शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग-नवी मुंबई जोडण्यासाठी ‘धरमतर’वर ८९८ कोटींचा सागरी पूल

By नारायण जाधव | Updated: October 22, 2022 18:20 IST

रस्ते विकास महामंडळ या पुलावर ८९७ कोटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे. रेवस आणि कारंजाला जोडणारा चार पदरी खाडी पूल बांधण्यासाठी महामंडळाने एप्रिल २०२२ मध्ये रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशनसाठी निविदा मागविल्या होत्या.

नवी मुंबई - पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागलानवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बहुचर्चित रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते उरणनजीकच्या करंजा बंदराला जोडणारा सागरी पूल बांधण्यासाठी अखेर निविदा मागविल्या आहेत.

रस्ते विकास महामंडळ या पुलावर ८९७ कोटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे. रेवस आणि कारंजाला जोडणारा चार पदरी खाडी पूल बांधण्यासाठी महामंडळाने एप्रिल २०२२ मध्ये रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशनसाठी निविदा मागविल्या होत्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा पूल बांधण्याची निविदा प्रक्रिया महामंडळाने १९ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू केली आहे. तो पूर्ण झाल्यावर प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची खूप बचत होणार आहे.

पावसाळ्यातील अडचण दूर होणार

सध्या रेवस-कारंजा प्रवासासाठी वाहनधारकांना ७० किमीचा प्रवास रस्त्याने करावा लागतो. यात दोन तासांचा अवधी लागतो, तर जलवाहतुकीसाठी दोन ठिकाणांदरम्यान १५ मिनिटे लागतात. मात्र, पावसाळ्यात फेरी सेवा बंद असल्याने प्रवास करणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे हा पूल महत्त्वाचा आहे.

पर्यटन बहरणार

रस्ते विकास मंडळाने ही अडचण लक्षात घेऊन अलिबागला थेट नवी मुंबई-मुंबईशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा रेवस ते करंजा हा पूल २ किमी लांबीचा असणार असून, त्याच्या दोन्ही बाजूला ३ किमी लांबीचे मार्ग असतील. शिवडी आणि रायगडमधील न्हावा-शेवाला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कार्यान्वित झाल्यानंतर, हा रेवस-कारंजा पूल अलिबाग आणि मुरुडसह कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांना खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

नवी मुंबई विमानतळ-जेएनपीटीला जोडणार

या पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटीला जोडले जाणार आहे. यात अलिबाग आणि नवी मुंबई व मुंबईचे अंतर कमी होऊन यात प्रवाशांचा वेळ, पैसा, श्रम याच्यासह प्रदूषण कमी होऊन इंधनाची बचत होणार आहे.

वन मंत्रालयाची परवानगी आवश्यक

प्रकल्पासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे. ती मिळाल्यावर काम सुरू होणे अपेक्षित असून, ते सुरू पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत दिली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :alibaugअलिबागNavi Mumbaiनवी मुंबई