शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऐन गणेशोत्सवात भाजीपाला कडाडला! कोथिंबीर ७५ रुपये जुडी तर वाटाणा प्रतिकिलो १२० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 02:38 IST

मुसळधार पावसाचाही बसला फटका

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा परिणाम भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर झाला आहे. मुंबईत मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये एका कोथिंबिरीच्या जुडीसाठी ६० ते ७५ रु पये मोजावे लागत आहेत. वाटाणा १०० ते १२० रुपये किलो झाला असून, फ्लॉवरसह शेवग्याच्या शेंगा, फरसबी व इतर भाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

राज्यभर कोसळणाऱ्या पावसाचा फटका भाजीपाल्याच्या उत्पादनावरही झाला आहे. अनेक ठिकाणी भाजीपाला खराब झाला आहे. यामुळे मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी पडू लागला आहे. गणेशोत्सवामुळे मुंबईमध्येही भाजीपाल्याची मागणी वाढली आहे, परंतु पुरेशी आवक होत नसल्यामुळे व खरेदीच्या ठिकाणीच दर वाढल्यामुळे मार्केटमध्ये बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गत आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी १५ ते ३५ रु पये खर्च करावे लागत होते. सद्य:स्थितीमध्ये हे दर ४० ते ५० रु पये झाले असून, किरकोळ मार्केटमध्ये मोठी जुडी ६० ते ७५ रु पयांना विकत घ्यावी लागत आहे. वाटाण्याचे दर होलसेल मार्केटमध्ये ८० ते १०० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२० रुपयांवर पोहोचले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आल्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गत आठवड्यात ३० ते ३५ रुपये किलो दराने आल्याची विक्री होत होती. सद्य:स्थितीमध्ये हे दर ४० ते ४६ रु पये झाले असून, किरकोळ मार्केटमध्ये ९० ते १०० रु पये किलो दराने विक्री होत आहे. अपवाद वगळता सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. सद्य:स्थितीमध्ये पुणे, नाशिक, सातारा, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांतूनही काही प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येत आहे.पावसामुळे राज्यभर पिकांचे नुकसान झाले आहे. गणेशोत्सवामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. मागणी व पुरवठ्यात फरक पडत असल्यामुळे व उत्पादनाच्या ठिकाणीच दर वाढल्यामुळे एपीएमसीमध्येही भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. - शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्र्केट 

टॅग्स :vegetableभाज्या