शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी नाल्यात केमिकलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 03:51 IST

दुर्गंधीने नागरिक हैराण : प्रक्रिया न करताच सांडपाणी नाल्यात

नवी मुंबई : एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया न करताच कोपरी नाल्यात सोडण्यात येत आहे. दूषित पाण्यांमुळे परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरू लागली असून, श्वास घेणेही अशक्य झाले आहे. प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कंपन्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पावणे येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. नेरुळ, शिरवणे परिसरातील पाणी तुर्भेमधील साठवण ठाकीत साठवून ते पाइपद्वारे प्रक्रिया केंद्रामध्ये घेऊन जाणे बंधनकारक आहे; परंतु अनेक वेळा तुर्भेमधील पाणी जुईनगरच्या नाल्यात सोडले जाते व पावणे परिसरातील सांडपाणी कोपरीच्या नाल्यात सोडून दिले जात आहे. काही दिवसांपासून कोपरी नाल्यातून केमिकलमिश्रीत पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे कोपरखैरणे सेक्टर ११, बालाजी गार्डन ते कोपरखैरणे होर्डिंग पाँडपर्यंत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. सेक्टर ११मध्ये नाल्याच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे; परंतु दुर्गंधीमुळे या परिसरातून जाणे अशक्य होऊ लागले आहे. एमआयडीसीमधील प्रदूषण पसरविणाºया कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी करू लागले आहेत.महापालिकेच्या पर्यावरण समितीच्या सभापती दिव्या वैभव गायकवाड यांनी एक वर्षापासून सातत्याने प्रदूषण करणाºया कंपन्यांविरोधात आवाज उठविला आहे. महापालिका आयुक्त, एमआयडीसी अधिकारी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र हाताळणारे व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. प्रदूषण पसरविणाºया कंपन्यांची यादीही देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. आ. संदीप नाईक यांनीही दौरा करून एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळ व्यवस्थापनाला धारेवर धरले होते. याविषयी विधानसभेतही आवाज उठविला होता. काही दिवस दूषित पाणी खाडीत टाकणे बंद झाले होते; परंतु आता पुन्हा मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जात असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.प्रदूषण करणाºया कंपन्यांविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठविला आहे. कारखान्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. ज्या कंपन्या दूषित पाणी नाल्यात सोडत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.- दिव्या वैभव गायकवाड, सभापती पर्यावरण समिती

टॅग्स :environmentवातावरण