शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी नाल्यात केमिकलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 03:51 IST

दुर्गंधीने नागरिक हैराण : प्रक्रिया न करताच सांडपाणी नाल्यात

नवी मुंबई : एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया न करताच कोपरी नाल्यात सोडण्यात येत आहे. दूषित पाण्यांमुळे परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरू लागली असून, श्वास घेणेही अशक्य झाले आहे. प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कंपन्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पावणे येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. नेरुळ, शिरवणे परिसरातील पाणी तुर्भेमधील साठवण ठाकीत साठवून ते पाइपद्वारे प्रक्रिया केंद्रामध्ये घेऊन जाणे बंधनकारक आहे; परंतु अनेक वेळा तुर्भेमधील पाणी जुईनगरच्या नाल्यात सोडले जाते व पावणे परिसरातील सांडपाणी कोपरीच्या नाल्यात सोडून दिले जात आहे. काही दिवसांपासून कोपरी नाल्यातून केमिकलमिश्रीत पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे कोपरखैरणे सेक्टर ११, बालाजी गार्डन ते कोपरखैरणे होर्डिंग पाँडपर्यंत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. सेक्टर ११मध्ये नाल्याच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे; परंतु दुर्गंधीमुळे या परिसरातून जाणे अशक्य होऊ लागले आहे. एमआयडीसीमधील प्रदूषण पसरविणाºया कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी करू लागले आहेत.महापालिकेच्या पर्यावरण समितीच्या सभापती दिव्या वैभव गायकवाड यांनी एक वर्षापासून सातत्याने प्रदूषण करणाºया कंपन्यांविरोधात आवाज उठविला आहे. महापालिका आयुक्त, एमआयडीसी अधिकारी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र हाताळणारे व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. प्रदूषण पसरविणाºया कंपन्यांची यादीही देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. आ. संदीप नाईक यांनीही दौरा करून एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळ व्यवस्थापनाला धारेवर धरले होते. याविषयी विधानसभेतही आवाज उठविला होता. काही दिवस दूषित पाणी खाडीत टाकणे बंद झाले होते; परंतु आता पुन्हा मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जात असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.प्रदूषण करणाºया कंपन्यांविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठविला आहे. कारखान्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. ज्या कंपन्या दूषित पाणी नाल्यात सोडत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.- दिव्या वैभव गायकवाड, सभापती पर्यावरण समिती

टॅग्स :environmentवातावरण