शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

पदपथावरील व्यवसाय धोकादायक; नवी मुंबईसह पनवेलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:42 IST

नवी मुंबईतील विविध नोडमधील पदपथ आणि मार्जिन स्पेसवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपले बस्तान ठोकले आहे.

नवी मुंबई : सुनियोजित शहरात पदपथांवरील खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यास संबंधित प्रशासनाला अपयश आले आहे. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच आक्षेप घेतला गेला आहे. त्याशिवाय हे पदार्थ बनविताना अवलंब करण्यात येणाºया धोकादायक प्रणालीलाही वारंवार विरोध केला जात आहे; परंतु त्यानंतरही पदपथांवरील खाद्यपदार्थ विक्रीचा हा धोकादायक व्यवसाय सुरूच असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईसह पनवेल शहरातील पदपथ तसेच स्थानक परिसरात अशाप्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

शहरात सध्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: नागरी आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर निर्बंध घालताना संबंधित प्रशासनाला अवघड होऊन बसले आहे. पदपथावर वडापाव, पाणीपुरी, रगडा पॅटीस, सॅण्डविच, इडली-डोसा, छोले भटोरे तसेच विविध शीतपेयांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यास हानिकारक असल्याचे वारंवार सांगितले जाते. नागरिकांनी असे पदार्थ खाणे टाळावे, यासंदर्भात आरोग्य विभागाकडून नियमित आवाहन केले जाते; परंतु त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.

शहरवासीयांची ही मानसिकता पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. खाद्यपदार्थ बनविण्यची जागा अत्यंत घाणेरडी असते, त्यासाठी वापरली जाणारी भांडीसुद्धा अस्वच्छ असतात. भांडे धुण्यासाठी आणि खाद्यपदार्थ बनविण्यासाठी अनेक ठिकाणी सुलभ शौचालयाच्या नळाचे पाणी वापरले जाते. अनेक प्रकरणातून ही बाब समोर आली आहे. ठाण्यातील एका पाणीपुरी विक्रेत्याने केलेला प्रकार तर जगजाहीर आहे. ही वस्तुस्थिती असतानाही नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रात पदपथासह, मार्जिनल स्पेस आणि मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

नवी मुंबईतील विविध नोडमधील पदपथ आणि मार्जिन स्पेसवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपले बस्तान ठोकले आहे. विशेषत: वाशी, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली परिसरात अशाप्रकारच्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. एपीएमसी मार्केटमध्ये कृषी मालाचे दररोज शेकडो ट्रक येतात, त्यामुळे मार्केट आणि परिसरात २४ तास रेलचेल असते. विशेषत: मध्यरात्रीनंतर खऱ्या अर्थाने बाजार तेजीत येतो. मार्केटमध्ये व्यापारी, ट्रकचालक, क्लिनर, कर्मचारी तसेच माथाडी व मापाडी आदीचा मोठ्या प्रमाणात वावर सुरू होतो. त्यामुळे बाजार आवारात ठिकठिकाणी खाद्यपदार्थ आणि चहाचे ठेले लागले आहेत. विशेष म्हणजे, खाद्यपदार्थ बनविण्यासाठी गॅसच्या शेगडीचा वापर केला जातो. सतत धगधगणाºया या शेगडीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई