शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

विकासकामांमध्ये पक्षपात होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:46 IST

पाठपुरावा करूनही प्रभागामधील विकासकामे मार्गी लागत नाहीत.

नवी मुंबई : पाठपुरावा करूनही प्रभागामधील विकासकामे मार्गी लागत नाहीत. प्रशासनाकडून फक्त आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष कामे होत नसल्याबद्दल नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कामे करताना पक्षपात केला जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये दोन महिन्यांपासून जास्तीत जास्त विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठीची घाई सुरू आहे. अनेक प्रभागांमधील प्रस्ताव मंजूर झालेले नसून त्याचे पडसाद मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये उमटले. कोपरखैरणेमधील शिवसेना नगरसेविका मेघाली राऊत यांनी त्यांच्या प्रभागामध्ये कामे होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आम्ही चार वर्षांपासून अनेक कामांसाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत; पण प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. अ‍ॅड. भारती पाटील यांनीही कामे होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आम्ही सनदशीर मार्गाने पाठपुरावा करत असतो; पण प्रशासनाकडून कामे केली जात नाहीत. आमच्या प्रभागामधील प्रस्ताव कधी चर्चेला येणार अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली. डॉ. जयाजी नाथ यांनीही, विकासकामांची फाइल एक टेबलवर किती दिवस थांबलेली असते, याची माहिती घेतली जावी, आम्ही सभागृहात आवाज उठवितो त्यामुळे आमची कामे होत नाहीत का, असेही त्यांनी या वेळी विचारले.सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पूर्वीच्या आयुक्तांनी ज्या कामांची पाहणी केली. त्या कामांसाठीही पुन्हा जागेवर जाऊन पाहणी करायची आवश्यकता आहे का? किती प्रस्ताव मंजुरीसाठी शिल्लक आहेत. याची पाहणी करावी व बुधवारी ते प्रस्ताव मंजुरीसाठी आणावे, अशा सूचना दिल्या. सभापती नवीन गवते यांनीही शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांना सर्वांची कामे झाली पाहिजेत, अशा सूचना दिल्या.>७१ कोटींच्या कामांना मंजुरीस्थायी समितीमध्ये मंगळवारी तब्बल ७१ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये रोडचे डांबरीकरण, पदपथ दुरुस्ती व इतर कामांचा समावेश आहे. नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी, जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न सुरू असून सहा महिन्यांत अडीच हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असल्याचे निदर्शनास आणून दिले.>आयुक्तांकडे बैठकस्थायी समितीची बैठक झाल्यानंतर सभापती नवीन गवते, सभागृहनेते रवींद्र इथापे यांचीही आयुक्तांबरोबर बैठक झाली. या बैठकीमध्येही शहरातील विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी दोन दिवसांमध्ये पुन्हा स्थायी समितीची बैठक लावण्यात येणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई