शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

पदपथावरील व्यवसाय धोकादायक; नवी मुंबईसह पनवेलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:42 IST

नवी मुंबईतील विविध नोडमधील पदपथ आणि मार्जिन स्पेसवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपले बस्तान ठोकले आहे.

नवी मुंबई : सुनियोजित शहरात पदपथांवरील खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यास संबंधित प्रशासनाला अपयश आले आहे. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच आक्षेप घेतला गेला आहे. त्याशिवाय हे पदार्थ बनविताना अवलंब करण्यात येणाºया धोकादायक प्रणालीलाही वारंवार विरोध केला जात आहे; परंतु त्यानंतरही पदपथांवरील खाद्यपदार्थ विक्रीचा हा धोकादायक व्यवसाय सुरूच असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईसह पनवेल शहरातील पदपथ तसेच स्थानक परिसरात अशाप्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

शहरात सध्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: नागरी आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर निर्बंध घालताना संबंधित प्रशासनाला अवघड होऊन बसले आहे. पदपथावर वडापाव, पाणीपुरी, रगडा पॅटीस, सॅण्डविच, इडली-डोसा, छोले भटोरे तसेच विविध शीतपेयांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यास हानिकारक असल्याचे वारंवार सांगितले जाते. नागरिकांनी असे पदार्थ खाणे टाळावे, यासंदर्भात आरोग्य विभागाकडून नियमित आवाहन केले जाते; परंतु त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.

शहरवासीयांची ही मानसिकता पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. खाद्यपदार्थ बनविण्यची जागा अत्यंत घाणेरडी असते, त्यासाठी वापरली जाणारी भांडीसुद्धा अस्वच्छ असतात. भांडे धुण्यासाठी आणि खाद्यपदार्थ बनविण्यासाठी अनेक ठिकाणी सुलभ शौचालयाच्या नळाचे पाणी वापरले जाते. अनेक प्रकरणातून ही बाब समोर आली आहे. ठाण्यातील एका पाणीपुरी विक्रेत्याने केलेला प्रकार तर जगजाहीर आहे. ही वस्तुस्थिती असतानाही नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रात पदपथासह, मार्जिनल स्पेस आणि मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

नवी मुंबईतील विविध नोडमधील पदपथ आणि मार्जिन स्पेसवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपले बस्तान ठोकले आहे. विशेषत: वाशी, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली परिसरात अशाप्रकारच्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. एपीएमसी मार्केटमध्ये कृषी मालाचे दररोज शेकडो ट्रक येतात, त्यामुळे मार्केट आणि परिसरात २४ तास रेलचेल असते. विशेषत: मध्यरात्रीनंतर खऱ्या अर्थाने बाजार तेजीत येतो. मार्केटमध्ये व्यापारी, ट्रकचालक, क्लिनर, कर्मचारी तसेच माथाडी व मापाडी आदीचा मोठ्या प्रमाणात वावर सुरू होतो. त्यामुळे बाजार आवारात ठिकठिकाणी खाद्यपदार्थ आणि चहाचे ठेले लागले आहेत. विशेष म्हणजे, खाद्यपदार्थ बनविण्यासाठी गॅसच्या शेगडीचा वापर केला जातो. सतत धगधगणाºया या शेगडीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई