शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

नवी मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:25 IST

नालेसफाई अर्धवटच। आराखडा पुस्तिकाही नाही। धोकादायक ठिकाणी फलकही नाहीत

नामदेव मोरे नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये यावर्षी आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. ४० ते ५० मि.मी. पाऊस पडला तरी शहरात पाणी साचू लागले आहे. जुलै महिना संपत आल्यानंतरही अद्याप आपत्ती आरखड्याच्या पुस्तकांची छपाई झालेली नाही. दरड कोसळणाऱ्या व इतर अपघातजन्य ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले नसल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

२६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये मुंबईसह राज्यभर मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. यानंतर शासनाने सर्वच महानगरपालिकांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनविणे बंधनकारक केले आहे. तब्बल १३ वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन उत्तमप्रकारे केले होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांची बैठक बोलावून आराखडा तयार केला जात होता. शहर आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देणारी दोन पुस्तके तयार केली जात होती. यामधील पहिल्या पुस्तकामध्ये महापालिकेची संपूर्ण माहिती. आपत्ती उद्भवणारी ठिकाणे व उपाययोजनांविषयी तपशील देण्यात येतो. आराखडा २ मध्ये महानगरपालिकेचे सर्व विभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सिडको, रेल्वे, महावितरणसह सर्व शासकीय कार्यालयांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क नंबर, मोबाइल नंबर देण्यात येतात. आपत्ती उद्भवल्यास नागरिकांच्या राहण्याची सोय कुठे केली जाणार याचा तपशीलही त्यामध्ये देण्यात येत असून, मदत

करणाºया संस्थांची व त्यांच्या पदाधिकाºयांची नावे त्या पुस्तकामध्ये दिली जात होती. ही पुस्तके सर्व नगरसेवक, महत्त्वाचे पदाधिकारी व महापालिकेच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध केली जात होती, यामुळे कोणतीही आपत्ती उद्भवली की संबंधित विभागाशी संपर्क साधणे शक्य होत होते.

या वर्षी जुलै महिना संपत आल्यानंतरही अद्याप आपत्ती आराखड्याच्या पुस्तकांची छपाई झालेली नाही. महानगरपालिकेने वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन मुख्यालयातील व विभागस्तरावरील आपत्तीनियंत्रण कक्षाचे संपर्क नंबर दिले आहेत; परंतु शहरातील आवश्यक त्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. पावसाळापूर्वी नालेसफाईची कामेही व्यवस्थित झालेली नाहीत, यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहरात तब्बल ३३ ठिकाणी पाणी साचले. ५० पेक्षा जास्त वृक्ष कोसळले, शॉर्टसर्किटच्या घटनाही रोज घडत आहेत. विजेचा धक्का बसून एकाला जीव गमवावा लागला आहे. बोनसरी झोपडपट्टीमधील नागरिकांनी धोक्याची सूचना दिल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे १५ घरांमध्ये पाणी शिरले. याच परिसरामध्ये पाच झोपड्या वाहून गेल्या. या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले; परंतु अद्याप कोणावरही कडक कारवाई झालेली नाही.

पुराचे पाणी भरण्याची शक्यताप्रभाग ठिकाणेबेलापूर १वाशी, नेरुळ २तुर्भे, दिघा ३कोपरखैरणे १घणसोली २ऐरोली २

वाहतूक नियंत्रणाचा तपशीलविभाग संख्याराष्ट्रीय महामार्ग ०१महामार्गाची लांबी १५ किलोमीटरनद्या, नाल्यांवरील पूल १४एसटी व बस आगार ०९जेटी ०२रेल्वेस्टेशन ११रेल्वे पुलांची संख्या १२

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका