शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

भारत सेवाश्रम संघाची कर्करोग पीडितांना मदत

By admin | Updated: February 4, 2017 03:40 IST

वाशी गावातील भारत सेवाश्रम संघाच्या वतीने गेली २९ वर्षे देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्ण अत्यल्प खर्चात उपचार, आर्थिक सहाय्य, शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध

- प्राची सोनवणे, नवी मुंबईवाशी गावातील भारत सेवाश्रम संघाच्या वतीने गेली २९ वर्षे देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्ण अत्यल्प खर्चात उपचार, आर्थिक सहाय्य, शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये जास्त प्रमाणात कॅन्सरग्रस्त रुग्ण आढळत असून या रुग्णांना राहण्या-खाण्यासाठी, उपचारासाठी पुरेपूर सहाय्य करण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते.परराज्यातून येणाऱ्या रुग्णांना राहण्याची सोय, भरपेट जेवण, उपचाराकरिता रुग्णालयातील खर्चात मदत, फावल्या वेळेत कौशल्य विकास तसेच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम वर्षोनुवर्षे केले जात आहे. आसाम, नागालँड, बांगलादेश, नेपाळ, ओडिशा, बंगाल आदी रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. खारघर येथील टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दररोज मोफत बससेवा पुरविली जात असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील रुग्णांना याठिकाणी मोफत उपचार दिले जातात. याठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांकरिता दररोज सकाळी ३ तासांची शिकवणी,संगणक प्रशिक्षण दिले जाते. दर आठवड्याला याठिकाणी राहणाऱ्या रुग्णांच्या आरोग्य तपासणीकरिता तज्ज्ञ डॉक्टर भेट देतात. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी अंबिका योग कुटीरच्या सहयोगाने याठिकाणी योगाभ्यासाचे धडे दिले जातात. सध्या ११० कर्करोग रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची विविध विषयांवर शिकवणी घेतात.जागतिक दर्जाचे केंद्रनवी मुंबई हे देशातील कॅन्सर संशोधनासाठीचे प्रमुख केंद्र ठरू लागले आहे. खारघरमध्ये ६० एकर भूखंडावर टाटा मेमोरियल सेंटर उभारण्यात आले आहे. येथे २५० बेडचे सुसज्ज रूग्णालय आहे. रूग्णांवर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडीओलॉजी उपचारांची सुविधा आहे.याठिकाणी संशोधनाचीही सुविधा असून तज्ज्ञ डॉक्टर घडविण्याचे काम सुरू आहे. आसाम भवनमधील दोन मजले रुग्णांसाठीआसाममधील वाढत्या कर्करोग रुग्णांची दखल घेत वाशीतील आसाम भवनमधील दोन मजले केवळ कर्करोग रु ग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय विविध उपचारांसाठी आसाम सरकारने निधीतही वाढ केली असून औषधोपचार, प्रवास खर्च, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.- कर्करोग कसा होतो, त्याची लक्षणे, उपचार पध्दती आदींविषयी माहिती देण्यासाठी महिन्यातून एकदा जनजागृती शिबिराचे आयोजन केले जाते. नवी मुंबई परिसरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी याठिकाणी भेट देऊन रुग्णसेवेत पुढाकार घेत असल्याची माहिती संस्थाचालक स्वामी प्रशांतानंदजी दिली.