शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
4
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
5
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
6
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
7
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
8
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
9
डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
10
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
11
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
13
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
14
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
15
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
16
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
17
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
18
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
20
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”

ऐन गणेशोत्सवात भाजीपाला कडाडला! कोथिंबीर ७५ रुपये जुडी तर वाटाणा प्रतिकिलो १२० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 02:38 IST

मुसळधार पावसाचाही बसला फटका

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा परिणाम भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर झाला आहे. मुंबईत मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये एका कोथिंबिरीच्या जुडीसाठी ६० ते ७५ रु पये मोजावे लागत आहेत. वाटाणा १०० ते १२० रुपये किलो झाला असून, फ्लॉवरसह शेवग्याच्या शेंगा, फरसबी व इतर भाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

राज्यभर कोसळणाऱ्या पावसाचा फटका भाजीपाल्याच्या उत्पादनावरही झाला आहे. अनेक ठिकाणी भाजीपाला खराब झाला आहे. यामुळे मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी पडू लागला आहे. गणेशोत्सवामुळे मुंबईमध्येही भाजीपाल्याची मागणी वाढली आहे, परंतु पुरेशी आवक होत नसल्यामुळे व खरेदीच्या ठिकाणीच दर वाढल्यामुळे मार्केटमध्ये बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गत आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी १५ ते ३५ रु पये खर्च करावे लागत होते. सद्य:स्थितीमध्ये हे दर ४० ते ५० रु पये झाले असून, किरकोळ मार्केटमध्ये मोठी जुडी ६० ते ७५ रु पयांना विकत घ्यावी लागत आहे. वाटाण्याचे दर होलसेल मार्केटमध्ये ८० ते १०० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२० रुपयांवर पोहोचले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आल्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गत आठवड्यात ३० ते ३५ रुपये किलो दराने आल्याची विक्री होत होती. सद्य:स्थितीमध्ये हे दर ४० ते ४६ रु पये झाले असून, किरकोळ मार्केटमध्ये ९० ते १०० रु पये किलो दराने विक्री होत आहे. अपवाद वगळता सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. सद्य:स्थितीमध्ये पुणे, नाशिक, सातारा, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांतूनही काही प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येत आहे.पावसामुळे राज्यभर पिकांचे नुकसान झाले आहे. गणेशोत्सवामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. मागणी व पुरवठ्यात फरक पडत असल्यामुळे व उत्पादनाच्या ठिकाणीच दर वाढल्यामुळे एपीएमसीमध्येही भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. - शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्र्केट 

टॅग्स :vegetableभाज्या