शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसानंतर आता वाट खडतर, डागडुजी नंतरची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 03:13 IST

पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी झालेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे दुचाकीस्वारांसाठी जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. बहुतांश ठिकाणचे डांबर पावसासोबत वाहून गेल्याने तिथली खडी व वाळू रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. अशा ठिकाणी दुचाकी घसरून अपघातांच्या घटना घडत आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी झालेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे दुचाकीस्वारांसाठी जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. बहुतांश ठिकाणचे डांबर पावसासोबत वाहून गेल्याने तिथली खडी व वाळू रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. अशा ठिकाणी दुचाकी घसरून अपघातांच्या घटना घडत आहेत.रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांच्या दर्जावर संशय निर्माण करणारी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याचे पाहायला मिळते. तर पाऊस थांबताच त्या ठिकाणी तात्पुरती डागडुजी केली जाते. घणसोली नोडच्या प्रवेशद्वारावर निम्मा रस्ताच खड्ड्यात गेला आहे. तर गोठीवलीत पावसाळ्यापूर्वीच झालेल्या खोदकामानंतर नव्याने रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. त्यानंतरही जागोजागी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे डागडुजीची कामे सुरू आहेत. ऐरोली, गोठीवली, घणसोली तसेच नेरुळ परिसरात अशी कामे सुरू आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी एकदा डागडुजी झाल्यानंतरही पुन्हा खड्डे पडल्याने ते बुजवण्यासाठी वापरली गेलेली खडी रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. ठेकेदाराकडून घाईमध्ये खड्डे बुजवण्याच्या प्रयत्नात कामाचा दर्जा राखला जात नसल्याचे यावरून दिसून येत आहे.पावसातही डांबरीकरण करता येईल, अशा तंत्रज्ञानाच्या शोधात सर्वच ठेकेदार आहेत. या कारणावरून अनेक जण डागडुजीच्या कामात वेळ काढत आहेत. यामुळेच शहरातल्या महत्त्वाच्या सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांचाही प्रश्न मिटलेला नाही; परंतु नोड अंतर्गतच्या रस्त्यांचीही तीच अवस्था झाल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. यावरून प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. त्यामुळे ठेकेदाराकडून डागडुजीच्या कामांना गती देण्यात येत आहे. खड्डे बुजवण्यासाठी खड्ड्यांमध्ये खडी टाकून त्यावर डांबराचा थर मारला जात आहे; परंतु पावसासोबत पुन्हा डांबर वाहून जात आहे. यामुळे खड्डे बुजवण्यासाठी वापरलेली खडी रस्त्यावर सर्वत्र पसरत आहे. परिणामी, अशा ठिकाणी दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. भरधाव दुचाकीच्या चाकाखाली खडी आल्यास चालकाचा तोल जाऊन त्यांचे अपघात होत आहेत. तर काही ठिकाणी कारच्या चाकामुळे खडी उडून पादचारी किंवा दुचाकीस्वारांना लागत आहे. हा प्रकार एखाद्याच्या जीवावर बेतण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. वाशीतील ब्ल्यू डायमंड चौक ते कोपरी सिग्नल मार्गावर खड्डे व खडीमुळे वाहतूककोंडीही होत आहे. अशा सर्वच ठिकाणी रात्रीच्या वेळीही वाहनचालकांची, दुचाकीस्वारांची मोठी गैरसोय होते. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात आदळून शारीरिक दुखणी वाढत आहेत.वाहनांच्या दुरुस्तीखर्चात वाढरस्त्यांवरील खड्डे वाहनचालकांना शारीरिक दुखणी देण्यासह वाहनांच्या दुरुस्तीखर्चातही वाढ करणारे ठरत आहेत. वाहने सतत खड्ड्यांमध्ये आपटत असल्याने पार्ट्सला हानी पोहोचत आहे. अनेक मध्यमवर्गीयांना हा खर्च खिशाला झळ पोहोचवणारा असल्याने खड्ड्यांमुळे त्यांची डोकेदुखीही वाढली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या