शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

आश्रय मिळाला, तरी घरची ओढ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:43 IST

सध्या पनवेल महापालिका क्षेत्रातील केंद्रामध्ये अनेक लोक वास्तव्यास आहेत.

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : लॉकडाउनदरम्यान गावी जाण्यासाठी निघालेले, गरीब, गरजू, कामगारांना प्रशासनाकडून आधार दिला जात आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रातील केंद्रामध्ये अनेक लोक वास्तव्यास आहेत.दाढी-केस वाढलेले, कुणाचे लहान बाळ दुडुदुडु धावतेय तर काही महिला आपल्या सुखादु:खाच्या गुजगोष्टी करताना निवारा केंद्रात दिसत आहेत. इथे खायला-प्यायला वेळच्या वेळी मिळत आहे. आधी झोपडीत राहत होतो, इथे इमारतीत पंख्याखाली सतरंजीवर झोपतोय. तरीही गावाकडची, घरची ओढ लागल्याचे मत निवारा केंद्रातील आश्रित व्यक्त करीत आहेत.मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात गरीब, मजूर, बिगारी कामगार, आपल्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले आहेत. यात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. पैशाविना उपासमारीची वेळ आली आहे. गावी जावे तर वाहने बंद आहेत. काही प्रमाणात चालत गावी निघालो असता पोलिसांनी अटकाव करत निवारा केंद्रात राहण्यास सांगितले आहे. याकरिता पनवेल महापालिका क्षेत्रात बेघर, निराधार, मजूर, विस्थापितांसाठी तालुका क्रीडा संकूल, कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, व्ही.के. हायस्कूल, कळंबोली येथील काळभैरव मंगल कार्यालय या चार ठिकाणी महापालिकेकडून व्यवस्था करण्यात आली आहे.चारही केंद्रांत १०७ व्यक्ती वास्तव्यास आहेत. दररोज अल्पोपाहार, चहा आणि दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण महापालिकेने स्थापन केलेल्या कम्युनिटी किचनद्वारे दिले जाते. त्याचबरोबर संध्याकाळी सात वाजता करमणूक तसेच दैनंदिन घडामोडीचे बातमीपत्र पाहण्याचीही सामाजिक अंतर ठेवून व्यवस्था केली आहे.>राज्यस्थान, मध्य प्रदेश, कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, घाटमाथ्यावरील मजूर या चार केंद्रात आहेत. राहण्याची व्यवस्था चांगली आहे. नाश्ता-जेवण वेळेवर मिळते आहे. परंतु आई-वडील, मुले, घरी आहेत. घराची, कुटुंबाची आठवण येत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. अनेकांच्या मोबाइलमधील रीचार्ज संपले असल्याने गावी फोन करता येत नाही आणि आपली खुशालीही कळवता येत नसल्याये दु:ख त्यांच्या चेहºयावर दिसत आहे.