शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांनी वंचित आघाडीला नाकारले, डॉ. डोंगरगावकर यांचा आकडेवारीसह दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 00:12 IST

लोकसभा निवडणुकीत राज्यातील आंबेडकरी जनतेसह बहुजनांनी वंचित आघाडीला नाकारल्याचा दावा आंबेडकरी विचाराचे नेते डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी केला आहे.

पनवेल : लोकसभा निवडणुकीत राज्यातील आंबेडकरी जनतेसह बहुजनांनी वंचित आघाडीला नाकारल्याचा दावा आंबेडकरी विचाराचे नेते डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी केला आहे. वंचित आघाडीच्या आवाहनाकडे पाठ दाखवत बहुजनांसह मागासवर्गीय मतदारांनी शिवसेना आणि भाजप युतीला मतदान करणे हिताचे मानल्याचे डॉ. डोंगरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील मतदानाच्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी हा दावा केला आहे.राज्यात एकूण पाच कोटी ३६ हजार २२० मतदारांनी मतदान केले आहे. राज्यात अनुसूचित जाती, जमाती आणि मुस्लीम समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे. हे लक्षात घेता त्यांची एकत्रित एक कोटी ७० लाख ६७ हजार ५९० इतकी मते बहुजन वंचित आघाडी, तसेच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात बहुजन वंचित आघाडीला ३६ लाखांपेक्षा जास्त मतदान झाले. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, मुस्लीम सर्वच आघाडीवर मतदारांनी बहुजन वंचित आघाडीला नाकारल्याचे चित्र राज्यात पाहावयास मिळत असल्याचे डोंगरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे निवास असलेल्या पुण्यातही बहुजन वंचित आघाडीला आपला फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले हे मागील तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत; परंतु त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा फायदा समाजाला झालेला नाही. कारण या दोन्ही नेत्यांचे राजकारण बेरजेकडे जाण्याऐवजी वजाबाकीच्या दिशेने सुरू असल्याची टीका डोंगरगावकर यांनी केली आहे. बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस सोबत आघाडी केली असती, तर चार ते पाच जागा सहज पदरात पाडून घेता आल्या असत्या. तसेच त्यामुळे काँग्रेसच्या जागाही वाढल्या असत्या; परंतु चुकीच्या धोरणामुळे रिपब्लिकनच्या राजकीय चळवळीची मोठी हानी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर