शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

कोपरी नाल्यात केमिकलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 03:51 IST

दुर्गंधीने नागरिक हैराण : प्रक्रिया न करताच सांडपाणी नाल्यात

नवी मुंबई : एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया न करताच कोपरी नाल्यात सोडण्यात येत आहे. दूषित पाण्यांमुळे परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरू लागली असून, श्वास घेणेही अशक्य झाले आहे. प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कंपन्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पावणे येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. नेरुळ, शिरवणे परिसरातील पाणी तुर्भेमधील साठवण ठाकीत साठवून ते पाइपद्वारे प्रक्रिया केंद्रामध्ये घेऊन जाणे बंधनकारक आहे; परंतु अनेक वेळा तुर्भेमधील पाणी जुईनगरच्या नाल्यात सोडले जाते व पावणे परिसरातील सांडपाणी कोपरीच्या नाल्यात सोडून दिले जात आहे. काही दिवसांपासून कोपरी नाल्यातून केमिकलमिश्रीत पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे कोपरखैरणे सेक्टर ११, बालाजी गार्डन ते कोपरखैरणे होर्डिंग पाँडपर्यंत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. सेक्टर ११मध्ये नाल्याच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे; परंतु दुर्गंधीमुळे या परिसरातून जाणे अशक्य होऊ लागले आहे. एमआयडीसीमधील प्रदूषण पसरविणाºया कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी करू लागले आहेत.महापालिकेच्या पर्यावरण समितीच्या सभापती दिव्या वैभव गायकवाड यांनी एक वर्षापासून सातत्याने प्रदूषण करणाºया कंपन्यांविरोधात आवाज उठविला आहे. महापालिका आयुक्त, एमआयडीसी अधिकारी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र हाताळणारे व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. प्रदूषण पसरविणाºया कंपन्यांची यादीही देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. आ. संदीप नाईक यांनीही दौरा करून एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळ व्यवस्थापनाला धारेवर धरले होते. याविषयी विधानसभेतही आवाज उठविला होता. काही दिवस दूषित पाणी खाडीत टाकणे बंद झाले होते; परंतु आता पुन्हा मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जात असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.प्रदूषण करणाºया कंपन्यांविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठविला आहे. कारखान्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. ज्या कंपन्या दूषित पाणी नाल्यात सोडत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.- दिव्या वैभव गायकवाड, सभापती पर्यावरण समिती

टॅग्स :environmentवातावरण