शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

आश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 15:54 IST

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

पनवेल : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात आम्ही सप्टेंबर २०१६ रोजी  नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती . या भेटीत आम्हाला काहीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही . तसेच कोणतेही  सहकार्य न करता उलट आम्हालाच भीती दाखविण्याचा प्रयत्न नगराळे यांनी केला . या प्रकरणात तुमच्या जीवाला धोका आहे . तुम्ही सावध रहा असे आयुक्तांनी आम्हाला सांगितले . पोलिसांकडे या प्रकरणात कुरुंदकर आरोपी असलेल्या  ऑडिओ व्हिडीओ उपलब्ध असताना देखील या प्रकरणी पोलिसांनी कुरुंदकर विरोधी गुन्हा दाखल केला नव्हता . पोलीस सहकार्य करीत नसल्याने ऑक्टॉबर २०१६ रोजी आम्ही न्यायालयात धाव घेतल्यांनंतर न्यायालयाने यासंदर्भात तपासाला गती दिली .त्यांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर  ३१ जानेवारी २०१७ रोजी अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले . या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने आम्ही १६ नोव्हेंबर २०१७  रोजी प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय आल्यांनतर हा विषय दृष्टीक्षेपात आला . आम्ही ज्यावेळी आयुक्तांना पुराव्याचे  दाखले देत कुरुंदकर यांना अटक करण्याची मागणी केली ते पुरावे सबळ नसल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले . मात्र याच प्रकरणी जेव्हा आम्ही न्यायालयात धाव घेतली तेव्हा या पुराव्यांच्या आधारावर आरोपीना अटक करण्यात आली असल्याचे अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे यांनी सांगितले . या प्रकरणी आयुक्त नगराळे यांनी हे प्रकरण दडविण्याचे प्रयत्न केल्याने त्यांना प्रकरणी सहआरोपी करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत आनंद बिद्रे यांनी केले.          ११ एप्रिल २०१६ रोजी संध्याकाळी ८ ते ११ वाजे पर्यंत अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर हे सोबत होते . यांनतर रात्री ११  वाजता अभय कुरुंदकर याने राजेश पाटील ला फोन केला . तेव्हापासून आश्विनी बेपत्ता आहे होत्या  आणि त्यांचा फोन देखील तेव्हापासून बंद होता . यांनतर १४ एप्रिल रोजी केवळ एका व्हाट्अँप मेसेज पाठविण्यापुरता त्यांचा फोन चालू होता . त्यानंतर  अश्विनी बेपत्ता पुन्हा कोणालाच दिसल्या नाहीत असे आनंद बिद्रे यांनी सांगितले . अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण केवळ प्रसार माध्यमांमुळे बाहेर आले . प्रसार माध्यमांनी बातम्या दाखविल्यानांतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असे यावेळी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले . आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपासंदर्भात आयुक्तांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल