शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पदपथावरील व्यवसाय धोकादायक; नवी मुंबईसह पनवेलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:42 IST

नवी मुंबईतील विविध नोडमधील पदपथ आणि मार्जिन स्पेसवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपले बस्तान ठोकले आहे.

नवी मुंबई : सुनियोजित शहरात पदपथांवरील खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यास संबंधित प्रशासनाला अपयश आले आहे. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच आक्षेप घेतला गेला आहे. त्याशिवाय हे पदार्थ बनविताना अवलंब करण्यात येणाºया धोकादायक प्रणालीलाही वारंवार विरोध केला जात आहे; परंतु त्यानंतरही पदपथांवरील खाद्यपदार्थ विक्रीचा हा धोकादायक व्यवसाय सुरूच असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईसह पनवेल शहरातील पदपथ तसेच स्थानक परिसरात अशाप्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

शहरात सध्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: नागरी आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर निर्बंध घालताना संबंधित प्रशासनाला अवघड होऊन बसले आहे. पदपथावर वडापाव, पाणीपुरी, रगडा पॅटीस, सॅण्डविच, इडली-डोसा, छोले भटोरे तसेच विविध शीतपेयांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यास हानिकारक असल्याचे वारंवार सांगितले जाते. नागरिकांनी असे पदार्थ खाणे टाळावे, यासंदर्भात आरोग्य विभागाकडून नियमित आवाहन केले जाते; परंतु त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.

शहरवासीयांची ही मानसिकता पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. खाद्यपदार्थ बनविण्यची जागा अत्यंत घाणेरडी असते, त्यासाठी वापरली जाणारी भांडीसुद्धा अस्वच्छ असतात. भांडे धुण्यासाठी आणि खाद्यपदार्थ बनविण्यासाठी अनेक ठिकाणी सुलभ शौचालयाच्या नळाचे पाणी वापरले जाते. अनेक प्रकरणातून ही बाब समोर आली आहे. ठाण्यातील एका पाणीपुरी विक्रेत्याने केलेला प्रकार तर जगजाहीर आहे. ही वस्तुस्थिती असतानाही नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रात पदपथासह, मार्जिनल स्पेस आणि मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

नवी मुंबईतील विविध नोडमधील पदपथ आणि मार्जिन स्पेसवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपले बस्तान ठोकले आहे. विशेषत: वाशी, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली परिसरात अशाप्रकारच्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. एपीएमसी मार्केटमध्ये कृषी मालाचे दररोज शेकडो ट्रक येतात, त्यामुळे मार्केट आणि परिसरात २४ तास रेलचेल असते. विशेषत: मध्यरात्रीनंतर खऱ्या अर्थाने बाजार तेजीत येतो. मार्केटमध्ये व्यापारी, ट्रकचालक, क्लिनर, कर्मचारी तसेच माथाडी व मापाडी आदीचा मोठ्या प्रमाणात वावर सुरू होतो. त्यामुळे बाजार आवारात ठिकठिकाणी खाद्यपदार्थ आणि चहाचे ठेले लागले आहेत. विशेष म्हणजे, खाद्यपदार्थ बनविण्यासाठी गॅसच्या शेगडीचा वापर केला जातो. सतत धगधगणाºया या शेगडीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई