शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

बुलडाणा अपघातानंतर खासगी बसची सुरक्षा नियमावली ऐरणीवर

By नारायण जाधव | Updated: July 1, 2023 15:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : शनिवारी पहाटे समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातात २५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शनिवारी पहाटे समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर राज्यातील खासगी बसवाहतूकदारांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, वाहतूक आरटीओसह पोलिसांकडून त्यांना मिळणारे पाठबळ हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी बुलडाण्यातील पिंपळखुटा येथे झालेल्या अपघातात समृद्धी महामार्गाची रचना जितकी दोषी आहे, त्याहून अधिक खासगी बसवाहतूकदारांकडून होणारे नियमांचे उल्लंघन कारणीभूत आहे. राज्यच नव्हे तर संपूर्ण देशभरात बहुसंख्य खासगी बसमधून मालवाहतूक केली जात आहे. यात साधारणत: एका लक्झरी बसच्या टपावर आणि मागील बाजूच्या भल्या मोठ्य़ा डीकीमधून सुमारे दोन ते पाच टन माल वाहून नेला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बस प्रवाशांसाठी आहेत की, मालवाहतुकीसाठी असा प्रश्न पडतो.

याची चौकशी होणे गरजेचेयाशिवाय बसच्या चालक - क्लिनरला बहुतेक बसवाहतूकदार प्रशिक्षण देत नाहीत. ज्या बसला अपघात झाला, तिला वाहन योग्यता प्रमाणपत्र अर्थात फिटनेस / सेफ्टी सर्टिफिकेटसह पीयुसी प्रमाणपत्र होते की नाही, याची चौकशी होणे गरजे आहे. तसेच गाडीत अग्निशमन यंत्र आणि काच फोडण्यासाठी बंधनकारक असलेले हॅमर नसल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर जास्त मृत्यू होण्याचे कारण म्हणजे काचबंद एसी बसमध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवासी सुरक्षिततेच्या ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व असते तर टायर फुटून बस पुलावर धडकून इंधन टाकी फुटून आग लागून २५ प्रवाशांचा जो मृत्यू झाला आहे, ती संख्या कमी करता आली असती.

न्यायालयाचे आदेश धाब्यावरसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बसच्या टपावरून मालवाहतूक करण्यास मनाई आहे. शिवाय डीकीमध्ये जो माल ठेवण्यात येतो, तो किती ठेवावा, कशा पद्धतीने ठेवावा, वळणावर तो हलून बस एका बाजून झुकून अपघात होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवाशांचे सामान बसच्या बाजूला किंवा मागील बाजूच्या कक्षातच ठेवण्याचे आदेश आहेत. परंतु, सध्या लक्झरी बसच्या टपावरून जी मालवाहतूक केली जात आहे, ती पूर्णत: अवैध आहे. यामुळे वेगात असलेल्या बसच्या टपावरील जड सामान खाली पडून बाजूने जाणाऱ्या अन्य वाहनचालकांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.

गोदामांची झडती घ्यायला हवी

आज अनेक खासगी बसचालकांची गोदामे असून, ते वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या साक्षीने बसमध्ये माल भरतात. शीव - पनवेल महामार्गावर चेंबूरनाका, सानपाडा परिसरात असे दृश्य नेहमीच दिसते. राज्यातील इतर मोठ्या शहरांच्या वेशीवरही गोदामांची झडती घेतली तरी अशी गोदामे सापडतील.

टॅग्स :Accidentअपघात