शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 03:22 IST

शहरात घनकचऱ्याची समस्या कायम : घंटागाडीचा मार्ग अद्याप ठरलेला नाही

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल महानगरपालिकेने कचरा उचलण्याची सेवा हाती घेतली आहे. याकरिता नवीन घंटागाड्यांसह इतर यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत, परंतु यात सूक्ष्म नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. तसेच घंटागाड्यांचे मार्गही अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात अनेक अडचणी जाणवत आहेत.

पनवेल महापालिकेने कोणतीही तयारी नसताना कचरा व्यवस्थापनाची आव्हानात्मक सेवा हस्तांतरित करून घेतली. त्यासाठी सिडकोने गेल्या दोन वर्षांपासून तगादा लावला होता. नोड कचरामुक्त करण्यास सिडकोला यश मिळाले नाही. मात्र पुढील वर्षात आपले संपूर्ण कार्यक्षेत्र कचरामुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. त्या अनुषंगाने दैनंदिन कचरा व्यवस्थापनासाठी साई गणेश इंटरप्रायझेस या खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा संकलन करून वाहतूक करण्याची जबाबदारी या ठेकेदारावर सोपविण्यात आली आहे. त्याबदल्यात संबंधित ठेकेदार कंपनीला प्रत्येक टन कचºयास ७७७ रुपये अदा केले जाणार आहेत. या कामासाठी महापालिका वाहने पुरविणार आहे. त्यानुसार सध्या काही नवीन वाहने महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. येत्या काळात आणखी वाहने येणार आहेत.

विशेष म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरही या कामात अनेक अडचणी येताना दिसत आहेत. विशेष करून कळंबोली नोडमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. कधी कधी दोन दोन दिवस कचरा उचलला जात नसल्याने नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणच्या सार्वजनिक कुंड्या कचºयाने भरून वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत.नियोजन आणि मार्ग ठरवाच्या संदर्भात नगरसेवक सतीश पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन यशस्वी करायचे असेल तर याकरिता सूूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. घंटागाडी किती वाजता कोणत्या सोसायटीसमोर जावून कचरा संकलित करेल.च्गाडी खराब झाल्यानंतर त्याला पर्याय व्यवस्था काय असेल. तसेच घंटागाडीचा मार्ग ठरविल्याशिवाय ते शक्य होणार नाही. असे झाले तर रहिवासी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाहीत. तसेच बीन्स भरून बाहेर कचरा वाहणार नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.कचरा उचलण्यासाठी नवीन घंटागाड्या महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने संबंधित संस्थेला सूचनाही करण्यात आल्या आहेत. लवकरच राहिलेल्या त्रुटी दूर करून कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरळीत केली जाईल.-डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त महापालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGarbage Disposal Issueकचरा प्रश्न