शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील पूल की मृत्यूचे दार? ठाणे-बेलापूर मार्गावर सतत घडताहेत अपघात, प्रशासन निद्रावस्थेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 15:07 IST

ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलांचे कठडे अपघातांना निमंत्रण देत आहेत.

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलांचे कठडे अपघातांना निमंत्रण देत आहेत. अनेक पुलांच्या सुरुवातीला सूचनाफलक नसल्याने अचानक दुभाजक समोर आल्याने चालकांचा गोंधळ उडून हे अपघात घडत आहेत. परंतु, सातत्याने अपघात होत असतानाही व वाहतूक पोलिसांनी सूचना करूनही महापालिका प्रशासन अपघात रोखण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर होणारे अपघात चिंतेची बाब ठरत आहेत. चालकांच्या चुकीमुळे अथवा रस्त्यावरील परिस्थितीमुळे ते घडत आहेत. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूदेखील झाला आहे. तर काही अपघातांमध्ये संबंधित वाहनचालकांसोबतच इतर वाहनांमधील प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.  सातत्याने घडणारे असे अपघात पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहेत. तर काही ठिकाणे मृत्यूचा सापळाच बनली आहेत.  बेलापूर, उरणफाटा, नेरूळ, कोपरखैरणे व घणसोली इथल्या पुलांचा समावेश आहे. 

पुलाच्या सुरुवातीला सूचनाफलक नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे पुलाच्या ठिकाणी फलक बसवण्याबाबत महापालिकेला कळवण्यात आले आहे. अद्याप ते बसवले नसल्याने पुन्हा स्मरणपत्र दिले जाईल. - बसीत अली सय्यद, वाहतूक पोलिस निरीक्षक, महापे

ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलावर गुरुवारी ट्रक उलटल्याने वाशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन तास वाहतूककोंडी झाली. 

सायन-पनवेल मार्गावरही अपघात :

सायन-पनवेल मार्गावर सानपाडा व वाशी येथील पुलाच्या सुरुवातीलादेखील दुभाजकाचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहेत. त्यापैकी वाशी येथील पुलाच्या सुरुवातीला असलेला काळोख व रस्त्यावरच पसरलेली खडी, समांतर रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात