शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

प्रशासनाने सोसायट्यांना वेठीस धरू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:41 IST

प्रशासनाने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचºयावर प्रक्रिया करणे सक्तीचे केले आहे. प्रक्रिया न करणाºया सोसायट्यांवर कारवाईच्या नोटीस दिल्या असून कचरा उचलणे बंद केले आहे.

नवी मुंबई : प्रशासनाने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचºयावर प्रक्रिया करणे सक्तीचे केले आहे. प्रक्रिया न करणाºया सोसायट्यांवर कारवाईच्या नोटीस दिल्या असून कचरा उचलणे बंद केले आहे. प्रशासनाच्या भूमिकेचे तीव्र पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले. सोसायट्यांना व पर्यायाने नागरिकांना वेठीस धरू नका. कचरा उचलण्यास सुरवात करावी व नोटीस मागे घ्याव्या, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार घनकचरा निर्मितीच्या ठिकाणी ओला व सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. ज्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल व इतर आस्थापनांमध्ये रोज १०० किलोपेक्षा जास्त कचºयाची निर्मिती होते त्यांनी त्यांच्या सोसायटी व इमारतीच्या आवारामध्येच त्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाने १६० पेक्षा जास्त मोठ्या सोसायट्यांना प्रक्रिया करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. ओला व सुका कचरा वेगळा न करणाºया सोसायट्यांना नोटीस देण्यास सुरवात केली आहे. कचरा वेगळा न करणाºयांवर कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाच्या भूमिकेचे तीव्र पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक अशोक गुरखे यांनी या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अल्प उत्पन्न गटातील बैठ्या चाळींमध्ये कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. सोसायटीचे मासिक शुल्कही अनेक नागरिक देत नाहीत. अशा स्थितीमध्ये त्यांच्यावर प्रक्रियेसाठी सक्ती करणे व्यवहार्य होणार नाही असे स्पष्ट केले. राष्ट्रवादी, शिवसेना, काँगे्रसच्या नगरसेवकांनी प्रशासनाच्या भूमिकेला तीव्र विरोध करून सक्ती थांबविण्यात यावी, अशी मागणी केली.पालिका प्रशासनाने कचºयाचे वर्गीकरण करण्याची सक्ती नागरिकांवर केली आहे. अनेक नागरिकांनी कचरा वर्गीकरण करण्यास सुरवात केली आहे. परंतु वर्गीकरण केलेला कचरा एकाच गाडीतून नेला जात आहे. कचरा वर्गीकरण झाले पाहिजे हे मान्य आहे. पण कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती केली जावू नये. गृहनिर्माण सोसायट्यांचा कारभार चालविणे हे अवघड काम आहे. सोसायटीचे पदाधिकारी होण्यास नागरिक तयार होत नाहीत. त्यांच्यावर कचरा प्रक्रिया करणे बंधनकारक केले तर सर्व व्यवस्थाच कोलमडेल असेही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. उच्च न्यायालयाचे आदेश व केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे हे केले जात असले तरी ते व्यवहार्य नाही. मुंबई व ठाण्यामध्येही कचºयावर प्रक्रिया करणे यशस्वी झालेले नाही. प्रशासनानेही याविषयी विचार करावा. आतापर्यंत ज्या सोसायट्यांना नोटीस दिल्या त्या परत घेण्यात याव्यात. कचरा उचलण्यास सुरवात करावी अशा सूचना केल्या असून आता प्रशासन नक्की काय भूमिका घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.माथाडी चाळी व इतर अल्प उत्पन्न गटातील सोसायट्यांमधील नागरिकांना कचºयावर प्रक्रिया करणे शक्य नाही. त्यासाठी जागा उपलब्ध नाही. इतरही अडचणी आहे. नागरिकांच्या भावनांचा आदर करून प्रशासनाने अडवणूक थांबवावी.- शुभांगी पाटील,सभापती स्थायी समितीगृहनिर्माण सोसायटीवर कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. नागरिकांना सुखाने जगू द्या त्यांना वेठीस धरू नका. दिलेल्या नोटीस परत घ्या.- अशोक गावडे, नगरसेवक, राष्ट्रवादीप्रशासनाने नागरिकांवर सक्ती करू नये. कचरा न उचलल्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. वेठीस धरणे थांबविले नाही तर आंदोलन करावे लागेल.- द्वारकानाथ भोईर, नगरसेवक, शिवसेनाओला व सुका कचरा वेगळा करण्याचे धोरण चांगले आहे. नागरिकही आता पालिकेला सहकार्य करू लागले आहेत. परंतु कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती करणे पूर्णपणे चुकीचे असून ते थांबविले पाहिजे.- मीरा पाटील, नगरसेविका काँगे्रस