शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या वेळेमध्ये होणार बदल!

By admin | Updated: May 10, 2016 02:13 IST

एकाच वेळी सर्व शाळा भरत व सुटत असल्यामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत.

नवी मुंबई : एकाच वेळी सर्व शाळा भरत व सुटत असल्यामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. याकरिता वाशी व कोपरखैरणे विभागातील शाळा प्रशासनांची सोमवारी बैठक घेण्यात आली. टप्प्याटप्प्याने आयुक्तालय क्षेत्रातील शाळा व्यवस्थापनांच्या बैठका घेऊन ज्या विभागात जास्त शाळा आहेत, त्यांच्या वेळेमध्ये काहीसा बदल करण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न आहे. वाढत्या शाळा महाविद्यालयांमुळे नवी मुंबई हे एज्युकेशन हब बनत चालले आहे. महापालिकेसह सिडकोकडून शाळांसाठी मिळणाऱ्या सुविधांमुळे अनेक शैक्षणिक संस्थांनी नवी मुंबईत जाळे पसरवले आहे. त्यानुसार पनवेल, वाशी, कोपरखैरणे यासह इतर अनेक विभागांमध्ये मोठ्या संख्येने शाळा व महाविद्यालये आहेत. या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या शाळांकडून प्राथमिक व माध्यमिक वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूलबस चालवल्या जात आहेत, तर महाविद्यालयीन तरुणांकडून खासगी कार व मोटारसायकलींचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. यामुळे सर्व शाळा-महाविद्यालये भरण्याची व सुटण्याची वेळ समान असल्यामुळे ज्या विभागात ज्यास्त शाळा महाविद्यालये आहेत, त्या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसत आहे. परिणामी अशा ठिकाणच्या वाहतूककोंडीच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त होत आहे. यानुसार वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून ज्या विभागात अनेक शाळा महाविद्यालये आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. याकरिता वाशी येथे सोमवारी शाळा व्यवस्थापनांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये वाशी व कोपरखैरणे विभागातील २६ शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापनांनी आपापसात संगनमत करून शाळांच्या वेळांमध्ये १० ते १५ मिनिटांचा फरक ठेवण्याचे सुचित केल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी सांगितले. सध्या सर्वच शाळा सकाळी ७ ला भरत असून दुपारी १२ ला सुटतात. यामुळे सर्व शाळांच्या स्कूलबस किंवा विद्यार्थ्यांची वाहने एकाच वेळी रस्त्यावर निघून वाहतूककोंडी होते. अशावेळी शाळा व्यवस्थापनांनी त्यांच्या वेळेत १० ते १५ मिनिटांचा फरक ठेवल्यास एकाच वेळी रस्त्यावर निघणाऱ्या शालेय वाहनांचे विभाजन होऊन वाहतूककोंडी टळू शकेल, असा विश्वासही उपायुक्त साळवे यांनी व्यक्त केला आहे. हीच संकल्पना संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात ज्या विभागात जास्त शाळा असल्याने वाहतूककोंडी होत आहे, त्या ठिकाणी राबवण्याचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. याकरिता संबंधित शाळा प्रशासनांच्या बैठका घेऊन जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळांच्या सुधारित वेळा निश्चित केल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)