शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन, आॅल कार्गोच्या व्यवस्थापनाने १३१ कामगारांना केले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 03:26 IST

उरण तालुक्यातील कोप्रोली येथील आॅलकार्गो सीएफएसमधील कमी केलेल्या ७४ कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकाप, काँग्रेस आणि मनसेच्या पाठिंब्यावर बुधवारी गेटबंद आंदोलन करण्यात आले.

उरण : तालुक्यातील कोप्रोली येथील आॅलकार्गो सीएफएसमधील कमी केलेल्या ७४ कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकाप, काँग्रेस आणि मनसेच्या पाठिंब्यावर बुधवारी गेटबंद आंदोलन करण्यात आले.जून २०१७ ला कोणतेही कारण न देता, या कंपनीत काम करणाऱ्या स्थानिक १३१ कामगारांना कामावरून कमी केले आहे. सर्वपक्षीयांनी व कामगारांनी अनेक वेळा आंदोलने करूनदेखील मुजोर प्रशासनाने फक्त आश्वासने देऊन कामगारांची आंदोलने मागे घेण्यास भाग पाडले. या कामगारांमध्ये बहुसंख्य ९४ कामगार हे प्रकल्पग्रस्त आहेत. या ठिकाणी ही कंपनी उभारण्यासाठी येथील लोकांनी आपल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनी कवडीमोलाने या कंपनीला दिल्या. आपल्या मुलांना, नातेवाइकांना या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकºया मिळतील, या आशेने या जमिनी कंपनीला कवडीमोल भावात दिल्या होत्या. मात्र, कंपनीच्या मालकांनी जून २०१७ मध्ये १३१ कामगारांना कामावरून कमी केले.यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. मात्र, २० महिने झाले तरी या कामगारांना आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. एवढे दिवस नोकरी नसल्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता या कामगारांनी आरपार लढाई करण्याचे ठरविले आहे. बुधवारी सकाळपासूनच गेटबंद आंदोलनाला सुरु वात करण्यात आली आहे. जोपर्यंत कंपनीचे संचालक, अधिकारी येथे चर्चेला येणार नाहीत आणि कामगारांना परत कामावर घेतले जाण्याचे ठोस आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत कंपनीसमोर गेटबंद आंदोलन करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. बुधवार सकाळपासून सुरू झालेल्या गेटबंद आंदोलनामुळे कंटेनर वाहतूक ठप्प झाली आहे.या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, राजिप सदस्य बाजीराव परदेशी, वैजनाथ ठाकूर, राजिप सदस्य विजय भोईर, मनसेचे तालुकाध्यक्ष अभिजित कडू, काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा संध्या ठाकूर, मनसेच्या ज्योती मालवणकर, जयंत गांगण, रूपेश पाटील, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई