शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग
2
मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त
3
वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
4
अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या
5
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
6
बाजाराला 'ट्रम्प टॅरिफ'च्या धक्क्यातून दिलासा! इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' क्षेत्रात तेजी, कुठे झाली घसरण?
7
दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं...
8
Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक
9
"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट
10
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
11
सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर
12
"मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत"; अमित शाहांवरील वादग्रस्त विधानानंतर महुआ मोईत्रांची पुन्हा टीका
13
"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल
14
Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!
15
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
16
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी
17
'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..."
18
भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण २०२५: कधी लागेल ग्रहण, भारतात कुठे दिसणार? पाहा, मान्यता
19
Asia Cup 2025साठी ओमानचा संघ जाहीर, पण कर्णधार मात्र भारतीय; जाणून घ्या 'तो' कोण?
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!

भारत सेवाश्रम संघाची कर्करोग पीडितांना मदत

By admin | Updated: February 4, 2017 03:40 IST

वाशी गावातील भारत सेवाश्रम संघाच्या वतीने गेली २९ वर्षे देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्ण अत्यल्प खर्चात उपचार, आर्थिक सहाय्य, शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध

- प्राची सोनवणे, नवी मुंबईवाशी गावातील भारत सेवाश्रम संघाच्या वतीने गेली २९ वर्षे देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्ण अत्यल्प खर्चात उपचार, आर्थिक सहाय्य, शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये जास्त प्रमाणात कॅन्सरग्रस्त रुग्ण आढळत असून या रुग्णांना राहण्या-खाण्यासाठी, उपचारासाठी पुरेपूर सहाय्य करण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते.परराज्यातून येणाऱ्या रुग्णांना राहण्याची सोय, भरपेट जेवण, उपचाराकरिता रुग्णालयातील खर्चात मदत, फावल्या वेळेत कौशल्य विकास तसेच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम वर्षोनुवर्षे केले जात आहे. आसाम, नागालँड, बांगलादेश, नेपाळ, ओडिशा, बंगाल आदी रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. खारघर येथील टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दररोज मोफत बससेवा पुरविली जात असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील रुग्णांना याठिकाणी मोफत उपचार दिले जातात. याठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांकरिता दररोज सकाळी ३ तासांची शिकवणी,संगणक प्रशिक्षण दिले जाते. दर आठवड्याला याठिकाणी राहणाऱ्या रुग्णांच्या आरोग्य तपासणीकरिता तज्ज्ञ डॉक्टर भेट देतात. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी अंबिका योग कुटीरच्या सहयोगाने याठिकाणी योगाभ्यासाचे धडे दिले जातात. सध्या ११० कर्करोग रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची विविध विषयांवर शिकवणी घेतात.जागतिक दर्जाचे केंद्रनवी मुंबई हे देशातील कॅन्सर संशोधनासाठीचे प्रमुख केंद्र ठरू लागले आहे. खारघरमध्ये ६० एकर भूखंडावर टाटा मेमोरियल सेंटर उभारण्यात आले आहे. येथे २५० बेडचे सुसज्ज रूग्णालय आहे. रूग्णांवर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडीओलॉजी उपचारांची सुविधा आहे.याठिकाणी संशोधनाचीही सुविधा असून तज्ज्ञ डॉक्टर घडविण्याचे काम सुरू आहे. आसाम भवनमधील दोन मजले रुग्णांसाठीआसाममधील वाढत्या कर्करोग रुग्णांची दखल घेत वाशीतील आसाम भवनमधील दोन मजले केवळ कर्करोग रु ग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय विविध उपचारांसाठी आसाम सरकारने निधीतही वाढ केली असून औषधोपचार, प्रवास खर्च, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.- कर्करोग कसा होतो, त्याची लक्षणे, उपचार पध्दती आदींविषयी माहिती देण्यासाठी महिन्यातून एकदा जनजागृती शिबिराचे आयोजन केले जाते. नवी मुंबई परिसरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी याठिकाणी भेट देऊन रुग्णसेवेत पुढाकार घेत असल्याची माहिती संस्थाचालक स्वामी प्रशांतानंदजी दिली.