शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

पुरणपोळीसोबत होळीला चाखा आमरसाचाही गोडवा

By नामदेव मोरे | Updated: March 18, 2024 19:47 IST

४९ हजार पेट्यांची आवक : हापूसचे दरही नियंत्रणात येण्यास सुरुवात.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी ४९ हजार पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ३०० ते १ हजार रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १८०० रुपये डझन दराने विकला जात आहे. यापुढे आवक वाढतच राहणार असल्यामुळे होळीला मुंबईकरांना मुबलक प्रमाणात आंब्याची चव चाखता येणार आहे.

प्रत्येक वर्षी गुढी पाडव्यापासून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असते. परंतु यावर्षी होळीलाच मार्केट आंबामय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये कोकणातून ३९ हजार ४२४ व इतर राज्यातून ९५७६ पेट्या अशी एकूण ४९ हजार पेट्यांची आवक झाली आहे. एक आठवड्यापुर्वी आंबा ४०० ते ११०० रुपये डझन दराने बाजार समितीमध्ये विकला जात होता. आता हे दर १०० रुपयांनी घसरून ३०० ते १ हजार रुपयांवर आले आहेत. यापुढे २० एप्रिलपर्यंत आवक वाढतच राहणार आहे. होळीच्या सणाला पोळीसोबत आंबरसाचा आनंद घेता येणार आहे. किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १८०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री हात असली तरी यापुढे हे दरही कमी होण्यास सुरुवात होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडसह कर्नाटक, केरळ व आंधप्रदेशमधूनही आंब्याची आवक सुरू झाली आहे.

बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की यावर्षी मार्च ते २० एप्रिलदरम्यान आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. आंब्याचे दरही नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. हापूसही सामान्याच्या आवाक्यात येणार असून ओळीला सर्वांना हापूसची चव चाखता येणार आहे. मे महिन्यामध्येही आंब्याची आवक चांगली होईल. हापूस बरोबर इतर राज्यातील आंब्याची आवकही वाढण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई