शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण कागदावरच

By admin | Updated: May 2, 2017 03:34 IST

सिडकोने २०१५मध्ये स्मार्ट दक्षिण नवी मुंबईचे प्रदर्शन भरविताना बेलापूर किल्ल्याच्या सुशोभीकरणाची घोषणा केली

नवी मुंबई : सिडकोने २०१५मध्ये स्मार्ट दक्षिण नवी मुंबईचे प्रदर्शन भरविताना बेलापूर किल्ल्याच्या सुशोभीकरणाची घोषणा केली होती. ११ कोटी रुपये खर्च करून २०१७पर्यंत किल्ल्याला ऊर्जितावस्था निर्माण करून देण्यात येणार होती; पण प्रत्यक्षात दोन वर्षांत सुशोभीकरण कसे होणार, याचा आराखडाही तयार करण्यात आलेला नाही. संरक्षित किल्ल्याचे क्षेत्रफळ व नक्की काय विकास करणार? हे सर्वच गुलदस्त्यामध्ये असल्याने इतिहासप्रेमींनी सिडको व शासनाविषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र शासनाने स्मार्ट सिटी स्पर्धा जाहीर करताच सिडकोने ४ डिसेंबर २०१५मध्ये वाशीतील प्रदर्शिनी हॉलमध्ये विशेष प्रदर्शन भरविले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तत्कालीन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी दक्षिण नवी मुंबईच पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली. या वेळी बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण केले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणाही करण्यात आली. पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने ऐतिहासिक वारसा जपण्यात येणार असून, त्यासाठी ११ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली होती. २०१७पर्यंत सुशोभीकरण पूर्ण करण्यात येणार होते; पण तेव्हापासून अद्याप सुशोभीकरणासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. किल्ल्याच्या चारही बाजूने बांधकामे झाली आहेत. सिडको गेस्ट हाउससह निवासी इमारतीही आहेत. यामुळे प्रत्यक्ष किल्ल्याचे क्षेत्रफळ किती हेच निश्चित झालेले नाही. किल्ल्यावरील सर्व बांधकामे नष्ट झाली आहेत. फक्त एक टेहळणी बुरूज अर्धवट मोडकळलेल्या अवस्थेमध्ये आहे. बुरुजाला एक बाजूला भेग पडली आहे. दुसऱ्या बाजूला मोडकळीस आलेल्या बांधकामावर पर्यटक जात असतात. बांधकाम धोकादायक स्थितीमध्ये असल्याने ते कोसळून त्यावर जाणाऱ्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता आहे. या बुरुजाचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. बेलापूर किल्ला हा नवी मुंबईमधील एकमेव ऐतिहासिक ठेवा आहे. ४५७ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याचे जतन करण्याची गरज आहे. भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अनेक वर्षांपासून किल्ल्याचे संवर्धन व्हावे, यासाठी राज्य शासन व सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनीही अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केला आहे. ""सुशोभीकरणाचा दिखावासिडकोकडून बेलापूर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा फक्त दिखावा केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये २०१७पर्यंत ११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती; पण या निधीतून नक्की कोणती कामे करण्यात येणार, हे सांगितलेच नाही. दिलेला कालावधी संपण्यास फक्त ६ महिने शिल्लक आहेत. एवढ्या कमी कालावधीमध्ये सुशोभीकरण कसे पूर्ण होणार व नक्की काय कामे केली जाणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. यामुळे सुशोभीकरण फक्त स्मार्ट सिटीच्या प्रदर्शनापुरतेच मर्यादित होते हे स्पष्ट होऊ लागले आहे. बेलापूर किल्ल्याचे वास्तवकिल्ल्यावर फक्त टेहळणी बुरुजाची एक वास्तू अस्तित्वात महापालिका मुख्यालयासमोरील टेहळणी बुरूज नामशेष होण्याच्या मार्गावर किल्ल्यावरील सर्व बांधकामे नष्ट केल्याने फक्त दगड, विटांचा खच किल्ल्याचे क्षेत्रफळ किती? याविषयी स्पष्टता नाहीकिल्ल्यावर फिरण्यासाठी रस्ता नसल्याने गैरसोय