शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नवी मुंबईतला अपघाताचा टक्का घसरला; राज्यात पटकावले तिसरे स्थान

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 16, 2024 17:07 IST

जनजागृतीसह रस्त्याच्या परिस्थितीत सुधार. 

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यात नवी मुंबईने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये १७.७ टक्के ने अपघातांचे प्रमाण घटले आहे. त्याबद्दल रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने नवी मुंबई वाहतूक पोलिस व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 

रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलिस यांच्याकडून वाहन चालकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामध्ये नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसह चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जाते. शिवाय अपघातांना कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती सुधारण्याचाही प्रयत्न केला जातो. त्यानुसार मागील काही वर्षात सातत्याने अपघात घडणाऱ्या ठिकाणांचा (ब्लॅक स्पॉट) अभ्यास करून तिथले अपघात कसे रोखता येतील याबाबत उपाय योजना राबवल्या जात होत्या.

यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखील अशा ठिकाणी आवश्यक कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे २०२२ च्या तुलनेत  २०२३ मध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण १७.७ टक्के ने घसरले आहे. हे प्रमाण राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे ठरले आहे. तर मुंबई शहर व उपनगर यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून चंद्रपूर जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल मुंबईत आयोजित कार्यक्रमात नवी मुंबई पोलिस वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अतिरिक्त पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघातRto officeआरटीओ ऑफीस