शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूरच्या टोळक्याची नेरूळमध्ये हाणामारी; दोघांना अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 5, 2024 17:40 IST

आईचे पैसे चोरल्याचा संशयातून घेणार होते जीव 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नेरुळ येथे एका तरुणावर चार जणांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती. यावेळी पार्किंग कर्मचारी व इतरांच्या मदतीने जखमीचे प्राण वाचले होते तर हल्ला करणाऱ्या एकाला पकडले होते. हे सर्वजण चेंबूरचे असून केवळ हल्ल्याच्या उद्देशाने एकाचा पाठलाग करत रेल्वेने नेरूळला आले होते. 

नेरुळ स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये शनिवारी रात्री हि घटना घडली. त्याठिकाणी एका तरुणावर काहीजण कोयता, दांडके व दगडाने हल्ला करत होते. यामध्ये जखमी तरुण बचावासाठी धावत एका वाहनाखाली घुसला असताना देखील हल्लेखोर त्याच्यावर वार करत होते. हा प्रकार पाहून तिथल्या पे अँड पार्किंगमध्ये काम करणाऱ्या मुकीम उस्मानी याने आरडा ओरडा करत सदर तरुणाच्या बचावासाठी धाव घेतली. त्याचवेळी इतरही नागरिक धावून आले असता हल्लेखोर पळू लागले. यामुळे मुकीम याने पळणाऱ्या एकाच्या दिशेने बांबू फेकून त्याला पाडून पकडून ठेवले. या घटनेनंतर पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल करून पकडलेल्या हल्लेखोराला ताब्यात घेतले होते. 

अधिक चौकशीत जखमीचे नाव हर्ष खरे (२०) असून तो व हल्ला करणारे चेंबूरचे असल्याचे समोर आले. हर्ष याने आपल्या आईचे पैसे चोरून तिची छेड काढल्याचा साहिल परघरमोर (२२) याचा आरोप आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील आहे. मात्र या प्रकरणात साहिल हा हर्षचा कायमचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो संधीच्या शोधात असताना शनिवारी रात्री हर्ष हा पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वेत चढताना दिसला. याचवेळी साहिल देखील त्याच्या साथीदारांसह बॅगेत कोयता घेऊन त्याच रेल्वेतुन त्याच्या पाठोपाठ आला होता. नेरुळ स्थानकात हर्ष उतरून स्थानकाबाहेर निघताच साहिल व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे थोडक्यात हर्षचे प्राण वाचले. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असता एक अल्पवयीन असल्याचे समोर आले. उर्वरित साहिल व इतर एकाला अटक केली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले. 

रेल्वेतून आणली हत्यारे. 

हर्षच्या मागावर आलेल्या साहिल व साथीदारांनी बॅगेत हत्यारांसह रेल्वेतून प्रवास करत नेरुळ गाठले. यापूर्वी पण सीबीडी येथे मुलांच्या दोन टोळ्यात झालेल्या हाणामारीत मानखुर्द परिसरातील मुलांनी हत्यारांसह रेल्वेने सीबीडी गाठले होते. यावरून रेल्वे प्रवास्यांचा प्रवास सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी