शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

अंध, अपंगांचे स्टॉल परवाने रखडणार?

By admin | Updated: November 18, 2016 03:08 IST

चर्मकारांसह अंध व अपंगांना स्टॉल देण्यास सरकार तसेच महासभेने मंजुरी देऊनही

धीरज परब / मीरा रोडचर्मकारांसह अंध व अपंगांना स्टॉल देण्यास सरकार तसेच महासभेने मंजुरी देऊनही परवाने देण्याबाबत मीरा-भार्इंदर पालिकेने आडमुठी भूमिका कायम ठेवली आहे. यामागे सत्ताधारी भाजपाचा हात असून धोरण ठरलेले असताना पालिकेने आता पुन्हा धोरण ठरवण्याचा घाट घातला आहे. यामुळे शहरातील अंध-अपंग व चर्मकारांनी आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न विचारला आहे. तत्कालीन मीरा-भार्इंदर नगरपरिषदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार १४९ चर्मकारांना गटई स्टॉलचा परवाना दिला होता. त्यावेळी कर विभाग चर्मकारांकडून नाममात्र भाडे घेत होता. महापालिका झाल्यानंतर आॅगस्ट २००४ मधील महासभेत चर्मकारांच्या गटई स्टॉलसह अंध-अपंग व दूधविक्रीच्या स्टॉलसाठी नवे धोरण मंजूर केले. ते सरकारकडे पाठवले असता जून २००५ मध्ये धोरणास मंजुरी मिळाली. त्यानंतर, पालिकेने आणखी ४९ गटई स्टॉलना, तर १०७ अपंगांच्या टेलिफोन बूथना परवानगी दिली. आॅगस्ट २०१० मध्ये तत्कालीन आयुक्तांनी स्टॉलना परवाना देणे बंद केले. त्यावेळीही सरकारने स्टॉल परवाने देण्यास पालिकेला निर्देश दिले होते. परंतु, पालिकेने परवान्याचे नूतनीकरण व नवीन परवाने न दिल्याने तसेच जाचक अटी टाकल्याने चर्मकार व अंध-अपंग हवालदिल झाले. चर्मकारांचा पाठपुरावा पाहता अखेर तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांनी महासभेचा ठराव व सरकारी मंजुरीचा आधार घेत गटईकामासह अंध व अपंगांना परवाने देण्यास मंजुरी दिली. ३१ आॅगस्ट २०१५ च्या प्रशासकीय टिप्पणीतही आयुक्तांनी लेखी मंजुरी दिल्याचे स्पष्ट आहे. असे असूनही पालिकेने नवे परवाने देण्यास टाळाटाळ चालवली. चर्मकारांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी गटईकामाचे परवाने देण्यास आडमुठे धोरण अवलंबणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराला वाचा फोडणारे वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये २३ आॅक्टोबरला प्रसिद्ध झाले होते. त्याची स्वत: आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दखल घेतली. संबंधित अधिकारी तसेच आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन यांनी अंध-अपंग व चर्मकारांना स्टॉलसाठी परवाना देण्यास आडकाठी केल्याने हांगे यांनी मंजुरी दिल्यानंतरही गटई स्टॉलसाठी परवाने दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. महासभेपुढे पुन्हा धोरण ठरवण्याचे कुठलेही हांगे यांचे लेखी निर्देश नसतानाही प्रशासनाने पुन्हा महासभेसमोर धोरण ठरवण्याची टूम काढली. ‘लोकमत’च्या बातमीबाबत रहदारीचा प्रश्न, अटीशर्तींची पूर्तता अशी कारणे देत धोरणात्मक निर्णयासाठी प्रस्ताव महासभेपुढे प्रस्तावित केल्याचे म्हटले आहे. सहायक आयुक्त स्वाती देशपांडे यांनी महासभेत नवीन धोरण निश्चित झाल्यावर तसेच कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नवे परवाने देण्यात येतील.