शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्या त्रासामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, अशोक गावडे यांचा गंभीर आरोप

By नारायण जाधव | Updated: September 7, 2022 20:55 IST

पक्षाचे काम करित असताना पक्षातील वरिष्ठांचे  आपणास सहकार्य व मार्गदर्शन लाभले नाही, गावडे यांनी व्यक्त केली खंत.

नवी मुंबई बाहेरील व्यक्ती जिल्हा काँग्रेस कमिटीत धावलढवक करित होत्या. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, प्रशांत पाटीलसह भावना घाणेकर यांनी पक्षात सातत्याने गटातटाचे राजकारण केले. नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील आणि नवी मुंबई राष्ट्रवादी काँगेसच्या महिला निरीक्षक भावना घाणेकर यांनी वर्षभपासून मला विश्वासात न घेता परस्पर बैठका घेऊन माझ्याविषयी कार्यकर्त्यांत गैरसमज पसरवले. पक्षाचे काम करित असताना पक्षातील वरिष्ठांचे  आपणास सहकार्य व मार्गदर्शन लाभले नाही,” याचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी बुधवारी नेरुळ येथे बोलताना सांगितले.

आपण नाईलाजास्तव राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा ३० ऑगस्ट २०२२ रोजीच राष्ट्रीय पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पक्ष सोडताना आपल्यासाठी सर्व पक्षांची द्वारे खुली असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्या अध्यक्ष आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्या अध्यक्षपदी नामदेव भगत यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद तीन वर्षांपूर्वी आपण स्वीकारले होते. पक्ष वाढीसाठी जीवाचे रान केले. स्वतःचा पैसे खर्च केला. पक्ष वाढीसाठी करत असलेल्या कार्याचा अहवाल आपण जयंत पाटील, अजित पवार , खा. सुप्रिया सुळे यांना वेळोवेळी सादर केला. मात्र पक्षातील वरिष्ठांकडून आपणास मार्गदर्शन व सहकार्य लाभले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

वरिष्ठांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून आपणास विश्वासात न घेता नवी मुंबई बाहेरील व्यक्तींना माझ्या डोक्यावर आणून बसवले. आपणास पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, शशिकांत शिंदे, प्रशांत पाटील, भावना घाणेकर, नामदेव भगत यांनी सातत्याने  त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी गटबाजी आणि गटातटाच्या राजकारणास खतपाणी घातले. नवी मुंबई शहरात अध्यक्ष बदली करावा यासाठी दिवसातून चार चार बैठका ते घेत असत. त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेल्याची खंत गावडे यांनी व्यक्त केली.

'बदनाम करण्याचे प्रयत्न'मला येनकेन प्रकारे बदनाम करण्याची मोहिमच काहींनी उघडली होती. नवी मुंबईतून कार्यकर्त्यांची वेगवेगळी शिष्टमंडळे वरिष्ठांकडे पाठवून मला जिल्ह्याध्यक्ष पदावरून काढण्याचे प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच नाईलाजास्तव आपण आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे पाठवला असल्याचे सांगितले. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्र जयंत पाटील यांनाही पाठवले असल्याचे गावडे म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNavi Mumbaiनवी मुंबईPoliticsराजकारण