शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

गावांविषयी सावध भूमिका

By admin | Updated: July 21, 2015 04:16 IST

ठाणे व कल्याण परिसरातील १४ गावे पुन्हा सहभागी करून घेण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. हा परिसर पालिकेत

नवी मुंबई : ठाणे व कल्याण परिसरातील १४ गावे पुन्हा सहभागी करून घेण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. हा परिसर पालिकेत सहभागी करून देण्यापूर्वी अतिक्रमणे हटवावीत, भौगोलिक समानता येण्यासाठी भुयारी मार्ग तयार करून द्यावा व विकासासाठी सरकारने ५०० कोटी रुपये द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडको क्षेत्रातील १९ व एमएमआरडीए क्षेत्रातील ठाणे व कल्याण परिसरातील १५ गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. १५ पैकी १४ गावांनी नेहमीच महापालिकेस विरोध केला. निवडणुकांवरही बहिष्कार टाकला होता. एका नगरसेवकाची हत्या झाली असून काही लोकप्रतिनिधींची घरे जाळण्यात आली होती. १४ गाव संघर्ष समितीने गावे पालिकेतून वगळण्यासाठी आंदोलन सुरू केले. अखेर ८ जून २००७ मध्ये ही गावे पालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आली. आता ८ वर्षांनंतर पुन्हा ही गावे महापालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. याविषयी पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही पडसाद उमटले आहेत. नगरसेवक रमेश डोळे यांनी या गावांना सहभागी करून घ्यावे. तेथील ग्रामसभेचेही तसे मत असल्याचा ठराव मांडला होता. या विषयावर मत व्यक्त करताना काही नगरसेवकांनी १४ गावे त्वरित सहभागी करून घ्यावीत. त्यामुळे पालिकेची हद्द वाढेल. तेथील जमीन महापालिकेस मिळून महसूल वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली. घाईगडबडीत निर्णय घेण्यापूर्वी ग्रामस्थांची मते जाणून घ्यावीत, असेही मत नगरसेवकांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी चौदा गावांविषयी पूर्णपणे सावध भूमिका घेतली आहे. पालिकेच्या स्थापनेनंतर ही गावे महापालिकेत आली. त्या ठिकाणी जवळपास ७८ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. परंतु रहिवाशांच्या विरोधामुळे तो भाग पालिकेतून वगळावा लागला. आता पुन्हा ही गावे नवी मुंबईकडे द्यायची असल्यास सरकारने पालिकेला मदत करावी. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. सर्व अतिक्रमणे सर्वप्रथम हटवण्यात यावीत. नवी मुंबई व परिसराला भौगोलिकदृष्ट्या एकत्र आणण्यासाठी डोंगर पोखरून भुयारी मार्ग तयार करण्यात यावा. या परिसरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी किमान ५०० कोटी रुपये महापालिकेस मिळावे अशी मागणीही करण्यात आली. घाईगडबडीने व पुन्हा महापालिकेस त्रास होईल असा निर्णय घेण्यात येवू नये, अशी भूमिकाही काही नगरसेवकांनी व्यक्त केली.