शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

नवी मुंबईच्या १११ प्रभागात भाजपाने राबविले  स्वच्छता अभियान, ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा प्रातिनिधिक सत्कार

By कमलाकर कांबळे | Updated: October 1, 2023 16:54 IST

या अभियानामध्ये लोकप्रतिनिधी, युवक,युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था अशा सर्व घटकांचा मोठा लोकसहभाग लाभला.

नवी मुंबई: भाजपाचेनवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिघा पासून बेलापूर पर्यंत १११ प्रभागांमध्ये शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये लोकप्रतिनिधी, युवक,युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था अशा सर्व घटकांचा मोठा लोकसहभाग लाभला.

शहरातील गाव गावठाण ,शहरी भाग, झोपडपट्टी, औद्योगिक परिसर, वाणिज्यिक संकुले ,रेल्वे स्थानके, सार्वजनिक परिसर ,सोसायटी, उद्याने मैदाने ,चौक अशा सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.

वाशी सेक्टर १० ए या ठिकाणी सागर किनारी स्वच्छता मोहीम पार पडली. सागरी किनारी पसरलेला कचरा स्वच्छ करण्यात आला. या परिसरात खारफुटीचे संरक्षण करणारे खारफुटी मार्शल संस्थेचे पर्यावरण संरक्षक कार्यकर्ते रोहित मल्होत्रा आणि त्यांचे सहकारी देखील सहभागी झाले होते.

 संत गाडगेबाबा महाराजांपासून ते महात्मा गांधींपर्यंत सर्वांनी स्वच्छतेचे महत्व सांगितल्याचे नमूद करून ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी सकारात्मक विचारांची निर्मिती होते. आरोग्य उत्तम प्रकारे राखले जाते, असे प्रतिपादन यावेळी गणेश नाईक यांनी केले.  तर स्वच्छता अभियान एक दिवस नाही तर वर्षातले ३६५  दिवस स्वच्छतेची सवय जपावी, असे आवाहन  भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले.   नवी मुंबई शहर स्वच्छतेचा पुरस्कार, स्वीकार आणि आचरण करणारे शहर असून नागरिकांनी स्वच्छतेचा विचार आणि संस्कार पुढच्या पिढीच्या मनावर बिंबवायला हवा, अशी अपेक्षा  त्यांनी यावेळी व्यक्त केली.  यानिमित्त  गणेश नाईक यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा प्रातिनिधिक  सत्कार करण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारताच्या निर्मितीचे स्वप्न बाळगले असून ते साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी ऐरोली येथील राष्ट्रीय स्वच्छता अभियान प्रसंगी केले. आपल्याकडून अस्वच्छता निर्माण होणार नाही आणि आपले शहर स्वच्छ कसे राहील यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर नाईक यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :BJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई