शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

‘त्या’ चौदा गावांचा भार नवी मुंबई महापालिकेवर नको! गणेश नाईक यांची भूमिका 

By कमलाकर कांबळे | Updated: September 1, 2024 21:18 IST

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कमलाकर कांबळे,  लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांनी शासनाच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. या गावांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. खर्चाचा हा भार नवी मुंबई महापालिकेवर नको, अशी भूमिका आमदार नाईक यांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यास आपला विरोध कधीच नव्हता आणि आजही नाही, परंतु त्यामुळे नवी मुंबईकरांवर अन्याय होणार असेल, तर गप्प बसणार नाही. कारण, या गावांचा अनियंत्रित विस्तार झाला आहे. पायाभूत सुविधांचा बोजवरा उडाला आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उभारली आहेत. नवी मुंबईत ही गावे समाविष्ट केल्यास महापालिकेवर आर्थिक भार पडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीए किंवा सिडकोच्या माध्यमातून या गावांचा विकास करावा. नवी मुंबईकरांच्या कररूपी पैसा येथील पायाभूत सुविधांवर खर्च होऊ देणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनाही भूमिका कळविली आहे.

- गावांच्या समावेशासाठी तीन अटी

भौगोलिकदृष्ट्या या चौदा गावांचा नवी मुंबईशी फारसा संबध नाही. असे असतानाही या गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्याअगोदर पारसिक डोंगरातून एक बोगदा काढून चौदा गावांना जोडणारा रस्ता तयार करावा. चौदा गावांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ७,००० कोटींचा खर्च लागणार आहे. याचा खर्च एमएमआरडीए, सिडको किंवा इतर प्राधिकरणाला करण्यास सांगावे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना आमदार नाईक यांनी केली आहे.

त्या चौदा गावांचा अनियंत्रित विस्तार झाला आहे. पुढील काही काळात येथील लोकसंख्या वीस लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. मागील पाच वर्षांत अनियंत्रित व अनियोजित खर्चामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. अशा परिस्थितीत ही चौदा गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट करून नवी मुंबईकरांवर अन्याय होऊ देणार नाही. - गणेश नाईक, आमदार, भाजप.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका