शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

‘त्या’ चौदा गावांचा भार नवी मुंबई महापालिकेवर नको! गणेश नाईक यांची भूमिका 

By कमलाकर कांबळे | Updated: September 1, 2024 21:18 IST

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कमलाकर कांबळे,  लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांनी शासनाच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. या गावांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. खर्चाचा हा भार नवी मुंबई महापालिकेवर नको, अशी भूमिका आमदार नाईक यांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यास आपला विरोध कधीच नव्हता आणि आजही नाही, परंतु त्यामुळे नवी मुंबईकरांवर अन्याय होणार असेल, तर गप्प बसणार नाही. कारण, या गावांचा अनियंत्रित विस्तार झाला आहे. पायाभूत सुविधांचा बोजवरा उडाला आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उभारली आहेत. नवी मुंबईत ही गावे समाविष्ट केल्यास महापालिकेवर आर्थिक भार पडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीए किंवा सिडकोच्या माध्यमातून या गावांचा विकास करावा. नवी मुंबईकरांच्या कररूपी पैसा येथील पायाभूत सुविधांवर खर्च होऊ देणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनाही भूमिका कळविली आहे.

- गावांच्या समावेशासाठी तीन अटी

भौगोलिकदृष्ट्या या चौदा गावांचा नवी मुंबईशी फारसा संबध नाही. असे असतानाही या गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्याअगोदर पारसिक डोंगरातून एक बोगदा काढून चौदा गावांना जोडणारा रस्ता तयार करावा. चौदा गावांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ७,००० कोटींचा खर्च लागणार आहे. याचा खर्च एमएमआरडीए, सिडको किंवा इतर प्राधिकरणाला करण्यास सांगावे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना आमदार नाईक यांनी केली आहे.

त्या चौदा गावांचा अनियंत्रित विस्तार झाला आहे. पुढील काही काळात येथील लोकसंख्या वीस लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. मागील पाच वर्षांत अनियंत्रित व अनियोजित खर्चामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. अशा परिस्थितीत ही चौदा गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट करून नवी मुंबईकरांवर अन्याय होऊ देणार नाही. - गणेश नाईक, आमदार, भाजप.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका