शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत हापूसला मिळतेय ‘गोड’ वागणूक; आंबा व्यवस्थापनासाठी यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 08:22 IST

वाहतूककोंडी टाळण्यासाठी तयार केली नियमावली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये चार महिने आंब्याचे वर्चस्व असते. हंगाम काळात वाहतूककोंडी टाळण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या योग्य नियोजनासाठी व्यापारी संघटना व प्रशासनाने विशेष नियमावली तयार केली आहे. आंब्याची आवक विनाअडथळा होण्यासाठी स्वतंत्र गेट निश्चित करून कलिंगड, टरबूजसारख्या फळांना दुपारी तीननंतर मार्केट प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये वर्षभर रोज २५० ते ३०० वाहनांची आवक होत असते. परंतु आंबा हंगामात रोजची आवक ६०० ते ७०० वाहनांवर पोहोचते. सद्य:स्थितीमध्ये प्रतिदिन ५०० पेक्षा जास्त वाहनांची आवक सुरू आहे. १५ मार्चनंतर आंब्याची आवक प्रचंड वाढण्याचा अंदाज आहे. 

व्यापाऱ्यांना संघटनेचे आवाहन 

हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. बाजार समिती प्रशासनानेही आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. आंब्याच्या सर्व वाहनांना गेट क्रमांक ३ मधून मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, तर माल घेऊन येणाऱ्या फळांची गाडी चार तासांपेक्षा जास्त काळ मार्केटमध्ये उभी राहणार नाही, याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत. व्यापाऱ्यांची खासगी वाहने गेट क्रमांक पाचमधून आत येण्याची व्यवस्था केली आहे. 

दहा दिवसांत दोन लाख दंड

आंबा हंगामासाठी नियमावली निश्चित केल्यानंतर वाहनांमध्ये व मोकळ्या पॅसेजमध्ये व्यवसाय करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. दहा दिवसांमध्ये दोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘या’ वेळात आणा कलिंगड, टरबूज 

कलिंगड, टरबूजचे ट्रक दुपारी ३ ते रात्री ११ या कालावधीमध्ये मार्केटमध्ये आणण्याच्या सूचना आहेत. वाहतूककोंडीचे नियोजन करण्यासाठी जादा सुरक्षारक्षकही तैनात केले जाणार आहेत. वाहनांमध्ये व्यापार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 

आंबा हंगामामध्ये वाहनांची संख्या वाढते. या कालावधीमध्ये व्यापार सुरळीत व्हावा, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. नियमांचे पालन  करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. - संगीता अढांगळे, उपसचिव, फळ मार्केट 

 

टॅग्स :Mangoआंबा