शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

चेंबूरच्या टोळक्याची नेरूळमध्ये हाणामारी; दोघांना अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 5, 2024 17:40 IST

आईचे पैसे चोरल्याचा संशयातून घेणार होते जीव 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नेरुळ येथे एका तरुणावर चार जणांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती. यावेळी पार्किंग कर्मचारी व इतरांच्या मदतीने जखमीचे प्राण वाचले होते तर हल्ला करणाऱ्या एकाला पकडले होते. हे सर्वजण चेंबूरचे असून केवळ हल्ल्याच्या उद्देशाने एकाचा पाठलाग करत रेल्वेने नेरूळला आले होते. 

नेरुळ स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये शनिवारी रात्री हि घटना घडली. त्याठिकाणी एका तरुणावर काहीजण कोयता, दांडके व दगडाने हल्ला करत होते. यामध्ये जखमी तरुण बचावासाठी धावत एका वाहनाखाली घुसला असताना देखील हल्लेखोर त्याच्यावर वार करत होते. हा प्रकार पाहून तिथल्या पे अँड पार्किंगमध्ये काम करणाऱ्या मुकीम उस्मानी याने आरडा ओरडा करत सदर तरुणाच्या बचावासाठी धाव घेतली. त्याचवेळी इतरही नागरिक धावून आले असता हल्लेखोर पळू लागले. यामुळे मुकीम याने पळणाऱ्या एकाच्या दिशेने बांबू फेकून त्याला पाडून पकडून ठेवले. या घटनेनंतर पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल करून पकडलेल्या हल्लेखोराला ताब्यात घेतले होते. 

अधिक चौकशीत जखमीचे नाव हर्ष खरे (२०) असून तो व हल्ला करणारे चेंबूरचे असल्याचे समोर आले. हर्ष याने आपल्या आईचे पैसे चोरून तिची छेड काढल्याचा साहिल परघरमोर (२२) याचा आरोप आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील आहे. मात्र या प्रकरणात साहिल हा हर्षचा कायमचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो संधीच्या शोधात असताना शनिवारी रात्री हर्ष हा पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वेत चढताना दिसला. याचवेळी साहिल देखील त्याच्या साथीदारांसह बॅगेत कोयता घेऊन त्याच रेल्वेतुन त्याच्या पाठोपाठ आला होता. नेरुळ स्थानकात हर्ष उतरून स्थानकाबाहेर निघताच साहिल व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे थोडक्यात हर्षचे प्राण वाचले. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असता एक अल्पवयीन असल्याचे समोर आले. उर्वरित साहिल व इतर एकाला अटक केली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले. 

रेल्वेतून आणली हत्यारे. 

हर्षच्या मागावर आलेल्या साहिल व साथीदारांनी बॅगेत हत्यारांसह रेल्वेतून प्रवास करत नेरुळ गाठले. यापूर्वी पण सीबीडी येथे मुलांच्या दोन टोळ्यात झालेल्या हाणामारीत मानखुर्द परिसरातील मुलांनी हत्यारांसह रेल्वेने सीबीडी गाठले होते. यावरून रेल्वे प्रवास्यांचा प्रवास सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी