शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

रखडलेल्या पुलामुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:15 AM

नागरिकांची गैरसोय : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे बांधण्यात आलेल्या पादचारी पूलाचे काम अपूर्णावस्थेत आहे, यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे महामार्ग ओलांडताना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरील पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असून, यामुळे महामार्गावरील वाहनांचा वेगदेखील वाढला आहे. महामार्गाच्या रुंदीकरणा वेळी भुयारी आणि पादचारी मार्ग बनविण्यात आले आहेत; परंतु यामधील अनेक पादचारी आणि भुयारीमार्गांचा वापर होत नाही.

महामार्गावर सानपाडा येथे बांधण्या आलेला पादचारी पूल अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी महामार्ग ओलांडताना वाहनांच्या दिव्यांमुळे संभ्रम निर्माण होऊन अनेक अपघात घडले आहेत. मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पादचारी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.