शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दिघावासीयांना पुरवठा होणाऱ्या पाण्यात अळ्यांचे सत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:23 IST

दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात अळ्या आढळण्याचे सत्र सुरूच असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात अळ्या आढळण्याचे सत्र सुरूच असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आक्र मक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने महापौर जयवंत सुतार यांनी कामाच्या मंजुरीसाठी महासभेची वाट न पाहता आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात जलवाहिनीची दुरुस्ती आणि गळतीसंदर्भात तातडीने कामे करून घ्यावीत असे आदेश दिले आहेत.नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येते, तसेच त्यानंतर दोन-तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. दिघा भागात पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी उच्चस्तरीय आणि भूमिगत जलकुंभ नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्या जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा केला जातो त्या जलवाहिन्या अनेक ठिकाणी नादुरु स्त असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे नागरिकांना होणाºया पाणीपुरवठ्यात अळ्या आढळत आहेत. नगरसेवक नवीन गवते यांनी स्थायी समिती सभेत याबाबत आवाज उठविला होता, परंतु प्रशासनाने त्याबाबत गंभीर दखल न घेतल्याने अळ्या आढळण्याचे सत्र सुरू आहे.सोमवारी झालेल्या महासभेत नगरसेविका अपर्णा गवते यांनी प्रशासनाला धारेवर धरत दिघावासीयांना अळ्यायुक्त पाणी पुरविण्यात येत असून नागरिकांनी पाणी कसे प्यायचे असा सवाल उपस्थित केला. झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रशासनाला काही सुख-दु:ख नसल्याचे सांगत कोणते काम तातडीने करावे याची काळजी प्रशासनाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी महापे ते दिघा जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा कमी काळात काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच जुन्या काही जलवाहिन्या नादुरु स्त असल्याने, तसेच लिकेज असल्याने समस्या उद्भवत असल्याचे सांगत पुढील महासभेत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर महापौर सुतार यांनी सदरची कामे तातडीने करावीत असे आदेशित केले आहे.२४ तास पाणीपुरवठ्याच्या घोषणा खोट्या?दिघा भागात पाण्यात अळ्या आढळत असल्याने याविषयावर सभागृहात चर्चा होत असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक निवृत्ती जगताप यांनी घणसोली ते दिघा भागात मोरबे धरणातून कधी पाणीपुरवठा होणार आहे असा सवाल करीत गावठाण आणि झोपडपट्टी भागात पाणी मिळत नसून २४ तास पाणीपुरवठा होणार असल्याच्या घोषणा खोट्या असल्याचा आरोप केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई