शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा मुक्काम मोर्चा; सिडको भवनसमोर २३ दिवस आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 23:42 IST

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांपैकी पुनर्वसनाच्या लाभापासून वंचित नागरिकांनी २३ डिसेंबरपासून बेमुदत मुक्काम मोर्चा सुरू केला आहे. २३ दिवस सिडको भवनसमोर हे आंदोलन सुरू असून, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय किसान सभेच्या अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीने हे आंदोलन सुरू केले आहे. सिडको भवनसमोरील पदपथावर २३ दिवसांपासून आंदोलकांनी ठाण मांडले आहे. शून्य पात्रता व अपात्र पद्धती बंद करून सरसकट सर्वांना पुनर्वसन पॅकेज लागू करावे. जुन्या गावठाणातील जमिनीचे संपादन करताना जमिनीची हद्दनिश्चिती व क्षेत्रफळाची परिगणना करताना अधिकार अभिलेख, गटबुक, गाव नकाशावरून करण्याचे आदेश असताना सिडकोने केलेल्या सर्वेक्षणावर आधारित संपादन केले आहे, यामुळे घरासमोरील अंगण, पाठीमागील परस यांची मोजणी झालेली नाही.

सिडकोने फक्त बांधीव क्षेत्राचेच भूखंड दिलेले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना भूखंडाचा लाभ मिळालेला नाही. ग्रामीण भागात एकाच घरात तीन ते चार कुटुंब अ, ब, क, ड पद्धतीने राहत असतात; परंतु एक संघ बांधकामामध्येराहणाºया सर्व व्यक्ती एक कुटुंब गृहित धरले आहे. प्रकल्पबाधित कुटुंब म्हणजे ज्या कुटुंबाचे स्वतंत्र रेशनिंग कार्ड, घरपट्टी, गॅस, जोडणी वगैरे आहे ते स्वतंत्र कुटुंब धरून त्यास लाभ देण्यात यावा. सिडकोने घरभाडे भत्यामध्ये दुरुस्ती करून मार्केटनुसार घरभाडे देण्यात यावे. सिडको गृहबांधणीसाठी अर्थसाहाय्य म्हणून चौरस फुटास एक हजार रुपये देय केले होते. मध्यंतरी घरे निष्कासित करण्यास वेग यावा यासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून ५०० रुपये जाहीर केलेले आहेत; परंतु २०१३ ते २०२० यामध्ये घरबांधणीसाठी लागणारा कच्चा माल तसेच मजुरी यामध्ये वाढ झाली असल्यामुळे या मोबदल्यात वाढ करून २५०० रुपये करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

पनवेल ड्रेनेज स्कीम आणि टाटा पॉवरच्या ज्या जमिनी सिडकोकडे वर्ग झाल्या आहेत, त्या जमिनींचे विकसित भूखंड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या मच्छीमार व्यावसायिकांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी केली आहे. विमानतळाच्या भरावामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये जे आपल्या उदरनिर्वाहाचेसाधन म्हणून कोळी, कराडी, आगरी व आदिवासी मच्छीमारी व्यवसाय करतात त्यांना जेथे पुन:स्थापितकरण्यात येणार आहे तेथून पुन्हा मच्छीमारीचा व्यवसाय करता येणार नाही.

यामुळे केवळ बाधित होत नसून ते कायमस्वरूपासाठी मच्छीमार म्हणून राहणार नाहीत. यामुळे प्रकल्पबाधित गावांमधील होडीच्या माध्यमातून मच्छीमारी करणारे, डोल व वाना लावून मच्छी पकडणारे, पाग व इतर मार्गाने मच्छी पकडणाºयांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.सिडकोसोबत तीन बैठकाप्रकल्पग्रस्त आंदोलकांनी २३ दिवसांमध्ये तीन वेळा सिडको व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली आहे; परंतु मागण्या प्रत्यक्षात मान्य न केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता, आंदोलकांशी व्यवस्थापनाने चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्या या नवीन असल्यामुळे त्याविषयी विचार करण्यासाठी सिडकोस अवधी द्यावा व तोपर्यंत आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले असल्याची माहिती दिली आहे.न्याय्य हक्कासाठी आम्ही २३ दिवसांपासून सिडकोभवनसमोर आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आमचा मुक्काम मोर्चा सुरूच राहणार आहे. पूर्णपणे सनदशीर मार्गाने व शांततेने आंदोलन सुरू असून मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहणार आहे. - रामचंद्र म्हात्रे, अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा, रायगड जिल्हाआंदोलकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे

  • शून्य पात्रता व अपात्र पद्धत बंद करून सरसकट सर्वांना पुनर्वसन पॅकेज लागू करावे
  • जोपर्यंत सिडको प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत सिडको प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही बांधकाम तोडू नये
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या मच्छीमार व्यावसायिकांना २०१ च्या कायद्याप्रमाणे नुकसानभरपाईद्यावी व सर्व युवक, युवतींना नोकरी उपलब्ध करून द्यावी.
  • प्रकल्पग्रस्तांचे घर बांधून होईपर्यंत बाजारभावाप्रमाणे घरभाडे देण्यात यावे
  • अ,ब,क,ड घरांचे स्वतंत्र प्लॉट, घर भाडे निर्वाहभत्ता व कृषी मजुरीचे स्वतंत्र कुटुंब म्हणून वाटप करावे
  • प्रकल्पग्रस्तांना वाढीव बांधकाम खर्च २५०० रुपये द्यावा
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका