शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आंबेडकरी चळवळीला उजाळा

By admin | Updated: April 15, 2017 03:32 IST

कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला. ही पद्धत रद्द करण्यासाठीचे विधेयक मुंबई असेंबलीमध्ये मांडले. चवदार तळे

- नामदेव मोरे, नवी मुंबई

कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला. ही पद्धत रद्द करण्यासाठीचे विधेयक मुंबई असेंबलीमध्ये मांडले. चवदार तळे, ‘मनुस्मृती’ दहन ही आंदोलनेही याच परिसरामध्ये झाली. बाबासाहेबांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमधून या लढ्यांच्या आठवणींनाही उजाळा मिळाला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई, पनवेल, उरणसह रायगडमधील प्रत्येक शहर व गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी आंबेडकरी चळवळीचा प्रवास मांडणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमगीतांसह व्याख्यानांच्या माध्यमातूनही चळवळीच्या विविध टप्प्यांवर लक्ष वेधण्यात आले. १९२७मध्ये बाबासाहेब मुंबई विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात लढ्यास सुरुवात केली. कोकणामध्ये विविध ठिकाणी परिषदांचे आयोजन करून त्यांच्यामध्ये जागृती करण्यात आली. २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाडमध्ये चवदार तळ्याचे आंदोलन व ‘मनुस्मृती’चे दहन केल्याची चर्चा देशभर झाली. शेतकरी नेते नारायण नागो पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरी कोपरमध्ये २५ गावांमधील शेतकऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. जगातील सर्वात मोठ्या संपाला १९३४ मध्ये बाबासाहेबांनी भेट दिली. खोती पद्धत नष्ट करण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केले. सप्टेंबर १९३७ मध्ये खोती पद्धत बरखास्त करण्यासाठी मुंबई असेंबलीमध्ये बिल मांडले होते. शहरात मिरवणूक, प्रबोधन फेरी, व्याख्यानाचे आयोजनशहरात प्रबोधन फेरी, सामुदायिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक, आरोग्य शिबिर, मोटारसायकल रॅली, निबंध व वर्क्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे अभूतपूर्व उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस दल, रिक्षाचालक संघटना, शासकीय इमारती आाणि कायालये, सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सानपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सेक्टर ८ परिसरातील हुतात्मा बाबू गेणू मैदान येथे प्रबोधनपर व्याख्यान तसेच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भदन्त बोधानंद यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी वसुंधरा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वज वंदन, बुद्धवंदना, धम्मदेसना करण्यात आले. संध्याकाळी महामानवांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.नॅशनल इंटीग्रेटी सोशल फाउंडेशनअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने जुईनगर सेक्टर २३ येथील गावदेवी मैदानात भीम-बुद्धगीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘क्रांतीचा वणवा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिसरातील विद्यार्थी, महिलावर्गाला विविध कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.रिक्षाचालकांचे रक्तदान सानपाडा रेल्वेस्टेशन बाहेरील नवी मुंबई रिक्षाचालक-मालक संघटना १५ वर्षांपासून शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करत आहेत. बाबासाहेबांच्या १२६व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रिक्षाचालकांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले. रात्री आंबेडकरी चळवळीला उजाळा देणाऱ्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विनोद जगताप, दिलीप लोखंडे, नंदू शिंदे, सुरेश ठोमरे, राजेंद्र कांबळे, किशोर पकिडे, सर्जेराव पटेकर व इतर सर्व रिक्षाचालकांनी परिश्रम घेतले. डॉ. बाबासाहेबांचे विचार उद्योगक्षेत्राला तारणारे - आर. के. गायकवाड देशातील औद्योगिक क्षेत्रात आर्थिक विषमता आहे. कामगारांचे शोषण, विकासाची गती मंदावली असून, रोजगारासाठी लोक शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे उद्योगांचे व्यवस्थापन करणे कठीण झाले आहे. याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या उद्योगक्षेत्राला तारणारे जे विचार दिले आहेत त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत नगरविकास खात्याचे माजी सहसचिव आर. के. गायकवाड यांनी व्यक्त केले. खारघर येथील ‘भारतीय उद्योग व्यवस्थापन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. शेती विकसित होण्यासाठी सामूहिक शेतीचा विचार बाबासाहेबांनी मांडल्याचे विचार या वेळी गायकवाड यांनी व्यक्त केले. सन्मानाने जगण्याची प्रेरणा बाबासाहेबांमुळे मिळालीजीवनात कितीही संकटे आली तरी न डगमगता वाटचाल करण्याची ताकद, तसेच सन्मानाने जगण्याची प्रेरणा व आत्मविश्वास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, असे विचार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे व्यक्त केले. शुक्र वारी सकाळी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, तहसीलदार दीपक आकडे, बौद्धजन पंचायतचे अध्यक्ष विजय गायकवाड, भीमसैनिक आदी उपस्थित होते. विविध चित्ररथांसह ढोल-ताशांच्या जल्लोषात शहरातून या वेळी मिरवणूक काढण्यात आली.आंबेडकर भवनाचे भूमिपूजनतळोजा : कळंबोलीतील सेक्टर ११ ई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. सरकारने या भवनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड यांनी दिली. कळंबोली सेक्टर ११ येथे १७०० स्क्वेअर मीटर जागेवर हे भवन उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी जयंती सोहळ्याचे औचित्य साधून भवनाचा शुभारंभ पार पडला. या वेळी सिडको कळंबोली अधीक्षक अभियंता रोकडे, कार्यकारी अभियंता कापसे, तसेच रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, रिपब्लिकन सेना कंळबोली शहराध्यक्ष विनोद गायकवाड, संजय सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.