शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

अयोध्येत 'रामलल्ला'ला जमिन मिळाली पण, आदिवासींना कधी मिळणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 09:03 IST

भारत हा सांधू-संताची भूमी असलेला देश आहे. येथेच अध्योचे राजा असलेल्या श्रीराम प्रभूंनी आदिवासी

उमेश जाधव

टिटवाळा - संपूर्ण भारत देशाचे दैवत असलेल्या भगवान रामचंद्र श यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या कायद्याने शेकडो वर्षे वादग्रस्त ठरलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमीची जमीन न्यायालयाने रामलल्लाला दिल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण, खऱ्या अर्थाने रामभक्त असलेल्या आदिवासींना त्यांच्या हक्काची/पिढ्यानपिढ्या वापरात असलेली कल्याण तालुक्यातील कांबा गावा जवळील वाघेरापाडा येथील शेतजमीन कधी मिळणार, असा आर्त सवाल यांच्यासाठी काम करणाऱ्या विविध प्रकारच्या सामाजिक संस्थानी उपस्थित केला आहे.

भारत हा सांधू-संताची भूमी असलेला देश आहे. येथेच अध्योचे राजा असलेल्या श्रीराम प्रभूंनी आदिवासी (भिल्लीन) असलेली महिला शबरी हिची उष्टी बोरे खाल्याची कथा सांगितली जाते. याच प्रभू रामचंद्र यांच्या रामजन्मभूमी जमीन प्रकरणाचा निकाल उच्च न्यायालयाने दिला व शेकडो वर्षे वादग्रस्त ठरलेल्या अयोध्येतील जमीन रामलल्लाला मिळाली. पण, त्यांचेच परमभक्त असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कांबा वाघेरापाडा येथील आदिवासींना मात्र कधी न्याय मिळणार याची चिंता लागली आहे. कांबा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वाघेरापाडा येथील महादू नागो शिद व इतर आदीवाशी लोक शेकडो एकर जमिनीवर भातशेती व इतर पारंपरिक पद्धतीने काम करीत होते. यांची दफनभूमी देखील येथे आहे. स.न. 47/1, 47/2, 52 यातील शेकडो एकर जमीन कुळकायदा नियमानुसार महादू शिद यांच्या नावे झाली, पण याच्या अज्ञानाचा फायदा घेत याचे कुलमुखत्यार विष्णू लक्ष्मण फडके, शांतीलाल पोरिया, प्रकाश रेवाचंद बुधरानी यांनी ही जमीन बोगस शेतकरी दाखला जोडून खरेदी केली आहे. या विरोधात न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. आदिवासीचे वारसदार विठ्ठल शिद, सुरेश हिंदोळे व बालाराम शिद हे कायदेशीर लढाई लढत आहेत. याना विश्व मानव कल्याण परिषद आणि परहित चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्था पाठिंबा देत आहेत.

मुळात या व्यापारी बिल्डरांनी ज्या बोगस शेतकरी दाखल्याच्या आधारे ही जमीन खरेदी केली आहे. त्या बाबतीत जिल्ह्य़ातील, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका पोलीस ठाणे, मंडळ अधिकारी या सर्वाच्याच बाबतीत या संस्थेने संशय व्यक्त केला असून यांच्यासह 14 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच भारतीय दंड संहिता 340, 345, 346 सुधारित अधिनियम 2015 च्या कलम 3,4,8 नुसार सी.बी.आय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच बोगस शेतकरी असलेले प्रकाश बुधरानी व परिवाराने स.न. ‌120/1, 121/1,108/3 ही जमीन खरेदी करणारे लाल तनवाणी, गुंणवत भंगाळे, नरेश भाटिया, यश रावलानी, व बुधरानी यांनी शेतकरी दाखले व बोगस कागदपत्रे सादर करून तसेच सेंच्युरी रेऑनची अकृषक जमीन कृषक कशी केली. त्यामध्ये सरकारचे करोडोचे नुकसान झाले आहे. असा आरोप परहितचे अध्यक्ष विशाल गुफ्ता यांनी केला आहे. त्यामुळे शेकडो वर्षे वादग्रस्त ठरलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमीची जमीन न्यायालयाने रामलल्लाला दिल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. मग आमच्या वर अन्याय का? असा सवाल आदीवाशी बांधव उपस्थित करित आहेत. तसेच याप्रकरणी न्याय न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्यात येईल, असे या संस्थेने सांगितले आहे. तर या संपूर्णपणे वादग्रस्त जमिनीबाबत पुर्नलोकनार्थ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले असताना ते पेंडिंग असतानादेखील कांबा येथील जमीनीवर बांधकाम कसे सुरु झाले याची चौकशी करावी, अशी मागणी विशाल गुफ्ता यांनी केली आहे. 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय