शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

जमीन बळकावण्यासाठी सातबाराच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 08:13 IST

बोगस मृत्यू दाखल्याद्वारे स्वत: झाले वारस, ७ जणांवर गुन्हा

नवीन पनवेल : जमीन बळकावण्यासाठी खैरणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावे बोगस मृत्यू दाखला तयार करून सातबारा उताऱ्यावरून नाव कमी करून स्वतःला वारस बनवले. या फसवणूक प्रकरणी सात जणांविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाबू नारायण सिनारे हे सेवानिवृत्त असून, ते डोंबिवली येथे राहतात. त्यांचे वडील नारायण सिनारे यांचे निधन झाले असून, त्यांना गुणीबाई खंडू सिनारे ही बहीण होती. तिचे लग्न देवीचा पाडा येथे राहणारे हशा  फडके यांच्यासोबत झाले होते. कालांतराने हशा फडके हे मयत झाले व गुणीबाई सिनारे यांची सवत हीदेखील मयत झाली. त्यानंतर गुणीबाई सिनारे-फडके या त्यांच्यासोबत डोंबिवली येथे राहण्यास आल्या. २००० मध्ये त्याही मृत पावल्या. त्यावेळी त्यांनी १९९५ रोजी इच्छापत्र लिहून देऊन तिच्या सासरकडील प्रॉपर्टी हे तिच्या मृत्यूनंतर भावाचा मुलगा बाबू नारायण सिनारे यास देण्यात यावी, असे इच्छापत्र केले होते. हशा फडके यांची देवीचा पाडा येथे वडिलोपार्जित जमीन होती, मात्र गुणीबाई सिनारे-फडके यांच्या मृत्यूनंतर सासरच्या माणसांनी तिच्या हिश्शाची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे बाबू सिनारे यांना समजले.

ग्रामपंचायतीकडे नोंदच नाहीमृत्यू दाखल्याची माहिती खैरणे ग्रामपंचायतीकडून घेतली असता कार्यालयाकडून गुणीबाई नथू पाटील या नावाने कोणताही मृत्यू दाखला दिला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृत्यू दाखला हा बनावट असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी लागली वारसांची नावे?

२००९ ते २०१० दरम्यानचे गुणीबाई यांच्या नावावर असलेल्या जमिनीचे फेरफार उतारे काढले असता सात-बारा उतारावरून गुणीबाई सिनारे-फडके यांचे नाव कमी करून ठमूबाई रामा फडके, ताईबाई रामा फडके, महादेव रामा फडके, ज्ञानदेव रामा फडके, इंद्रा ऊर्फ इंदिरा रामा पाटील, मीना नाना पाटील, पुष्पा जयवंत भोईर यांनी त्यांची नावे वारस म्हणून लावल्याचे समोर आले.

 ही नावे वारस म्हणून कशी लागली याची माहिती अधिकाऱ्यांन्वये कागदपत्रे प्राप्त केली. यावेळी गुणीबाई नथू पाटील या नावाने खैरणे ग्रामपंचायतमधून प्राप्त केलेल्या मृत्यू दाखल्याचा वापर करून सात-बारावर त्यांची नावे लावल्याचे समोर आले. गुणीबाई यांचा मृत्यू डोंबिवली येथे झाल्याने मूळ मृत्यू दाखला बाबूराव सिनारे यांच्याकडे आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीpanvelपनवेल