शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

६ ग्रामपंचायती तंटामुक्त

By admin | Updated: February 15, 2015 00:25 IST

रोहा तालुक्यातील तंटामुक्त ठरलेल्या ६ ग्रामपंचायतींना रोहा पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रोहा : रोहा तालुक्यातील तंटामुक्त ठरलेल्या ६ ग्रामपंचायतींना रोहा पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये खैरेखुर्द, न्हावे, मालसई, पुई, तांबडी, चिंचवली तर्फे आतोणे यांचा समावेश आहे. या प्रसंगी बोलताना वाळीत प्रकरणांमध्ये अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे. प्रशासन गावकी प्रथेच्या विरोधात नाही परंतु गावकीतून वादविवाद होण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबविले जावेत, असे मत पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे, रोहा तहसिलदार उर्मिला पाटील उपस्थित होते. यावेळी धुमाळ म्हणाले की, रोहा तालुक्यातील जनतेने मागील निवडणुका व सणवार यामध्ये सामाजिक सलोखा व शांतता प्रस्थापित ठेवण्यात हातभार लावला आहे. कोकण रेल्वेच्या दुर्घटनेनंतर रोहा तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत अपघातग्रस्तांना केलेल्या मदतीची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन कौतूक करण्यात आले आहे. परंतू आपल्या तालुक्याला वाळीत प्रकरणांचा लागलेला डाग पुसून काढण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.या प्रसंगी पांडुरंग कोंड, संजय मांडलुस्कर, उत्तम नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक दिनेश कदम, एपीआय भागवत, महिला पोलीस उपनिरीक्षक निरभवणे, पालांडे यांच्यासह पोलीस स्टाफ व पारितोषिक प्राप्त गावातील नागरिक, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील अध्यक्ष, तंटामुक्त समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)च्रोहा तालुक्यातील गाव पोलीस पाटील या ंना पोलीस पाटील वह्यांचे वाटप करण्यात आले. पोलीस पाटील यांनी गावात येणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नोंद पुस्तिकेत घ्यावी. च्आपल्या गावामध्ये घडणाऱ्या लहान सहान घटना तसेच किरकोळ वाद याची देखील नोंद ठेवून संबंधित माहिती पोलीस ठाण्यापर्यंत पोहचवावी. च्माहितीचे आदान प्रदान झाल्यास गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात यश मिळू शकेल असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे पाटील यांनी व्यक्त केले.रोहा तालुका वाळीत मुक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत त्याचप्रमाणे जेथे स्वच्छता आणि शांतता असते तेथे लक्ष्मी नांदते. यामुळेच प्रत्येकाने तंटामुक्त गाव याबरोबरच आपला गाव स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत. - उर्मिला पाटील, रोहा तहलिदार.