शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

आश्रय मिळाला, तरी घरची ओढ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:43 IST

सध्या पनवेल महापालिका क्षेत्रातील केंद्रामध्ये अनेक लोक वास्तव्यास आहेत.

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : लॉकडाउनदरम्यान गावी जाण्यासाठी निघालेले, गरीब, गरजू, कामगारांना प्रशासनाकडून आधार दिला जात आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रातील केंद्रामध्ये अनेक लोक वास्तव्यास आहेत.दाढी-केस वाढलेले, कुणाचे लहान बाळ दुडुदुडु धावतेय तर काही महिला आपल्या सुखादु:खाच्या गुजगोष्टी करताना निवारा केंद्रात दिसत आहेत. इथे खायला-प्यायला वेळच्या वेळी मिळत आहे. आधी झोपडीत राहत होतो, इथे इमारतीत पंख्याखाली सतरंजीवर झोपतोय. तरीही गावाकडची, घरची ओढ लागल्याचे मत निवारा केंद्रातील आश्रित व्यक्त करीत आहेत.मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात गरीब, मजूर, बिगारी कामगार, आपल्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले आहेत. यात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. पैशाविना उपासमारीची वेळ आली आहे. गावी जावे तर वाहने बंद आहेत. काही प्रमाणात चालत गावी निघालो असता पोलिसांनी अटकाव करत निवारा केंद्रात राहण्यास सांगितले आहे. याकरिता पनवेल महापालिका क्षेत्रात बेघर, निराधार, मजूर, विस्थापितांसाठी तालुका क्रीडा संकूल, कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, व्ही.के. हायस्कूल, कळंबोली येथील काळभैरव मंगल कार्यालय या चार ठिकाणी महापालिकेकडून व्यवस्था करण्यात आली आहे.चारही केंद्रांत १०७ व्यक्ती वास्तव्यास आहेत. दररोज अल्पोपाहार, चहा आणि दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण महापालिकेने स्थापन केलेल्या कम्युनिटी किचनद्वारे दिले जाते. त्याचबरोबर संध्याकाळी सात वाजता करमणूक तसेच दैनंदिन घडामोडीचे बातमीपत्र पाहण्याचीही सामाजिक अंतर ठेवून व्यवस्था केली आहे.>राज्यस्थान, मध्य प्रदेश, कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, घाटमाथ्यावरील मजूर या चार केंद्रात आहेत. राहण्याची व्यवस्था चांगली आहे. नाश्ता-जेवण वेळेवर मिळते आहे. परंतु आई-वडील, मुले, घरी आहेत. घराची, कुटुंबाची आठवण येत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. अनेकांच्या मोबाइलमधील रीचार्ज संपले असल्याने गावी फोन करता येत नाही आणि आपली खुशालीही कळवता येत नसल्याये दु:ख त्यांच्या चेहºयावर दिसत आहे.