शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गृहसंस्थांसाठी लेखापरीक्षण सक्तीचे

By admin | Updated: July 15, 2016 01:35 IST

रायगड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी वेळेवर संस्थेचे लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल सादर केला नाही तर त्यांची नोंदणी रद्द होणार आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी वेळेवर संस्थेचे लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल सादर केला नाही तर त्यांची नोंदणी रद्द होणार आहे. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे सदरची जागा संबंधित बिल्डरच्या नावावर होणार आहे. त्यामुळे पुनर्विकासात संस्थेतील सदस्यांना फायदा न होता थेट बिल्डरचाच फायदा होणार आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.९७ व्या घटना दुरुस्तीनुसार सहकारी संस्थांना स्वायत्त संस्था म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी संस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकही नेमायचा आहे. त्यांच्यामार्फतच संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था लेखापरीक्षण करण्यात टाळाटाळ करतात. ३१ जुलैपर्यंत लेखापरीक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर आॅनलाइन रिटर्न भरावयाचे आहे. तसेच त्याचा अहवाल तत्काळ सादर करायचा आहे. तसे न करणाऱ्या संस्थांवर जिल्हा निबंधक विभागामार्फत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारू शकते.प्रशासनाने कारवाई केल्यास संबंधित गृहनिर्माण संस्थांचे अस्तित्व संपणार आहे. पुनर्विकासात त्यामध्ये सदस्यांना कोणताच अधिकार राहणार नाही. त्याचा थेट फायदा हा बिल्डर लॉबीला होणार आहे.संस्थांनी ३१ जुलैपर्यंत लेखापरीक्षण पूर्ण करून सादर करावे, अन्यथा त्यांना कोणतीच दयामया दाखविली जाणार नसल्याचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जनजागृतीसाठी विविध बॅनरही लावले होते, मात्र अद्यापही कोणी गांभीर्याने घेतले नसल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यामध्ये सुमारे चार हजार सहकारी संस्था आहेत, पैकी दोन हजार गृहनिर्माण संस्था आहेत. एका इमारतीमध्ये सुमारे १२ फ्लॅट असून त्यात प्रत्येकी पाच व्यक्ती राहतात. त्यांची संख्या सुमारे २४ हजार फ्लॅट आणि सव्वा लाख व्यक्तींची संख्या होते. त्यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ येऊ शकते असे, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग खोडका यांनी ‘लोकमत’ला सांगितले. संस्थांनी काय करावे?दप्तर नोंदणी करावी.हिशेब चोख ठेवावा.पत्रव्यवहार करावा.लेखापरीक्षण वेळेत पूर्ण करावे.आॅनलाइन रिटर्न भरावे.अहवाल सादर करावा.