शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कोपरखैरणेत फेरीवाल्यांवर केला कारवाईचा दिखाऊपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:50 IST

पालिकेची धूळफेक; कमिटीच्या आगमनापूर्वी रस्ते स्वच्छ, नंतर जैसे थे

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या वाढत चालली आहे. त्यावर केवळ स्वच्छता सर्व्हेक्षणाच्या कालावधीतच कारवाया होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तात्पुरती स्वच्छता करून पुरस्कार पटकावण्याचा डाव पालिका अधिकारी रचत असल्याचे उघड होत आहे.महापालिकेला नुकताच स्वच्छता सर्वेक्षणात देशात तिसरा व राज्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशातच पुन्हा एकदा शहर स्वच्छता सर्वेक्षणासाठी पालिका सज्ज झाली आहे. त्याकरिता विभागनिहाय पाहणी सुरू आहे. मात्र, या पाहणी कमिटीच्या आगमनापूर्वी रस्ते व परिसर स्वच्छ केले जात असून, त्यांनी पाठ फिरवताच परिस्थिती तशीच पाहायला मिळत आहे. पालिकेची फेरीवाल्यांवर होणारी कारवाई दिखाऊ असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.कोपरखैरणे सेक्टर १५ ते १८ दरम्यानच्या रस्त्यावरील अतिक्रमण वाढतच चालले आहे. प्रत्येक विभागात राखीव भाजीपाला मार्केटच्या बाहेरचे रस्ते फेरीवाल्यांची बळकावले आहेत. सातत्याने तक्रार होऊनही तिथले रस्ते मोकळे होऊ शकलेले नाहीत. मात्र, मंगळवारी या विभागाचा पाहणी दौरा होणार असल्याने संपूर्ण रस्ता फेरीवाला मुक्त करून साफसफाई करण्यात आली. त्यामुळे काही तासासाठी का होईना, रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा तिथे बाजार बसल्याचे पाहायला मिळाले. यावरून केवळ पाहणी कमिटीच्या स्वागतासाठी शहर स्वच्छ होत असल्याचे उघड होत आहे, परंतु केवळ पुरस्कार पटकावण्याची दिखाव्यासाठी तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी शहर फेरीवाला मुक्त करून स्वच्छ करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.शहराबाहेरच्यांना मिळतोय राजकीय वरदहस्त कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, नेरुळ विभागात अनधिकृत फेरीवाले मोठी समस्या बनले आहेत. बहुतांश फेरीवाले शहराबाहेरचे असून, त्यांना काही अधिकाऱ्यांसह राजकीय वरदहस्त लाभत आहे. यामागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण शिजत आहे. त्याच उद्देशाने फेरीवाल्यांकडे कारवाईकडे कानाडोळा होत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यात सिडको व पालिका अधिकारीही संगनमताने उद्देश साध्य करून घेत असल्याचा आरोप होत आहे.