शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

बुलडाणा अपघातानंतर खासगी बसची सुरक्षा नियमावली ऐरणीवर

By नारायण जाधव | Updated: July 1, 2023 15:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : शनिवारी पहाटे समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातात २५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शनिवारी पहाटे समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर राज्यातील खासगी बसवाहतूकदारांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, वाहतूक आरटीओसह पोलिसांकडून त्यांना मिळणारे पाठबळ हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी बुलडाण्यातील पिंपळखुटा येथे झालेल्या अपघातात समृद्धी महामार्गाची रचना जितकी दोषी आहे, त्याहून अधिक खासगी बसवाहतूकदारांकडून होणारे नियमांचे उल्लंघन कारणीभूत आहे. राज्यच नव्हे तर संपूर्ण देशभरात बहुसंख्य खासगी बसमधून मालवाहतूक केली जात आहे. यात साधारणत: एका लक्झरी बसच्या टपावर आणि मागील बाजूच्या भल्या मोठ्य़ा डीकीमधून सुमारे दोन ते पाच टन माल वाहून नेला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बस प्रवाशांसाठी आहेत की, मालवाहतुकीसाठी असा प्रश्न पडतो.

याची चौकशी होणे गरजेचेयाशिवाय बसच्या चालक - क्लिनरला बहुतेक बसवाहतूकदार प्रशिक्षण देत नाहीत. ज्या बसला अपघात झाला, तिला वाहन योग्यता प्रमाणपत्र अर्थात फिटनेस / सेफ्टी सर्टिफिकेटसह पीयुसी प्रमाणपत्र होते की नाही, याची चौकशी होणे गरजे आहे. तसेच गाडीत अग्निशमन यंत्र आणि काच फोडण्यासाठी बंधनकारक असलेले हॅमर नसल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर जास्त मृत्यू होण्याचे कारण म्हणजे काचबंद एसी बसमध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवासी सुरक्षिततेच्या ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व असते तर टायर फुटून बस पुलावर धडकून इंधन टाकी फुटून आग लागून २५ प्रवाशांचा जो मृत्यू झाला आहे, ती संख्या कमी करता आली असती.

न्यायालयाचे आदेश धाब्यावरसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बसच्या टपावरून मालवाहतूक करण्यास मनाई आहे. शिवाय डीकीमध्ये जो माल ठेवण्यात येतो, तो किती ठेवावा, कशा पद्धतीने ठेवावा, वळणावर तो हलून बस एका बाजून झुकून अपघात होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवाशांचे सामान बसच्या बाजूला किंवा मागील बाजूच्या कक्षातच ठेवण्याचे आदेश आहेत. परंतु, सध्या लक्झरी बसच्या टपावरून जी मालवाहतूक केली जात आहे, ती पूर्णत: अवैध आहे. यामुळे वेगात असलेल्या बसच्या टपावरील जड सामान खाली पडून बाजूने जाणाऱ्या अन्य वाहनचालकांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.

गोदामांची झडती घ्यायला हवी

आज अनेक खासगी बसचालकांची गोदामे असून, ते वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या साक्षीने बसमध्ये माल भरतात. शीव - पनवेल महामार्गावर चेंबूरनाका, सानपाडा परिसरात असे दृश्य नेहमीच दिसते. राज्यातील इतर मोठ्या शहरांच्या वेशीवरही गोदामांची झडती घेतली तरी अशी गोदामे सापडतील.

टॅग्स :Accidentअपघात