नॅटकनेक्टने सांगितले की यामुळे खाडीतले मासे आणि खेकडेच नाही तर संपूर्ण जलचर विविधता धोक्यात आली आहे. यामुळे जैवविविधता आणि खाडीतले मासे व खेकडे खाणा-या लोकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होणार आहे, असे कुमार म्हणाले. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा टाक्यांमध्ये केले जाणारे संग्रहण सुध्दा लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे कुमार यांनी सांगितले.

या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याची आणि लोकहितासाठी नवी मुंबई मनपाला आपले काम यथायोग्य पध्दतीने करु देण्याची नॅटकनेक्टने सिडकोला विनंती केली आहे. “२१व्या शतकातील शहरामध्ये अशाप्रकारची समस्या कायम स्वरुपी असता कामा नये” असे ते म्हणाले.

वनशक्ती एनजीओच्या सागरशक्ती या समुद्री शाखेचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले की, प्रक्रिया न केलेले सांडपाणी खाडीतील प्राणी व वनस्पतींसाठी विनाशक आहे. खरेतर मुंबईमध्ये सुध्दा ब-याच ठिकाणी खाडीत सांडपाणी थेट प्रवाहित केले जाते. परंतु अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नाहीत अशी खंत पवार यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदे