शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन, आॅल कार्गोच्या व्यवस्थापनाने १३१ कामगारांना केले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 03:26 IST

उरण तालुक्यातील कोप्रोली येथील आॅलकार्गो सीएफएसमधील कमी केलेल्या ७४ कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकाप, काँग्रेस आणि मनसेच्या पाठिंब्यावर बुधवारी गेटबंद आंदोलन करण्यात आले.

उरण : तालुक्यातील कोप्रोली येथील आॅलकार्गो सीएफएसमधील कमी केलेल्या ७४ कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकाप, काँग्रेस आणि मनसेच्या पाठिंब्यावर बुधवारी गेटबंद आंदोलन करण्यात आले.जून २०१७ ला कोणतेही कारण न देता, या कंपनीत काम करणाऱ्या स्थानिक १३१ कामगारांना कामावरून कमी केले आहे. सर्वपक्षीयांनी व कामगारांनी अनेक वेळा आंदोलने करूनदेखील मुजोर प्रशासनाने फक्त आश्वासने देऊन कामगारांची आंदोलने मागे घेण्यास भाग पाडले. या कामगारांमध्ये बहुसंख्य ९४ कामगार हे प्रकल्पग्रस्त आहेत. या ठिकाणी ही कंपनी उभारण्यासाठी येथील लोकांनी आपल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनी कवडीमोलाने या कंपनीला दिल्या. आपल्या मुलांना, नातेवाइकांना या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकºया मिळतील, या आशेने या जमिनी कंपनीला कवडीमोल भावात दिल्या होत्या. मात्र, कंपनीच्या मालकांनी जून २०१७ मध्ये १३१ कामगारांना कामावरून कमी केले.यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. मात्र, २० महिने झाले तरी या कामगारांना आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. एवढे दिवस नोकरी नसल्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता या कामगारांनी आरपार लढाई करण्याचे ठरविले आहे. बुधवारी सकाळपासूनच गेटबंद आंदोलनाला सुरु वात करण्यात आली आहे. जोपर्यंत कंपनीचे संचालक, अधिकारी येथे चर्चेला येणार नाहीत आणि कामगारांना परत कामावर घेतले जाण्याचे ठोस आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत कंपनीसमोर गेटबंद आंदोलन करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. बुधवार सकाळपासून सुरू झालेल्या गेटबंद आंदोलनामुळे कंटेनर वाहतूक ठप्प झाली आहे.या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, राजिप सदस्य बाजीराव परदेशी, वैजनाथ ठाकूर, राजिप सदस्य विजय भोईर, मनसेचे तालुकाध्यक्ष अभिजित कडू, काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा संध्या ठाकूर, मनसेच्या ज्योती मालवणकर, जयंत गांगण, रूपेश पाटील, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई