शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईच्या १११ प्रभागात भाजपाने राबविले  स्वच्छता अभियान, ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा प्रातिनिधिक सत्कार

By कमलाकर कांबळे | Updated: October 1, 2023 16:54 IST

या अभियानामध्ये लोकप्रतिनिधी, युवक,युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था अशा सर्व घटकांचा मोठा लोकसहभाग लाभला.

नवी मुंबई: भाजपाचेनवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिघा पासून बेलापूर पर्यंत १११ प्रभागांमध्ये शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये लोकप्रतिनिधी, युवक,युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था अशा सर्व घटकांचा मोठा लोकसहभाग लाभला.

शहरातील गाव गावठाण ,शहरी भाग, झोपडपट्टी, औद्योगिक परिसर, वाणिज्यिक संकुले ,रेल्वे स्थानके, सार्वजनिक परिसर ,सोसायटी, उद्याने मैदाने ,चौक अशा सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.

वाशी सेक्टर १० ए या ठिकाणी सागर किनारी स्वच्छता मोहीम पार पडली. सागरी किनारी पसरलेला कचरा स्वच्छ करण्यात आला. या परिसरात खारफुटीचे संरक्षण करणारे खारफुटी मार्शल संस्थेचे पर्यावरण संरक्षक कार्यकर्ते रोहित मल्होत्रा आणि त्यांचे सहकारी देखील सहभागी झाले होते.

 संत गाडगेबाबा महाराजांपासून ते महात्मा गांधींपर्यंत सर्वांनी स्वच्छतेचे महत्व सांगितल्याचे नमूद करून ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी सकारात्मक विचारांची निर्मिती होते. आरोग्य उत्तम प्रकारे राखले जाते, असे प्रतिपादन यावेळी गणेश नाईक यांनी केले.  तर स्वच्छता अभियान एक दिवस नाही तर वर्षातले ३६५  दिवस स्वच्छतेची सवय जपावी, असे आवाहन  भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले.   नवी मुंबई शहर स्वच्छतेचा पुरस्कार, स्वीकार आणि आचरण करणारे शहर असून नागरिकांनी स्वच्छतेचा विचार आणि संस्कार पुढच्या पिढीच्या मनावर बिंबवायला हवा, अशी अपेक्षा  त्यांनी यावेळी व्यक्त केली.  यानिमित्त  गणेश नाईक यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा प्रातिनिधिक  सत्कार करण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारताच्या निर्मितीचे स्वप्न बाळगले असून ते साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी ऐरोली येथील राष्ट्रीय स्वच्छता अभियान प्रसंगी केले. आपल्याकडून अस्वच्छता निर्माण होणार नाही आणि आपले शहर स्वच्छ कसे राहील यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर नाईक यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :BJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई