शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांच्या विळख्याने अखेर इर्शाळवाडी संपवली

By नामदेव मोरे | Updated: July 21, 2023 11:28 IST

गावात जाण्यासाठी रस्ता नाही : विजेची सोय नाही, प्राथमिक शिक्षणाचीही बोंब

नामदेव मोरेलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाला लागून असलेल्या डोंगरावरील या गावाला वर्षानुवर्षे समस्यांचा विळखा पडला होता. गावात जाण्यासाठी रस्ता नाही. वीज नाही, सौरऊर्जेच्या अपुऱ्या प्रकाशात कसेबसे जगावे लागत आहे. प्राथमिक शिक्षणाचीही सोय नसल्यामुळे पहिलीपासून मुलांना आश्रमशाळेचा आधार घ्यावा लागतो. महत्त्वाचे पर्यटनस्थळ असूनही येथील समस्यांकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. 

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर चौकजवळ मोरबे धरणाला लागून असलेला इर्शाळगड सर्वांचे लक्ष वेधून घेतो. घाटमाथ्यावरून कोकणात येणाऱ्या व्यापारी मार्गाची टेहळणी करण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. गडाच्या कुशीत जवळपास ४८ कुटुंबांचे व २२८ लोकसंख्या असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. घरेदारे गेली. पनवेलपासून जवळच असलेले हे आदिवासी गाव स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही समस्यांशी झुंज देत आहे. गावात जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही. ठाकूरवाडीत वाहने उभी करून पायवाटेने डोंगर चढून गावात जावे लागते. किराणापासून बांधकाम साहित्यही दोन तास डोंगर चढून वर घेऊन जावे लागते. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता असावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे केली; परंतु, त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. 

एखादी व्यक्ती आजारी पडली, तर त्यांना डोलीत बसवून खाली आणावे लागायचे. गावात वीजपुरवठाही नव्हता. ग्रामपंचायतीने सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याचा प्रयत्न केला; परंतु, सौरदिव्याचा प्रकाश पुरेसा नव्हता. पावसाळ्यात सौरदिवे बंद राहायचे. सौरदिव्यांच्या बॅटऱ्याही अनेक वेळा नादुरुस्त व्हायच्या.  रस्ता, वीज नसल्यामुळे गावात आरोग्य व इतर सुविधाही मिळत नव्हत्या. 

‘लोकमत’चा पाठपुरावाइर्शाळवाडीतील समस्यांवर ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठविला होता. गावात रस्ता, वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा मिळाव्या, यासाठी वेळोवेळी तेथील प्रश्न मांडले. गैरसोयींवरही प्रकाश टाकला होता.

ऐतिहासिक महत्त्वसरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव असलेल्या चौक गावाच्या समोरच इर्शाळगड उभा आहे.  विर्वाच्या आकाराचा गडाचा कडा मुंबई-पुणे महामार्गावर जाताना लक्ष वेधून घ्यायचा. व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. गडावर बांधकामे नाहीत. पण गडाचा सुळका राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. गडावरून प्रबळगड, माणिकगड, कर्नाळा, माथेरान असा परिसर दिसत असल्यामुळे पर्यटक वर्षभर इर्शाळगड पाहण्यासाठी यायचे. गडावरून मोरबे धरणाचा परिसरही पाहावयास मिळतो.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणRainपाऊस