शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सत्तेसाठी युती झाली असली तरी सेना-भाजपात कुरघोड्या सुरुच!

By admin | Updated: November 30, 2015 02:17 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये समझोता झाला असला तरी, राज्य पातळीवर त्यांच्यातील दुरावा अद्यापही कमी झालेला नाही

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये समझोता झाला असला तरी, राज्य पातळीवर त्यांच्यातील दुरावा अद्यापही कमी झालेला नाही. ठाणे, भिवंडी आदी ठिकाणी झालेल्या विविध कार्यक्रमांना भाजपाने हायजॅक केल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी या कार्यक्रमांना दांडी मारली. परंतु आता या दोन्ही पक्षांमधील दुरावा आणखीनच वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात कल्याण डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यातही शिवसेनेला आपली ताकद दाखवून देण्याकरिता भाजपाने एकला चलो रे चा नारा दिला आहे. एकूणच शिवसेना भाजपामधील ही खडाखडी आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत वाढणार व परस्परांमध्ये दुरावा निर्माण करणारी ठरणार आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडी करून लढली. परंतु शिवसेना, भाजपाने येथे वेगळी चूल मांडून निवडणूक लढविली. निवडणुकीचा प्रचार शिगेला गेल्यानंतर शिवसेना भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडल्या. परिणामी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. या निवडणुकीत भाजपा ३५ जागांपर्यंत मजल मारेल अशी आशा होती. परंतु त्यांनी थेट ४२ जागांवर मजल मारली. त्यामुळे शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले. अखेरच्या क्षणी समझोता झाला आणि शिवसेना, भाजपा सत्तेत एकत्र आले. परंतु त्यांच्यातील दुरावा आजही कायम आहे.कल्याण-डोंबिवलीत केवळ सत्तेसाठी समझोता झाला आहे. युतीमधील दुरावा एक्स्प्रेस आगामी काळात धावणार असल्याचे ठाण्यातील शिवसेना आणि भाजपाचे नेते खासगीत सांगत आहेत. कल्याण डोंबिवलीचा स्वबळाचा फॉर्म्युला यशस्वी झाल्याने, ठाण्यातही भाजपा त्या फॉर्म्युल्यावर ठाम असून एकत्र लढलो तर उपमहापौर, स्थायी आणि इतर काही समित्या मिळतील. परंतु आपली ताकद किती आहे ते सिध्द होणार नसल्याने हा दुरावा असाच कायम राहावा म्हणून, भाजपाने आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपाला आपल्या राजकीय फायद्याकरिता शिवसेनेशी फटकून वागायचे असले तरी काही स्थानिक नेते तसे होऊ नये याकरिता प्रयत्नशील आहेत. मात्र ठाण्यातील निवडणुकीत वेगळी चूल मांडून जमल्यास एकहाती सत्ता अथवा, अर्धाकाळ सत्ता मिळवायची अशी गणिते भाजपाकडून पक्की केली जात आहेत. भाजपाला शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आपली शक्ती अजमावून पाहायची आहे तर शिवसेना आपल्याला भाजपा या जुन्या मित्राकडून वरचेवर दगाफटका केला जात असल्याचे दाखवून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.