शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:25 IST

नालेसफाई अर्धवटच। आराखडा पुस्तिकाही नाही। धोकादायक ठिकाणी फलकही नाहीत

नामदेव मोरे नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये यावर्षी आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. ४० ते ५० मि.मी. पाऊस पडला तरी शहरात पाणी साचू लागले आहे. जुलै महिना संपत आल्यानंतरही अद्याप आपत्ती आरखड्याच्या पुस्तकांची छपाई झालेली नाही. दरड कोसळणाऱ्या व इतर अपघातजन्य ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले नसल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

२६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये मुंबईसह राज्यभर मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. यानंतर शासनाने सर्वच महानगरपालिकांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनविणे बंधनकारक केले आहे. तब्बल १३ वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन उत्तमप्रकारे केले होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांची बैठक बोलावून आराखडा तयार केला जात होता. शहर आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देणारी दोन पुस्तके तयार केली जात होती. यामधील पहिल्या पुस्तकामध्ये महापालिकेची संपूर्ण माहिती. आपत्ती उद्भवणारी ठिकाणे व उपाययोजनांविषयी तपशील देण्यात येतो. आराखडा २ मध्ये महानगरपालिकेचे सर्व विभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सिडको, रेल्वे, महावितरणसह सर्व शासकीय कार्यालयांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क नंबर, मोबाइल नंबर देण्यात येतात. आपत्ती उद्भवल्यास नागरिकांच्या राहण्याची सोय कुठे केली जाणार याचा तपशीलही त्यामध्ये देण्यात येत असून, मदत

करणाºया संस्थांची व त्यांच्या पदाधिकाºयांची नावे त्या पुस्तकामध्ये दिली जात होती. ही पुस्तके सर्व नगरसेवक, महत्त्वाचे पदाधिकारी व महापालिकेच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध केली जात होती, यामुळे कोणतीही आपत्ती उद्भवली की संबंधित विभागाशी संपर्क साधणे शक्य होत होते.

या वर्षी जुलै महिना संपत आल्यानंतरही अद्याप आपत्ती आराखड्याच्या पुस्तकांची छपाई झालेली नाही. महानगरपालिकेने वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन मुख्यालयातील व विभागस्तरावरील आपत्तीनियंत्रण कक्षाचे संपर्क नंबर दिले आहेत; परंतु शहरातील आवश्यक त्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. पावसाळापूर्वी नालेसफाईची कामेही व्यवस्थित झालेली नाहीत, यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहरात तब्बल ३३ ठिकाणी पाणी साचले. ५० पेक्षा जास्त वृक्ष कोसळले, शॉर्टसर्किटच्या घटनाही रोज घडत आहेत. विजेचा धक्का बसून एकाला जीव गमवावा लागला आहे. बोनसरी झोपडपट्टीमधील नागरिकांनी धोक्याची सूचना दिल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे १५ घरांमध्ये पाणी शिरले. याच परिसरामध्ये पाच झोपड्या वाहून गेल्या. या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले; परंतु अद्याप कोणावरही कडक कारवाई झालेली नाही.

पुराचे पाणी भरण्याची शक्यताप्रभाग ठिकाणेबेलापूर १वाशी, नेरुळ २तुर्भे, दिघा ३कोपरखैरणे १घणसोली २ऐरोली २

वाहतूक नियंत्रणाचा तपशीलविभाग संख्याराष्ट्रीय महामार्ग ०१महामार्गाची लांबी १५ किलोमीटरनद्या, नाल्यांवरील पूल १४एसटी व बस आगार ०९जेटी ०२रेल्वेस्टेशन ११रेल्वे पुलांची संख्या १२

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका