शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दिघावासीयांना पुरवठा होणाऱ्या पाण्यात अळ्यांचे सत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:23 IST

दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात अळ्या आढळण्याचे सत्र सुरूच असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात अळ्या आढळण्याचे सत्र सुरूच असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आक्र मक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने महापौर जयवंत सुतार यांनी कामाच्या मंजुरीसाठी महासभेची वाट न पाहता आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात जलवाहिनीची दुरुस्ती आणि गळतीसंदर्भात तातडीने कामे करून घ्यावीत असे आदेश दिले आहेत.नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येते, तसेच त्यानंतर दोन-तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. दिघा भागात पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी उच्चस्तरीय आणि भूमिगत जलकुंभ नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्या जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा केला जातो त्या जलवाहिन्या अनेक ठिकाणी नादुरु स्त असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे नागरिकांना होणाºया पाणीपुरवठ्यात अळ्या आढळत आहेत. नगरसेवक नवीन गवते यांनी स्थायी समिती सभेत याबाबत आवाज उठविला होता, परंतु प्रशासनाने त्याबाबत गंभीर दखल न घेतल्याने अळ्या आढळण्याचे सत्र सुरू आहे.सोमवारी झालेल्या महासभेत नगरसेविका अपर्णा गवते यांनी प्रशासनाला धारेवर धरत दिघावासीयांना अळ्यायुक्त पाणी पुरविण्यात येत असून नागरिकांनी पाणी कसे प्यायचे असा सवाल उपस्थित केला. झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रशासनाला काही सुख-दु:ख नसल्याचे सांगत कोणते काम तातडीने करावे याची काळजी प्रशासनाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी महापे ते दिघा जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा कमी काळात काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच जुन्या काही जलवाहिन्या नादुरु स्त असल्याने, तसेच लिकेज असल्याने समस्या उद्भवत असल्याचे सांगत पुढील महासभेत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर महापौर सुतार यांनी सदरची कामे तातडीने करावीत असे आदेशित केले आहे.२४ तास पाणीपुरवठ्याच्या घोषणा खोट्या?दिघा भागात पाण्यात अळ्या आढळत असल्याने याविषयावर सभागृहात चर्चा होत असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक निवृत्ती जगताप यांनी घणसोली ते दिघा भागात मोरबे धरणातून कधी पाणीपुरवठा होणार आहे असा सवाल करीत गावठाण आणि झोपडपट्टी भागात पाणी मिळत नसून २४ तास पाणीपुरवठा होणार असल्याच्या घोषणा खोट्या असल्याचा आरोप केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई