शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांबरोबरच मतदान केंद्रांची संख्याही सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 23:51 IST

मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील मतदारांची संख्या पाच लाखांच्याही वर गेली आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील मतदारांची संख्या पाच लाखांच्याही वर गेली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ केवळ मावळमध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरत आहे. मतदारसंख्येबरोबरच येथील मतदान केंद्रातही वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूकविभागाला पनवेलमध्ये अधिक आव्हानात्मक काम करावे लागत आहे.मावळमधील एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर पिंपरी, चिंचवड व पनवेलला शहरी वसाहती आहेत. यात पनवेलचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येबरोबरच मतदारांची संख्याही वाढत असल्याची नोंद सरकार दप्तरी दिसत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी लोकसंख्या वाढत आहे. २०१४ च्या तुलनेत पनवेलमध्ये एक लाख ४३ हजार इतके मतदार पाच वर्षांत वाढले आहेत, त्यामुळे मावळमध्ये इतर मतदारसंघाच्या तुलनेत पनवेलकडे प्रमुख उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. राज्याच्या इतर विधानसभा मतदारसंघाचा विचार करता जास्तीत जास्त पावणेपाच लाख तर कमीत कमी अडीच लाख इतकी मतदारसंख्या आहे. मात्र, पनवेल विधानसभा मतदारसंघात हा आकडा पाच लाख १४ हजारांवर पोहोचला आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार संख्या सव्वापाच लाखांच्या घरात पोहोचेल, असे निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.>भावी काळात दोन विधानसभा मतदारसंघपूर्वी पनवेल-उरण असा विधानसभा मतदारसंघ होता. २००९ मध्ये संपूर्ण देशातील मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यामध्ये पनवेल आणि उरण हे स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाले. २०१४ मध्ये पनवेलमध्ये ३,७१,१९३ इतके मतदार होते. आता ते ५,१४,७५९ इतके झाले आहेत. पुढील वर्षांत त्यात आणखी भर पडेल. त्यामुळे भावी काळात पुनर्रचनेत पनवेल येथे दोन विधानसभा मतदारसंघ होतील, असे मत प्रशासनात काम करणाºया अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळ