शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पदपथावरील व्यवसाय धोकादायक; नवी मुंबईसह पनवेलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:42 IST

नवी मुंबईतील विविध नोडमधील पदपथ आणि मार्जिन स्पेसवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपले बस्तान ठोकले आहे.

नवी मुंबई : सुनियोजित शहरात पदपथांवरील खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यास संबंधित प्रशासनाला अपयश आले आहे. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच आक्षेप घेतला गेला आहे. त्याशिवाय हे पदार्थ बनविताना अवलंब करण्यात येणाºया धोकादायक प्रणालीलाही वारंवार विरोध केला जात आहे; परंतु त्यानंतरही पदपथांवरील खाद्यपदार्थ विक्रीचा हा धोकादायक व्यवसाय सुरूच असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईसह पनवेल शहरातील पदपथ तसेच स्थानक परिसरात अशाप्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

शहरात सध्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: नागरी आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर निर्बंध घालताना संबंधित प्रशासनाला अवघड होऊन बसले आहे. पदपथावर वडापाव, पाणीपुरी, रगडा पॅटीस, सॅण्डविच, इडली-डोसा, छोले भटोरे तसेच विविध शीतपेयांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यास हानिकारक असल्याचे वारंवार सांगितले जाते. नागरिकांनी असे पदार्थ खाणे टाळावे, यासंदर्भात आरोग्य विभागाकडून नियमित आवाहन केले जाते; परंतु त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.

शहरवासीयांची ही मानसिकता पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. खाद्यपदार्थ बनविण्यची जागा अत्यंत घाणेरडी असते, त्यासाठी वापरली जाणारी भांडीसुद्धा अस्वच्छ असतात. भांडे धुण्यासाठी आणि खाद्यपदार्थ बनविण्यासाठी अनेक ठिकाणी सुलभ शौचालयाच्या नळाचे पाणी वापरले जाते. अनेक प्रकरणातून ही बाब समोर आली आहे. ठाण्यातील एका पाणीपुरी विक्रेत्याने केलेला प्रकार तर जगजाहीर आहे. ही वस्तुस्थिती असतानाही नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रात पदपथासह, मार्जिनल स्पेस आणि मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

नवी मुंबईतील विविध नोडमधील पदपथ आणि मार्जिन स्पेसवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपले बस्तान ठोकले आहे. विशेषत: वाशी, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली परिसरात अशाप्रकारच्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. एपीएमसी मार्केटमध्ये कृषी मालाचे दररोज शेकडो ट्रक येतात, त्यामुळे मार्केट आणि परिसरात २४ तास रेलचेल असते. विशेषत: मध्यरात्रीनंतर खऱ्या अर्थाने बाजार तेजीत येतो. मार्केटमध्ये व्यापारी, ट्रकचालक, क्लिनर, कर्मचारी तसेच माथाडी व मापाडी आदीचा मोठ्या प्रमाणात वावर सुरू होतो. त्यामुळे बाजार आवारात ठिकठिकाणी खाद्यपदार्थ आणि चहाचे ठेले लागले आहेत. विशेष म्हणजे, खाद्यपदार्थ बनविण्यासाठी गॅसच्या शेगडीचा वापर केला जातो. सतत धगधगणाºया या शेगडीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई