शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

वायू प्रदूषणावर महापालिकेकडून एअर क्लिनिंगचा सोपस्कार! बोनकोडे, कोपरीतील रहिवाशांचा कोंडतोय श्वास

By कमलाकर कांबळे | Updated: October 11, 2023 18:44 IST

या भागात पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणात धुके दिसत आहे. त्यातून उग्र वास येत असल्याने रहिवाशांचा श्वास कोंडत आहे.

नवी मुंबई : राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून मानांकन प्राप्त झालेल्या नवी मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. विशेषत: वायू प्रदूषणात मागील पंधरा दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. शहराच्या प्रत्येक भागात प्रदूषणाची समस्या असली तरी त्याचा सर्वाधिक त्रास वाशी सेक्टर २६, कोपरी आणि बोनकोडे गाव आणि परिसरातील रहिवाशांना होत आहे. या भागात पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणात धुके दिसत आहे. त्यातून उग्र वास येत असल्याने रहिवाशांचा श्वास कोंडत आहे.

वातावरणातील दूषित धुलिकणामुळे सकाळी व्यायामाला जाणाऱ्या रहिवाशांना त्रास जाणवत आहे. कोपरी, बोनकोडे, सेक्टर ११ आणि वाशी सेक्टर २६, २८ परिसरातील रहिवाशांना प्रदूषणाचा कायमस्वरूपी त्रास आहे. या विरोधात येथील रहिवाशांचा मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. एमआयडीसीतील अनेक कारखान्यांतून प्रक्रिया न करताच रसायन मिश्रित सांडपाणी नाल्यांत सोडून दिले जाते. हा नाला बोनकोडे आणि कोपरी या दोन गावांना विभागून पुढे खाडीकडे जातो. या नाल्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती आहेत. 

नाल्यातून वाहणाऱ्या रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे परिसरात उग्र दर्प येत आहे. तसेच प्रदूषित वायू हवेत सोडून दिला जातो. त्यामुळे परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिका आणि प्रदूषण मंडळाकडून प्रदूषण रोखण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मागील हवेतील दूषित धुलिकण सुगंधित करण्यासाठी रात्रीच्या वेळी महापालिकेच्या माध्यमातून नाल्याच्या परिसरात एअर क्लिनिंगसाठी फवारणी केली जात आहे. परंतु हे उपायसुद्धा तुटपुंजे ठरले आहेत. कारण कोपरी, बोनकोडे, वाशी सेक्टर २६ आणि २८ या परिसरात पहाटेच्या वेळी हवेतील धुलिकणांमुळे वातावरण धूरकट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे रहिवासीसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने धास्तावले आहेत.

स्वच्छ हवेसाठी रहिवाशांचे अभियानकोपरी आणि परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील रहिवासी आक्रमक झाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोपर्यंत प्रत्येक रविवारी एक तास ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार रहिवाशांनी केला आहे. गेल्या रविवारपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. ‘स्वच्छ हवा, हा माझा अधिकार’ या संकल्पनेवर आधारित हे अभियान संबंधित शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असून, त्यावर निर्णायक तोडगा निघेपर्यंत ते सुरूच राहील, असे नवी मुंबई विकास अधिष्ठानचे अध्यक्ष संकेत डोके यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई