शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणांची ओळख पुसण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 25, 2017 03:22 IST

महापालिकेच्या तीन हजार कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पामध्ये गावठाणांच्या विकासासाठी अत्यंत अल्प तरतूद करण्यात आली आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या तीन हजार कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पामध्ये गावठाणांच्या विकासासाठी अत्यंत अल्प तरतूद करण्यात आली आहे. गावांचे स्वतंत्र अस्तित्व लक्षात यावे यासाठी गावच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी प्रत्येक वर्षी करतात. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूदच केलेली नसल्याने स्वागत कमानींचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळाले आहे. नवी मुंबईमधून भूमिपुत्रांच्या मूळ गावांचे अस्तित्व संपुष्टात येवू लागले आहे. शहराचे नियोजन करताना गावठाणांना खड्यासारखे बाजूला ठेवण्यात आले. सावली गावातील सर्व बांधकामे अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्यात आली. या गावाचे अस्तित्व संपले आहे. सानपाडामधील सोनखारच्या जागेवर श्रीमंतांसाठीचे टॉवर उभे राहिले आहेत. जुईनगरमधील विकसित नोडच्या मध्ये जुई गाव आहे याची माहिती त्या परिसरातील नागरिकांनाही नाही. बोनसरी, दिघा, इलठाणपाडा या गावांचे अस्तित्व संपून त्यांची ओळख झोपडपट्टी अशी झाली आहे. इतरही अनेक गावांचे स्वतंत्र अस्तित्वच संपू लागले आहे. गावठाण हे शहराचे वैभव आहे. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकले पाहिजे. मूळ गावांमधील तलाव, गावदेवी मंदिर, येथील संस्कृती व लोककला जगल्या पाहिजेत. पण याविषयी महापालिका प्रशासनास आस्था राहिलेली नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार स्थायी समितीचे पहिल्यांदा सभापती झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक गावाच्या प्रवेशद्वारांवर स्वागत कमानी उभारण्यात याव्यात, त्यावर गावांचे नाव स्पष्टपणे लिहिण्यात यावे. गावाचे स्वतंत्र अस्तित्व लक्षात यावे अशी मागणी करून त्यासाठी स्वतंत्र हेड तयार केला होता. पाच वर्षांमध्ये महापालिकेने कुकशेत गावामध्ये दोन प्रवेशद्वारे उभारली आहेत. या प्रवेशद्वारांमुळे कुकशेत गावाचे अस्तित्व तेथील रोडवरून जाताना स्पष्टपणे दिसते. पण इतर गावांमध्ये अशाप्रकारच्या स्वागतकमानी उभारण्यात आलेल्या नाहीत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१७ - १८ साठी तब्बल तीन हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये वाशी, ऐरोली, दिघा, शिळफाटा व बेलापूर येथे प्रवेशद्वार उभारण्यासाठी फक्त १ लाख रूपयांची तरतूद केली आहे. यामध्ये गावठाणांमध्ये प्रवेशद्वार उभारण्याची तरतूदच केलेली नाही. यामुळे प्रशासनाला शहराच्या प्रवेशद्वारावरही स्वागत कमानी उभारायच्या नाहीत. यामुळे गावठाणांच्या प्रवेशद्वारांचा प्रश्नच उरलेला नाही. घणसोलीमधील वॉक विथ कमिशनर उपक्रमामध्ये तळवलीमधील काही ग्रामस्थांनी प्रवेशद्वार उभारण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. पण आयुक्तांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. अत्यावश्यक सुविधांवर खर्च करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पण दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली रंगरंगोटीवर लाखो रूपये खर्च केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)