शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी चळवळीला उजाळा

By admin | Updated: April 15, 2017 03:32 IST

कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला. ही पद्धत रद्द करण्यासाठीचे विधेयक मुंबई असेंबलीमध्ये मांडले. चवदार तळे

- नामदेव मोरे, नवी मुंबई

कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला. ही पद्धत रद्द करण्यासाठीचे विधेयक मुंबई असेंबलीमध्ये मांडले. चवदार तळे, ‘मनुस्मृती’ दहन ही आंदोलनेही याच परिसरामध्ये झाली. बाबासाहेबांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमधून या लढ्यांच्या आठवणींनाही उजाळा मिळाला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई, पनवेल, उरणसह रायगडमधील प्रत्येक शहर व गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी आंबेडकरी चळवळीचा प्रवास मांडणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमगीतांसह व्याख्यानांच्या माध्यमातूनही चळवळीच्या विविध टप्प्यांवर लक्ष वेधण्यात आले. १९२७मध्ये बाबासाहेब मुंबई विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात लढ्यास सुरुवात केली. कोकणामध्ये विविध ठिकाणी परिषदांचे आयोजन करून त्यांच्यामध्ये जागृती करण्यात आली. २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाडमध्ये चवदार तळ्याचे आंदोलन व ‘मनुस्मृती’चे दहन केल्याची चर्चा देशभर झाली. शेतकरी नेते नारायण नागो पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरी कोपरमध्ये २५ गावांमधील शेतकऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. जगातील सर्वात मोठ्या संपाला १९३४ मध्ये बाबासाहेबांनी भेट दिली. खोती पद्धत नष्ट करण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केले. सप्टेंबर १९३७ मध्ये खोती पद्धत बरखास्त करण्यासाठी मुंबई असेंबलीमध्ये बिल मांडले होते. शहरात मिरवणूक, प्रबोधन फेरी, व्याख्यानाचे आयोजनशहरात प्रबोधन फेरी, सामुदायिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक, आरोग्य शिबिर, मोटारसायकल रॅली, निबंध व वर्क्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे अभूतपूर्व उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस दल, रिक्षाचालक संघटना, शासकीय इमारती आाणि कायालये, सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सानपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सेक्टर ८ परिसरातील हुतात्मा बाबू गेणू मैदान येथे प्रबोधनपर व्याख्यान तसेच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भदन्त बोधानंद यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी वसुंधरा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वज वंदन, बुद्धवंदना, धम्मदेसना करण्यात आले. संध्याकाळी महामानवांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.नॅशनल इंटीग्रेटी सोशल फाउंडेशनअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने जुईनगर सेक्टर २३ येथील गावदेवी मैदानात भीम-बुद्धगीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘क्रांतीचा वणवा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिसरातील विद्यार्थी, महिलावर्गाला विविध कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.रिक्षाचालकांचे रक्तदान सानपाडा रेल्वेस्टेशन बाहेरील नवी मुंबई रिक्षाचालक-मालक संघटना १५ वर्षांपासून शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करत आहेत. बाबासाहेबांच्या १२६व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रिक्षाचालकांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले. रात्री आंबेडकरी चळवळीला उजाळा देणाऱ्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विनोद जगताप, दिलीप लोखंडे, नंदू शिंदे, सुरेश ठोमरे, राजेंद्र कांबळे, किशोर पकिडे, सर्जेराव पटेकर व इतर सर्व रिक्षाचालकांनी परिश्रम घेतले. डॉ. बाबासाहेबांचे विचार उद्योगक्षेत्राला तारणारे - आर. के. गायकवाड देशातील औद्योगिक क्षेत्रात आर्थिक विषमता आहे. कामगारांचे शोषण, विकासाची गती मंदावली असून, रोजगारासाठी लोक शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे उद्योगांचे व्यवस्थापन करणे कठीण झाले आहे. याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या उद्योगक्षेत्राला तारणारे जे विचार दिले आहेत त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत नगरविकास खात्याचे माजी सहसचिव आर. के. गायकवाड यांनी व्यक्त केले. खारघर येथील ‘भारतीय उद्योग व्यवस्थापन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. शेती विकसित होण्यासाठी सामूहिक शेतीचा विचार बाबासाहेबांनी मांडल्याचे विचार या वेळी गायकवाड यांनी व्यक्त केले. सन्मानाने जगण्याची प्रेरणा बाबासाहेबांमुळे मिळालीजीवनात कितीही संकटे आली तरी न डगमगता वाटचाल करण्याची ताकद, तसेच सन्मानाने जगण्याची प्रेरणा व आत्मविश्वास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, असे विचार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे व्यक्त केले. शुक्र वारी सकाळी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, तहसीलदार दीपक आकडे, बौद्धजन पंचायतचे अध्यक्ष विजय गायकवाड, भीमसैनिक आदी उपस्थित होते. विविध चित्ररथांसह ढोल-ताशांच्या जल्लोषात शहरातून या वेळी मिरवणूक काढण्यात आली.आंबेडकर भवनाचे भूमिपूजनतळोजा : कळंबोलीतील सेक्टर ११ ई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. सरकारने या भवनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड यांनी दिली. कळंबोली सेक्टर ११ येथे १७०० स्क्वेअर मीटर जागेवर हे भवन उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी जयंती सोहळ्याचे औचित्य साधून भवनाचा शुभारंभ पार पडला. या वेळी सिडको कळंबोली अधीक्षक अभियंता रोकडे, कार्यकारी अभियंता कापसे, तसेच रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, रिपब्लिकन सेना कंळबोली शहराध्यक्ष विनोद गायकवाड, संजय सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.