शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

बोर्डीत केवडा दरवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 03:47 IST

गणपतीपूजनात केवड्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशभक्तांकडूनही त्याला मागणी चांगली असल्याने किंमत अधिक असतानाही

बोर्डी : गणपतीपूजनात केवड्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशभक्तांकडूनही त्याला मागणी चांगली असल्याने किंमत अधिक असतानाही हातोहात विक्री होते.त्यामुळे सध्या गणेशोत्सवानिमित्त बोर्डी परिसरातून केवड्याची निर्यात वाढली आहे.विठ्ठलाला तुळस, शंकराला बेल, मारुतीला रुई तसेच गणपतीपूजनाला दुर्वा, जास्वंदी यांसह केवड्याचे स्थान महत्त्वाचे आहे. गणेशोत्सवानिमित्त फुलबाजारात केवड्याची मागणी वाढली आहे. डहाणू तालुक्यातील नरपड चिखलेगावातील समुद्रकिनाऱ्यालगत शेती आणि ओहोळाच्या काठी केवड्याची बने आहेत. केवड्याच्या काटेरी झुडुपांचा कोट भेदणे अशक्य असल्याने कुंपणाकरिता त्याची लागवड होते. तरीही ८ ते १० वर्षांपासून केवड्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. गणेशचतुर्थीच्या आठ दिवस अगोदर काटेरी झुडुपांवर चढून न उमटलेला केवडा काढला जातो. या काढणीकरिता अनुभव आणि कौशल्य आवश्यक असते. अन्यथा, केवड्याची नासाडी तर होतेच, पण शरीराला जखमा होतात. आदिवासी मुले यामध्ये पटाईत असतात. प्रतवारीनुसार स्थानिक पातळीवर ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत विक्री केली जाते. रेल्वेतून येथील शेतमाल मुंबईला विकणाऱ्या महिला विरार, दादरसह अन्य फुलबाजारात केवडा पोहोचवतात. त्यातून घसघशीत कमाई होते. ‘‘१० ते १२ फूट उंच झुडुपांवर चढून काटेरी पानांतून केवडा सहीसलामत काढणे यात कसब आहे. आव्हान पेलण्यात खरी मजा असते. दोन पैसेही मिळतात. असे चिखले गावातील अमित रसाले, वैभव हाडळ, अतुल गांगात या केवडा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी सांगितले.