शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सरकारला 16 ऑगस्टची मुदत; विमानतळ नामकरणासाठी एल्गार, काम बंद पाडण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 06:59 IST

चार जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र उतरले रस्त्यावर : काम बंद पाडण्याचा इशारा

नवी मुंबई/पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी चार जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र गुरुवारी रस्त्यावर उतरले. नामकरणासाठी सरकारला १६ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये योग्य निर्णय न घेतल्यास विमानतळाचे बांधकाम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सायन - पनवेल महामार्ग सात तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र सहभागी झाले होते. पहाटेपासूनच भूमिपुत्र नवी मुंबईमध्ये एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. यामुळे पोलिसांनी सकाळी आठपासून सायन - पनवेल महामार्ग व सिडको भवनकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. आंदोलकांना पामबीच रोडवर नवी मुंबई महापालिकेच्या जवळ एकत्र येऊन तेथेच शांततेमध्ये आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पामबीच रोडवर जवळपास दोन किलाेमीटर अंतरावर आंदोलकांच्या रांगा लागल्या होत्या. भूमिपुत्रांच्या त्यागावर नवी मुंबई उभी राहिली असून, येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी आंदोलकांनी केली. विमानतळाच्या ठिकाणची कामे बंद पाडली जातील व आक्रमकपणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा सरकारला देण्यात आला.

सायन - पनवेल महामार्ग सात तास बंद

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सायन - पनवेल महामार्ग सकाळी आठ वाजता बंद करण्यात आला होता. दुपारी सव्वातीन वाजता महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सात तास महामार्ग  बंद होता. या दरम्यान वाहतूक शिळफाटा मार्गे वळविण्यात आली होती. शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने मुुंबईतून पनवेलला जाण्यासाठी व पनवेलवरून मुंबईत पोहोचण्यासाठी तीन ते साडेतीन तास वेळ लागत होता.

मागणीचे निवेदन दिले : शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले. आंदोलनात माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, राजू पाटील, महेश बालदी, प्रशांत ठाकूर, हुसेन दलवाई, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक व कृती समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होेते.

आंदोलनातील महत्त्वाचे मुद्दे 

  • सायन - पनवेल महामार्गासह सिडको 
  • भवनकडे जाणारे सर्व रस्ते सात तास बंद.
  • बंदोबस्तासाठी सात हजार अधिकारी, कर्मचारी तैनात केले होते.
  • मुुंबईतून पुणेकडे व पुणेकडून मुंबईकडे येणारी सर्व वाहतूक शिळफाटा मार्गे वळविण्यात आली होती.
  • वाहतुकीतील बदलामुळे शिळफाटा, वाशी टोलनाका, कळंबोलीत वाहतूक कोंडी.
  • महिलांनी आंदोलनस्थळीच वटपौर्णिमा साजरी केली.
  • वारकरी मंडळींनी भजन म्हणत 
  • आंदोलनात सहभाग घेतला.
  • आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणारे गीत व नृत्य सादर करण्यात आली.
  • पामबीच रोडवर दोन किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडकोMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार