शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

माथाडींच्या १०० कोटींच्या ठेवींचा अपहार; सीबीआय चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 01:51 IST

राज्यात विविध ३६ मंडळाच्या अखत्यारित जवळपास ५० हजार माथाडी कामगार कार्यरत आहेत.

नवी मुंबई : माथाडी बोर्डांनी बँकांमध्ये ठेवलेल्या सुरक्षित ठेवी असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. चार बोर्डांचे भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटीसाठीच्या तब्बल १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर येऊ लागले असून, यामुळे माथाडींमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली असून, कामगारांच्या हितासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.कामगारांच्या पैशांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. राज्यात विविध ३६ मंडळाच्या अखत्यारित जवळपास ५० हजार माथाडी कामगार कार्यरत आहेत. कामगारांचे वेतन, भत्ते, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी व इतर व्यवहार या मंडळाच्या मार्फत केले जातात. हे सर्व पैसे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्यात येतात. दि रेल्वे एस्टॅब्लिशमेंट बोर्ड (रेल्वे बोर्ड), मुंबई लोखंड व पोलाद कामगार मंडळ (आयर्न बोर्ड), कापड बाजार आणि दुकाने मंडळ (कापड बोर्ड), धातू व कागद बाजार दुकाने मंडळ (मेटल बोर्ड) या चार बोर्डांनीही विविध बँकांमध्ये पैसे गुंतविले होते.संबंधित बँकांमधून जवळपास १०० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. यामध्ये रेल्वे बोर्डातून २२ कोटी, आयर्न बोर्डातील ३५ कोटी, कापड बोर्डातील पाच कोटी व मेटल बोर्डातील १८ कोटी रुपयांचा समावेश आहे. खोट्या सह्या करून हे पैसे हडप करण्यात आले आहेत. या घोटाळ्यामध्ये जे सहभागी आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी. माथाडी बोर्ड, बँक व्यवस्थापन व इतर जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.माथाडी कामगार दिवसभर कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत. ग्र्रोसरी बोर्ड ठरावीक कालावधीनंतर गुंतविलेल्या पैशांचा आढावा घेत असते. त्याच धर्तीवर इतर बोर्डांनीही आढावा घेतला पाहिजे. चार बोर्डाप्रमाणे इतर बोर्डांमध्येही पैशांचा अपहार झाला आहे का? याची चौकशी करण्यात यावी. बँकांमधून अशाप्रकारे पैसे जाणे ही गंभीर गोष्ट आहे. कामगारांचे सर्व पैसे परत मिळालेच पाहिजेत. याविषयी चर्चा करण्यासाठी बोर्डाचे अधिकारी व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली जाईल.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याविषयी निवेदन देण्यात येणार आहे. माथाडी बोर्डाप्रमाणे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, राज्यातील इतर शासकीय व निमशासकीय आस्थापनांनी बँकांमध्ये गुंतविलेल्या पैशांचा अशाप्रकारे अपहारझाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, यासाठी संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदारांना करणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.कामगारांमध्येही संभ्रमाचे वातावरणमाथाडी कामगार दिवसभर कष्ट करत असतात. त्यांच्या भविष्यासाठी ठेवलेल्या पैशाचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बोर्डामध्ये जाऊन विचारणा केल्यानंतरही योग्य माहिती दिली जात नसल्याने संभ्रम वाढत आहे. बोर्डाने कामगारांच्या पैशांच्या गुंतवणुकीची माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कामगारांच्या हिताला धक्का लागला तर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.घोटाळ्यात रॅकेट सक्रियबँकांमध्ये ठेवलेले पैसे बनावट सह्या करून परस्पर काढून घेणारे रॅकेट सक्रिय आहे. बाजार समिती, माथाडी बोर्ड व इतर आस्थापनांचे पैसेही परस्पर हडपल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय आहे. यामध्ये बँकेतील अधिकारीही सहभागी असतात. घोटाळ्यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असून, ते रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याची मागणीही माथाडी नेत्यांनी केली आहे.एक सदस्यीय बोर्डामुळे गोंधळमाथाडी बोर्डावर दहा वर्षांपासून एक सदस्यीय समिती आहे. बोर्डाच्या अध्यक्षांकडेच सर्व अधिकार एकवटले आहेत. कामगार प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आलेली नाही. कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहतात. एक सदस्यीय बोर्ड असल्याने कामकाज व्यवस्थित होत नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी निदर्शनास आणले.माथाडी कामगारांच्या कष्टाच्या पैशांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी कामगार आयुक्त व बोर्डाच्या प्रमुखांकडे पत्रव्यवहार केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणे आवश्यक आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, कामगारांचे पैसे पुन्हा मिळावे यासाठी पाठपुरावा करणार असून, वेळ पडल्यास आंदोलन केले जाईल.- शशिकांत शिंदे, माथाडी नेते

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदे