शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

अयोध्येत 'रामलल्ला'ला जमिन मिळाली पण, आदिवासींना कधी मिळणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 09:03 IST

भारत हा सांधू-संताची भूमी असलेला देश आहे. येथेच अध्योचे राजा असलेल्या श्रीराम प्रभूंनी आदिवासी

उमेश जाधव

टिटवाळा - संपूर्ण भारत देशाचे दैवत असलेल्या भगवान रामचंद्र श यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या कायद्याने शेकडो वर्षे वादग्रस्त ठरलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमीची जमीन न्यायालयाने रामलल्लाला दिल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण, खऱ्या अर्थाने रामभक्त असलेल्या आदिवासींना त्यांच्या हक्काची/पिढ्यानपिढ्या वापरात असलेली कल्याण तालुक्यातील कांबा गावा जवळील वाघेरापाडा येथील शेतजमीन कधी मिळणार, असा आर्त सवाल यांच्यासाठी काम करणाऱ्या विविध प्रकारच्या सामाजिक संस्थानी उपस्थित केला आहे.

भारत हा सांधू-संताची भूमी असलेला देश आहे. येथेच अध्योचे राजा असलेल्या श्रीराम प्रभूंनी आदिवासी (भिल्लीन) असलेली महिला शबरी हिची उष्टी बोरे खाल्याची कथा सांगितली जाते. याच प्रभू रामचंद्र यांच्या रामजन्मभूमी जमीन प्रकरणाचा निकाल उच्च न्यायालयाने दिला व शेकडो वर्षे वादग्रस्त ठरलेल्या अयोध्येतील जमीन रामलल्लाला मिळाली. पण, त्यांचेच परमभक्त असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कांबा वाघेरापाडा येथील आदिवासींना मात्र कधी न्याय मिळणार याची चिंता लागली आहे. कांबा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वाघेरापाडा येथील महादू नागो शिद व इतर आदीवाशी लोक शेकडो एकर जमिनीवर भातशेती व इतर पारंपरिक पद्धतीने काम करीत होते. यांची दफनभूमी देखील येथे आहे. स.न. 47/1, 47/2, 52 यातील शेकडो एकर जमीन कुळकायदा नियमानुसार महादू शिद यांच्या नावे झाली, पण याच्या अज्ञानाचा फायदा घेत याचे कुलमुखत्यार विष्णू लक्ष्मण फडके, शांतीलाल पोरिया, प्रकाश रेवाचंद बुधरानी यांनी ही जमीन बोगस शेतकरी दाखला जोडून खरेदी केली आहे. या विरोधात न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. आदिवासीचे वारसदार विठ्ठल शिद, सुरेश हिंदोळे व बालाराम शिद हे कायदेशीर लढाई लढत आहेत. याना विश्व मानव कल्याण परिषद आणि परहित चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्था पाठिंबा देत आहेत.

मुळात या व्यापारी बिल्डरांनी ज्या बोगस शेतकरी दाखल्याच्या आधारे ही जमीन खरेदी केली आहे. त्या बाबतीत जिल्ह्य़ातील, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका पोलीस ठाणे, मंडळ अधिकारी या सर्वाच्याच बाबतीत या संस्थेने संशय व्यक्त केला असून यांच्यासह 14 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच भारतीय दंड संहिता 340, 345, 346 सुधारित अधिनियम 2015 च्या कलम 3,4,8 नुसार सी.बी.आय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच बोगस शेतकरी असलेले प्रकाश बुधरानी व परिवाराने स.न. ‌120/1, 121/1,108/3 ही जमीन खरेदी करणारे लाल तनवाणी, गुंणवत भंगाळे, नरेश भाटिया, यश रावलानी, व बुधरानी यांनी शेतकरी दाखले व बोगस कागदपत्रे सादर करून तसेच सेंच्युरी रेऑनची अकृषक जमीन कृषक कशी केली. त्यामध्ये सरकारचे करोडोचे नुकसान झाले आहे. असा आरोप परहितचे अध्यक्ष विशाल गुफ्ता यांनी केला आहे. त्यामुळे शेकडो वर्षे वादग्रस्त ठरलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमीची जमीन न्यायालयाने रामलल्लाला दिल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. मग आमच्या वर अन्याय का? असा सवाल आदीवाशी बांधव उपस्थित करित आहेत. तसेच याप्रकरणी न्याय न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्यात येईल, असे या संस्थेने सांगितले आहे. तर या संपूर्णपणे वादग्रस्त जमिनीबाबत पुर्नलोकनार्थ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले असताना ते पेंडिंग असतानादेखील कांबा येथील जमीनीवर बांधकाम कसे सुरु झाले याची चौकशी करावी, अशी मागणी विशाल गुफ्ता यांनी केली आहे. 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय