शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

विद्यार्थ्यांच्या चिक्कीची रेल्वेत होते विक्री, पोषण आहारामध्ये ६ कोटींचा भ्रष्टाचार, राष्ट्रवादी नगरसेवकाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:41 IST

शालेय पोषण आहारामध्ये महिन्याला ५० लाख व वर्षाला ६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत आहे. पोषण आहारासाठीचे तांदूळ व इतर साहित्य दुसरीकडे विक्री केले जात आहे.

नवी मुंबई : शालेय पोषण आहारामध्ये महिन्याला ५० लाख व वर्षाला ६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत आहे. पोषण आहारासाठीचे तांदूळ व इतर साहित्य दुसरीकडे विक्री केले जात आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या चिक्कीची रेल्वेमध्ये विक्री होत असल्याचा सनसनाटी आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक देविदास हांडे पाटील यांनी केला आहे.माध्यमिक शाळांमधील ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांकरिता अन्नमित्र फाउंडेशनच्या वतीने मध्यान्ह भोजन पुरविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना देविदास हांडे पाटील यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या मध्यान्ह भोजनामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात पोषण आहारासाठीचा तांदूळ व डाळ व इतर साहित्य पुरविण्यात येत असते. शहरातील अनेक शाळांना भेटी दिल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना निश्चित केलेल्या प्रमाणाएवढा आहार दिला जात नाही. अनेक विद्यार्थी गैरहजर असतात. त्या विद्यार्थ्यांसाठीच्या साहित्याचे नक्की काय होते? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी अन्न का दिले जाते? याविषयी विचारणा केली असता विद्यार्थी कमी खात असल्यास त्यांना बळजबरीने देता येत नसल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थी आहार पूर्णपणे घेत नसतील व अनेक विद्यार्थी गैरहजर असतील तर उरलेले साहित्य जाते कोठे? याविषयी कोणालाही उत्तर देता येत नाही. वास्तविक शालेय पोषण आहाराचे साहित्य शाळांमध्ये घेताना त्यांची फक्त नोंद न घेता त्यांचे चित्रीकरण होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले.महापालिका शाळांमध्ये गेल्यानंतर भयंकर प्रकार निदर्शनास आला आहे. गैरव्यवहार होत असल्याची शंका निर्माण झाली आहे. प्रत्येक महिन्याला तब्बल ५० लाख रुपयांचा गैरव्यवहार सुरू असून वर्षाला हा आकडा ६ कोटी रुपयांवर गेला असल्याचा आरोपही हांडे पाटील यांनी केला आहे. शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांनाच दिला जातो की दुसरीकडे जातो, याची चौकशी झाली पहिजे. विद्यार्थ्यांना चिक्की दिली जाते; परंतु प्रत्यक्षात तिचे वाटप विद्यार्थ्यांना कमी व बाहेरच जास्त होत आहे. रेल्वेमध्ये ती चिक्की विकली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. येणाºया हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रश्नावर आवाज उठविण्याचे आवाहन अनेक आमदारांना केले असून आम्ही गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय शाळा क्रमांक ३८ व ७४च्या गैरसोयींविषयीही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेण्यात यावी व सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.इतिवृत्त मंजूर न होताच प्रस्ताव स्थायीमध्ये-माध्यमिक शाळांमधील ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांना अन्नमित्र फाउंडेशन मुंबई यांच्याकडून मध्यान्ह भोजन पुरविण्याचा ठराव सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. ९८ लाख रूपये खर्चाचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीमध्ये आला होता. वास्तविक गत महिन्याच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर न होताच, तो स्थायी समितीमध्ये आला असल्याचे शिवसेनेच्या नामदेव भगत यांनी निदर्शनास आणून दिले.इतिवृत्त मंजूर होईपर्यंत महासभेचे कामकाज नियमित होत नाही. अशा स्थितीमध्ये हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्यास सदस्य अडचणीत येतील, असे मत व्यक्त केले. याविषयी विचारणा केली असता सचिवांनी, अशाप्रकारे प्रस्ताव येत असतात, असे सांगताच त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जर कोणी यापूर्वी अशाप्रकारचे प्रस्ताव आणले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही सुचविले. अखेर इतिवृत्त मंजुरीशिवाय कामकाज नियमित होत नाही, हे प्रशासनाने मान्य केले व इतिवृत्त मंजुरीच्या अधिन राहून मध्यान्ह भोजनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारNavi Mumbaiनवी मुंबई