शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

तुर्भे स्टोअर्स परिसरामधील अपघातांमध्ये झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 1:32 AM

ठाणे-बेलापूर रोडवरील प्रकार : उड्डाणपुलाचे काम रखडल्याने असंतोष

नवी मुंबई : ठाणे - बेलापूर रोडवर तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये प्रतिदिन वाहतूक कोंडी होत आहे. येथे वारंवार अपघात होत आहेत. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव रखडला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईविषयी नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून वेळेत प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नवी मुंबईमधील महत्वाच्या रोडमध्ये ठाणे बेलापूर रोडचाही समावेश होतो. या रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महापालिकेने रोडचे काँक्रेटीकरण केले आहे. शासनाने या रोडवर दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्ग बांधला आहे. परंतु अनेक वर्षांपासून सर्वाधीक वाहतूक कोंडी होत असलेल्या तुर्भे रेल्वे स्टेशन व तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडून रेल्वे स्टेशनकडे जावे लागत आहे. रस्ता ओलांडताना वारंवार अपघात होत आहे. १३ आॅक्टोबरला टँकरने धडक दिल्याने एक महिलेचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारचे अपघात येथे वारंवार होत आहेत. सकाळी व सायंकाळी या परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अर्धा तास व त्याहीपेक्षा जास्त वेळ येथे अडकून रहावे लागत आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी मागणी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी वारंवार केली आहे. महापे पुलाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर त्यांनाही याविषयी निवेदन देण्यात आले होते. एमएमआरडीए व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून पुढील कार्यवाही वेगाने करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु अद्याप उड्डाणपूल उभारण्यासाठी काहीही ठोस कार्यवाही झालेली नाही.महापे व घणसोलीप्रमाणे उड्डाणपूलाची उभारणी करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली आहे. परंतु प्रशासनाने येथे फक्त कार व पादचाऱ्यांसाठी छोटा पूल उभारण्याचा घाट घातला आहे. यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी जैसे थे स्थिती राहण्याची शक्यता आहे. यामुळे सुरेश कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्त, महापालिका यांना पत्र दिले आहे. या परिसरातील वाहतुकीचा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही तर २२ नोव्हेंबरला रास्ता रोखो करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.हजारो प्रवाशांचा जीव धोक्यातएमआयडीसीमध्ये जाणारे कामगार तुर्भे रेल्वे स्टेशनमध्ये उतरून तेथून शिरवणे ते महापे पर्यंतच्या कारखान्यात कामासाठी जात असतात. तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर, गणपतीपाडा येथील नागरीकही रेल्वेने मुंबई व ठाणेला जाण्यासाठी या रेल्वे स्टेशनचा उपयोग करत असतात. याठिकाणी रस्ता ओलांडून जाताना वारंवार अपघात होत आहेत. हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे स्टोअर्समध्ये उड्डाणपूलाची उभारणी केली पाहिजे. येथील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर रास्ता रोखो करण्यात येईल.- सुरेश कुलकर्णी, नगरसेवक 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई