शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

घणसोली परिसरात विहिरी बुजविण्याचा प्रयत्न सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 02:45 IST

विहिरीभोवताली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असूनही अतिक्र मण विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे नवी मुंबईतील अनेक विहिरींची पार दुर्दशा झाली आहे. आठही विभाग कार्यक्षेत्रातील विहिरींची गंभीर समस्या असल्यामुळे दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्याच्या वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान केवळ दिखावूपणा असल्यामुळे या अभियानाची अक्षरश: पायमल्ली होत असल्याचे बोलले जाते. विहिरीभोवताली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असूनही अतिक्र मण विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.बेलापूर ते दिघा या एकूण आठ विभागाच्या कार्यक्षेत्रात विहिरींची एकूण संख्या ९४ आहे. त्यापैकी हाताच्या बोटावर मोजता येण्या एवढ्या विहिरी तलावांच्या मध्यभागी आहेत. इतर विहिरी गावठाणाच्या मध्यभागी आणि गावठाणाबाहेर आहेत. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींच्या साफसफाई आणि दुरु स्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक विहिरीचा शेवाळ आणि पानफुटी तसेच जंगली झाडांच्या लहान-मोठ्या फांद्यांमुळे वापर होत नाही. घणसोली गावातील तीन बावडी परिसरातील विहिरीवर बांधकाम साहित्य तसेच केरकचरा टाकून विहिरींना विळखा घालून त्या काही भूमाफियांनी बुजविण्याचा प्रयत्न चालविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.घणसोलीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डर्स लॉबीकडून तर नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी याच विहिरीच्या पाण्याचा वापर सर्रासपणे केला जात आहे. शासकीय सुट्टीबरोबर शासकीय कामकाजाच्या दिवशीही येथे बांधकामे सुरू असूनही घणसोली अतिक्र मण विभागाचे संबंधित अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. विहिरींचे लोखंडी जाळ्यांचे संरक्षण ग्रील अनेक ठिकाणी गंजलेल्या आहेत, तर अनेक विहिरीच्या जाळ्या गायब आहेत.उघड्या गटारांची समस्या कायम आहे. वाढत्या अनधिकृत बांधकाम करणा-या व्यावसायिकांकडून गटारावरील आरसीसी झाकणे गायब होण्याचे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वच्छ भारत सर्वेक्षणात नवी मुंबईतील सर्व तलाव, विहिरी आणि उघडी गटारे यांची पाहणी करून या प्रकरणी दोषी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी कार्यकारी अभियंता संजय देसाई यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील विहिरींची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगितले.विहिरींची विभागवार आकडेवारी : बेलापूर- ८, नेरुळ- १२, तुर्भे- १२, वाशी- ३, कोपरखैरणे- १३, घणसोली- २१, ऐरोली- १७ आणि दिघा- ८ अशी आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई