शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्या त्रासामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, अशोक गावडे यांचा गंभीर आरोप

By नारायण जाधव | Updated: September 7, 2022 20:55 IST

पक्षाचे काम करित असताना पक्षातील वरिष्ठांचे  आपणास सहकार्य व मार्गदर्शन लाभले नाही, गावडे यांनी व्यक्त केली खंत.

नवी मुंबई बाहेरील व्यक्ती जिल्हा काँग्रेस कमिटीत धावलढवक करित होत्या. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, प्रशांत पाटीलसह भावना घाणेकर यांनी पक्षात सातत्याने गटातटाचे राजकारण केले. नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील आणि नवी मुंबई राष्ट्रवादी काँगेसच्या महिला निरीक्षक भावना घाणेकर यांनी वर्षभपासून मला विश्वासात न घेता परस्पर बैठका घेऊन माझ्याविषयी कार्यकर्त्यांत गैरसमज पसरवले. पक्षाचे काम करित असताना पक्षातील वरिष्ठांचे  आपणास सहकार्य व मार्गदर्शन लाभले नाही,” याचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी बुधवारी नेरुळ येथे बोलताना सांगितले.

आपण नाईलाजास्तव राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा ३० ऑगस्ट २०२२ रोजीच राष्ट्रीय पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पक्ष सोडताना आपल्यासाठी सर्व पक्षांची द्वारे खुली असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्या अध्यक्ष आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्या अध्यक्षपदी नामदेव भगत यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद तीन वर्षांपूर्वी आपण स्वीकारले होते. पक्ष वाढीसाठी जीवाचे रान केले. स्वतःचा पैसे खर्च केला. पक्ष वाढीसाठी करत असलेल्या कार्याचा अहवाल आपण जयंत पाटील, अजित पवार , खा. सुप्रिया सुळे यांना वेळोवेळी सादर केला. मात्र पक्षातील वरिष्ठांकडून आपणास मार्गदर्शन व सहकार्य लाभले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

वरिष्ठांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून आपणास विश्वासात न घेता नवी मुंबई बाहेरील व्यक्तींना माझ्या डोक्यावर आणून बसवले. आपणास पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, शशिकांत शिंदे, प्रशांत पाटील, भावना घाणेकर, नामदेव भगत यांनी सातत्याने  त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी गटबाजी आणि गटातटाच्या राजकारणास खतपाणी घातले. नवी मुंबई शहरात अध्यक्ष बदली करावा यासाठी दिवसातून चार चार बैठका ते घेत असत. त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेल्याची खंत गावडे यांनी व्यक्त केली.

'बदनाम करण्याचे प्रयत्न'मला येनकेन प्रकारे बदनाम करण्याची मोहिमच काहींनी उघडली होती. नवी मुंबईतून कार्यकर्त्यांची वेगवेगळी शिष्टमंडळे वरिष्ठांकडे पाठवून मला जिल्ह्याध्यक्ष पदावरून काढण्याचे प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच नाईलाजास्तव आपण आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे पाठवला असल्याचे सांगितले. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्र जयंत पाटील यांनाही पाठवले असल्याचे गावडे म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNavi Mumbaiनवी मुंबईPoliticsराजकारण