शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 03:22 IST

शहरात घनकचऱ्याची समस्या कायम : घंटागाडीचा मार्ग अद्याप ठरलेला नाही

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल महानगरपालिकेने कचरा उचलण्याची सेवा हाती घेतली आहे. याकरिता नवीन घंटागाड्यांसह इतर यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत, परंतु यात सूक्ष्म नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. तसेच घंटागाड्यांचे मार्गही अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात अनेक अडचणी जाणवत आहेत.

पनवेल महापालिकेने कोणतीही तयारी नसताना कचरा व्यवस्थापनाची आव्हानात्मक सेवा हस्तांतरित करून घेतली. त्यासाठी सिडकोने गेल्या दोन वर्षांपासून तगादा लावला होता. नोड कचरामुक्त करण्यास सिडकोला यश मिळाले नाही. मात्र पुढील वर्षात आपले संपूर्ण कार्यक्षेत्र कचरामुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. त्या अनुषंगाने दैनंदिन कचरा व्यवस्थापनासाठी साई गणेश इंटरप्रायझेस या खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा संकलन करून वाहतूक करण्याची जबाबदारी या ठेकेदारावर सोपविण्यात आली आहे. त्याबदल्यात संबंधित ठेकेदार कंपनीला प्रत्येक टन कचºयास ७७७ रुपये अदा केले जाणार आहेत. या कामासाठी महापालिका वाहने पुरविणार आहे. त्यानुसार सध्या काही नवीन वाहने महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. येत्या काळात आणखी वाहने येणार आहेत.

विशेष म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरही या कामात अनेक अडचणी येताना दिसत आहेत. विशेष करून कळंबोली नोडमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. कधी कधी दोन दोन दिवस कचरा उचलला जात नसल्याने नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणच्या सार्वजनिक कुंड्या कचºयाने भरून वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत.नियोजन आणि मार्ग ठरवाच्या संदर्भात नगरसेवक सतीश पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन यशस्वी करायचे असेल तर याकरिता सूूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. घंटागाडी किती वाजता कोणत्या सोसायटीसमोर जावून कचरा संकलित करेल.च्गाडी खराब झाल्यानंतर त्याला पर्याय व्यवस्था काय असेल. तसेच घंटागाडीचा मार्ग ठरविल्याशिवाय ते शक्य होणार नाही. असे झाले तर रहिवासी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाहीत. तसेच बीन्स भरून बाहेर कचरा वाहणार नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.कचरा उचलण्यासाठी नवीन घंटागाड्या महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने संबंधित संस्थेला सूचनाही करण्यात आल्या आहेत. लवकरच राहिलेल्या त्रुटी दूर करून कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरळीत केली जाईल.-डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त महापालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGarbage Disposal Issueकचरा प्रश्न