शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घणसोली परिसरात विहिरी बुजविण्याचा प्रयत्न सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 02:45 IST

विहिरीभोवताली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असूनही अतिक्र मण विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे नवी मुंबईतील अनेक विहिरींची पार दुर्दशा झाली आहे. आठही विभाग कार्यक्षेत्रातील विहिरींची गंभीर समस्या असल्यामुळे दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्याच्या वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान केवळ दिखावूपणा असल्यामुळे या अभियानाची अक्षरश: पायमल्ली होत असल्याचे बोलले जाते. विहिरीभोवताली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असूनही अतिक्र मण विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.बेलापूर ते दिघा या एकूण आठ विभागाच्या कार्यक्षेत्रात विहिरींची एकूण संख्या ९४ आहे. त्यापैकी हाताच्या बोटावर मोजता येण्या एवढ्या विहिरी तलावांच्या मध्यभागी आहेत. इतर विहिरी गावठाणाच्या मध्यभागी आणि गावठाणाबाहेर आहेत. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींच्या साफसफाई आणि दुरु स्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक विहिरीचा शेवाळ आणि पानफुटी तसेच जंगली झाडांच्या लहान-मोठ्या फांद्यांमुळे वापर होत नाही. घणसोली गावातील तीन बावडी परिसरातील विहिरीवर बांधकाम साहित्य तसेच केरकचरा टाकून विहिरींना विळखा घालून त्या काही भूमाफियांनी बुजविण्याचा प्रयत्न चालविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.घणसोलीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डर्स लॉबीकडून तर नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी याच विहिरीच्या पाण्याचा वापर सर्रासपणे केला जात आहे. शासकीय सुट्टीबरोबर शासकीय कामकाजाच्या दिवशीही येथे बांधकामे सुरू असूनही घणसोली अतिक्र मण विभागाचे संबंधित अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. विहिरींचे लोखंडी जाळ्यांचे संरक्षण ग्रील अनेक ठिकाणी गंजलेल्या आहेत, तर अनेक विहिरीच्या जाळ्या गायब आहेत.उघड्या गटारांची समस्या कायम आहे. वाढत्या अनधिकृत बांधकाम करणा-या व्यावसायिकांकडून गटारावरील आरसीसी झाकणे गायब होण्याचे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वच्छ भारत सर्वेक्षणात नवी मुंबईतील सर्व तलाव, विहिरी आणि उघडी गटारे यांची पाहणी करून या प्रकरणी दोषी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी कार्यकारी अभियंता संजय देसाई यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील विहिरींची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगितले.विहिरींची विभागवार आकडेवारी : बेलापूर- ८, नेरुळ- १२, तुर्भे- १२, वाशी- ३, कोपरखैरणे- १३, घणसोली- २१, ऐरोली- १७ आणि दिघा- ८ अशी आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई