शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महामार्गावरील पूल की मृत्यूचे दार? ठाणे-बेलापूर मार्गावर सतत घडताहेत अपघात, प्रशासन निद्रावस्थेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 15:07 IST

ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलांचे कठडे अपघातांना निमंत्रण देत आहेत.

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलांचे कठडे अपघातांना निमंत्रण देत आहेत. अनेक पुलांच्या सुरुवातीला सूचनाफलक नसल्याने अचानक दुभाजक समोर आल्याने चालकांचा गोंधळ उडून हे अपघात घडत आहेत. परंतु, सातत्याने अपघात होत असतानाही व वाहतूक पोलिसांनी सूचना करूनही महापालिका प्रशासन अपघात रोखण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर होणारे अपघात चिंतेची बाब ठरत आहेत. चालकांच्या चुकीमुळे अथवा रस्त्यावरील परिस्थितीमुळे ते घडत आहेत. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूदेखील झाला आहे. तर काही अपघातांमध्ये संबंधित वाहनचालकांसोबतच इतर वाहनांमधील प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.  सातत्याने घडणारे असे अपघात पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहेत. तर काही ठिकाणे मृत्यूचा सापळाच बनली आहेत.  बेलापूर, उरणफाटा, नेरूळ, कोपरखैरणे व घणसोली इथल्या पुलांचा समावेश आहे. 

पुलाच्या सुरुवातीला सूचनाफलक नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे पुलाच्या ठिकाणी फलक बसवण्याबाबत महापालिकेला कळवण्यात आले आहे. अद्याप ते बसवले नसल्याने पुन्हा स्मरणपत्र दिले जाईल. - बसीत अली सय्यद, वाहतूक पोलिस निरीक्षक, महापे

ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलावर गुरुवारी ट्रक उलटल्याने वाशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन तास वाहतूककोंडी झाली. 

सायन-पनवेल मार्गावरही अपघात :

सायन-पनवेल मार्गावर सानपाडा व वाशी येथील पुलाच्या सुरुवातीलादेखील दुभाजकाचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहेत. त्यापैकी वाशी येथील पुलाच्या सुरुवातीला असलेला काळोख व रस्त्यावरच पसरलेली खडी, समांतर रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात