शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

गावठाणांची ओळख पुसण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 25, 2017 03:22 IST

महापालिकेच्या तीन हजार कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पामध्ये गावठाणांच्या विकासासाठी अत्यंत अल्प तरतूद करण्यात आली आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या तीन हजार कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पामध्ये गावठाणांच्या विकासासाठी अत्यंत अल्प तरतूद करण्यात आली आहे. गावांचे स्वतंत्र अस्तित्व लक्षात यावे यासाठी गावच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी प्रत्येक वर्षी करतात. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूदच केलेली नसल्याने स्वागत कमानींचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळाले आहे. नवी मुंबईमधून भूमिपुत्रांच्या मूळ गावांचे अस्तित्व संपुष्टात येवू लागले आहे. शहराचे नियोजन करताना गावठाणांना खड्यासारखे बाजूला ठेवण्यात आले. सावली गावातील सर्व बांधकामे अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्यात आली. या गावाचे अस्तित्व संपले आहे. सानपाडामधील सोनखारच्या जागेवर श्रीमंतांसाठीचे टॉवर उभे राहिले आहेत. जुईनगरमधील विकसित नोडच्या मध्ये जुई गाव आहे याची माहिती त्या परिसरातील नागरिकांनाही नाही. बोनसरी, दिघा, इलठाणपाडा या गावांचे अस्तित्व संपून त्यांची ओळख झोपडपट्टी अशी झाली आहे. इतरही अनेक गावांचे स्वतंत्र अस्तित्वच संपू लागले आहे. गावठाण हे शहराचे वैभव आहे. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकले पाहिजे. मूळ गावांमधील तलाव, गावदेवी मंदिर, येथील संस्कृती व लोककला जगल्या पाहिजेत. पण याविषयी महापालिका प्रशासनास आस्था राहिलेली नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार स्थायी समितीचे पहिल्यांदा सभापती झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक गावाच्या प्रवेशद्वारांवर स्वागत कमानी उभारण्यात याव्यात, त्यावर गावांचे नाव स्पष्टपणे लिहिण्यात यावे. गावाचे स्वतंत्र अस्तित्व लक्षात यावे अशी मागणी करून त्यासाठी स्वतंत्र हेड तयार केला होता. पाच वर्षांमध्ये महापालिकेने कुकशेत गावामध्ये दोन प्रवेशद्वारे उभारली आहेत. या प्रवेशद्वारांमुळे कुकशेत गावाचे अस्तित्व तेथील रोडवरून जाताना स्पष्टपणे दिसते. पण इतर गावांमध्ये अशाप्रकारच्या स्वागतकमानी उभारण्यात आलेल्या नाहीत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१७ - १८ साठी तब्बल तीन हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये वाशी, ऐरोली, दिघा, शिळफाटा व बेलापूर येथे प्रवेशद्वार उभारण्यासाठी फक्त १ लाख रूपयांची तरतूद केली आहे. यामध्ये गावठाणांमध्ये प्रवेशद्वार उभारण्याची तरतूदच केलेली नाही. यामुळे प्रशासनाला शहराच्या प्रवेशद्वारावरही स्वागत कमानी उभारायच्या नाहीत. यामुळे गावठाणांच्या प्रवेशद्वारांचा प्रश्नच उरलेला नाही. घणसोलीमधील वॉक विथ कमिशनर उपक्रमामध्ये तळवलीमधील काही ग्रामस्थांनी प्रवेशद्वार उभारण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. पण आयुक्तांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. अत्यावश्यक सुविधांवर खर्च करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पण दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली रंगरंगोटीवर लाखो रूपये खर्च केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)