शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

आश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 15:54 IST

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

पनवेल : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात आम्ही सप्टेंबर २०१६ रोजी  नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती . या भेटीत आम्हाला काहीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही . तसेच कोणतेही  सहकार्य न करता उलट आम्हालाच भीती दाखविण्याचा प्रयत्न नगराळे यांनी केला . या प्रकरणात तुमच्या जीवाला धोका आहे . तुम्ही सावध रहा असे आयुक्तांनी आम्हाला सांगितले . पोलिसांकडे या प्रकरणात कुरुंदकर आरोपी असलेल्या  ऑडिओ व्हिडीओ उपलब्ध असताना देखील या प्रकरणी पोलिसांनी कुरुंदकर विरोधी गुन्हा दाखल केला नव्हता . पोलीस सहकार्य करीत नसल्याने ऑक्टॉबर २०१६ रोजी आम्ही न्यायालयात धाव घेतल्यांनंतर न्यायालयाने यासंदर्भात तपासाला गती दिली .त्यांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर  ३१ जानेवारी २०१७ रोजी अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले . या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने आम्ही १६ नोव्हेंबर २०१७  रोजी प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय आल्यांनतर हा विषय दृष्टीक्षेपात आला . आम्ही ज्यावेळी आयुक्तांना पुराव्याचे  दाखले देत कुरुंदकर यांना अटक करण्याची मागणी केली ते पुरावे सबळ नसल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले . मात्र याच प्रकरणी जेव्हा आम्ही न्यायालयात धाव घेतली तेव्हा या पुराव्यांच्या आधारावर आरोपीना अटक करण्यात आली असल्याचे अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे यांनी सांगितले . या प्रकरणी आयुक्त नगराळे यांनी हे प्रकरण दडविण्याचे प्रयत्न केल्याने त्यांना प्रकरणी सहआरोपी करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत आनंद बिद्रे यांनी केले.          ११ एप्रिल २०१६ रोजी संध्याकाळी ८ ते ११ वाजे पर्यंत अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर हे सोबत होते . यांनतर रात्री ११  वाजता अभय कुरुंदकर याने राजेश पाटील ला फोन केला . तेव्हापासून आश्विनी बेपत्ता आहे होत्या  आणि त्यांचा फोन देखील तेव्हापासून बंद होता . यांनतर १४ एप्रिल रोजी केवळ एका व्हाट्अँप मेसेज पाठविण्यापुरता त्यांचा फोन चालू होता . त्यानंतर  अश्विनी बेपत्ता पुन्हा कोणालाच दिसल्या नाहीत असे आनंद बिद्रे यांनी सांगितले . अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण केवळ प्रसार माध्यमांमुळे बाहेर आले . प्रसार माध्यमांनी बातम्या दाखविल्यानांतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असे यावेळी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले . आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपासंदर्भात आयुक्तांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल