शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

गृहसंस्थांसाठी लेखापरीक्षण सक्तीचे

By admin | Updated: July 15, 2016 01:35 IST

रायगड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी वेळेवर संस्थेचे लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल सादर केला नाही तर त्यांची नोंदणी रद्द होणार आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी वेळेवर संस्थेचे लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल सादर केला नाही तर त्यांची नोंदणी रद्द होणार आहे. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे सदरची जागा संबंधित बिल्डरच्या नावावर होणार आहे. त्यामुळे पुनर्विकासात संस्थेतील सदस्यांना फायदा न होता थेट बिल्डरचाच फायदा होणार आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.९७ व्या घटना दुरुस्तीनुसार सहकारी संस्थांना स्वायत्त संस्था म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी संस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकही नेमायचा आहे. त्यांच्यामार्फतच संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था लेखापरीक्षण करण्यात टाळाटाळ करतात. ३१ जुलैपर्यंत लेखापरीक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर आॅनलाइन रिटर्न भरावयाचे आहे. तसेच त्याचा अहवाल तत्काळ सादर करायचा आहे. तसे न करणाऱ्या संस्थांवर जिल्हा निबंधक विभागामार्फत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारू शकते.प्रशासनाने कारवाई केल्यास संबंधित गृहनिर्माण संस्थांचे अस्तित्व संपणार आहे. पुनर्विकासात त्यामध्ये सदस्यांना कोणताच अधिकार राहणार नाही. त्याचा थेट फायदा हा बिल्डर लॉबीला होणार आहे.संस्थांनी ३१ जुलैपर्यंत लेखापरीक्षण पूर्ण करून सादर करावे, अन्यथा त्यांना कोणतीच दयामया दाखविली जाणार नसल्याचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जनजागृतीसाठी विविध बॅनरही लावले होते, मात्र अद्यापही कोणी गांभीर्याने घेतले नसल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यामध्ये सुमारे चार हजार सहकारी संस्था आहेत, पैकी दोन हजार गृहनिर्माण संस्था आहेत. एका इमारतीमध्ये सुमारे १२ फ्लॅट असून त्यात प्रत्येकी पाच व्यक्ती राहतात. त्यांची संख्या सुमारे २४ हजार फ्लॅट आणि सव्वा लाख व्यक्तींची संख्या होते. त्यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ येऊ शकते असे, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग खोडका यांनी ‘लोकमत’ला सांगितले. संस्थांनी काय करावे?दप्तर नोंदणी करावी.हिशेब चोख ठेवावा.पत्रव्यवहार करावा.लेखापरीक्षण वेळेत पूर्ण करावे.आॅनलाइन रिटर्न भरावे.अहवाल सादर करावा.