शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 15:54 IST

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

पनवेल : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात आम्ही सप्टेंबर २०१६ रोजी  नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती . या भेटीत आम्हाला काहीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही . तसेच कोणतेही  सहकार्य न करता उलट आम्हालाच भीती दाखविण्याचा प्रयत्न नगराळे यांनी केला . या प्रकरणात तुमच्या जीवाला धोका आहे . तुम्ही सावध रहा असे आयुक्तांनी आम्हाला सांगितले . पोलिसांकडे या प्रकरणात कुरुंदकर आरोपी असलेल्या  ऑडिओ व्हिडीओ उपलब्ध असताना देखील या प्रकरणी पोलिसांनी कुरुंदकर विरोधी गुन्हा दाखल केला नव्हता . पोलीस सहकार्य करीत नसल्याने ऑक्टॉबर २०१६ रोजी आम्ही न्यायालयात धाव घेतल्यांनंतर न्यायालयाने यासंदर्भात तपासाला गती दिली .त्यांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर  ३१ जानेवारी २०१७ रोजी अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले . या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने आम्ही १६ नोव्हेंबर २०१७  रोजी प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय आल्यांनतर हा विषय दृष्टीक्षेपात आला . आम्ही ज्यावेळी आयुक्तांना पुराव्याचे  दाखले देत कुरुंदकर यांना अटक करण्याची मागणी केली ते पुरावे सबळ नसल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले . मात्र याच प्रकरणी जेव्हा आम्ही न्यायालयात धाव घेतली तेव्हा या पुराव्यांच्या आधारावर आरोपीना अटक करण्यात आली असल्याचे अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे यांनी सांगितले . या प्रकरणी आयुक्त नगराळे यांनी हे प्रकरण दडविण्याचे प्रयत्न केल्याने त्यांना प्रकरणी सहआरोपी करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत आनंद बिद्रे यांनी केले.          ११ एप्रिल २०१६ रोजी संध्याकाळी ८ ते ११ वाजे पर्यंत अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर हे सोबत होते . यांनतर रात्री ११  वाजता अभय कुरुंदकर याने राजेश पाटील ला फोन केला . तेव्हापासून आश्विनी बेपत्ता आहे होत्या  आणि त्यांचा फोन देखील तेव्हापासून बंद होता . यांनतर १४ एप्रिल रोजी केवळ एका व्हाट्अँप मेसेज पाठविण्यापुरता त्यांचा फोन चालू होता . त्यानंतर  अश्विनी बेपत्ता पुन्हा कोणालाच दिसल्या नाहीत असे आनंद बिद्रे यांनी सांगितले . अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण केवळ प्रसार माध्यमांमुळे बाहेर आले . प्रसार माध्यमांनी बातम्या दाखविल्यानांतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असे यावेळी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले . आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपासंदर्भात आयुक्तांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल