शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नवी मुंबई पालिका उतरविणार ५०० कोटींच्या वास्तूंचा विमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 05:53 IST

नवी मुंबई महापालिकेने आता आपल्या ग्रीन बिल्डिंग म्हणून देशभरात ख्याती प्राप्त केलेल्या बेलापूर येथील मुख्यालयासह वाशी येथील विष्णुदास नाट्यगृह आणि ऐरोली येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

- नारायण जाधवठाणे : नवी मुंबई महापालिकेने आता आपल्या ग्रीन बिल्डिंग म्हणून देशभरात ख्याती प्राप्त केलेल्या बेलापूर येथील मुख्यालयासह वाशी येथील विष्णुदास नाट्यगृह आणि ऐरोली येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.या तिन्ही वास्तूंची किंमत जागेसह ४५० ते ५०० कोटींवर आहे. यासाठी इच्छुक कंपन्यांकडून त्या कमीतकमी हप्त्यात जास्तीतजास्त किती नुकसानभरपाई देतात, यासाठी देकार मागवले आहेत.नवी मुंबई महापालिका क्षेत्रात या तिन्ही वास्तू त्यांच्या स्थापत्य आणि वास्तुसंरचनेमुळे आकर्षण ठरल्या आहेत. वर्षभरातून हजारो नागरिक त्यांना भेटी देतात, यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या आदेशानुसार प्रशासनाने त्यांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापालिकेचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी लोकमतला सांगितले.संभाव्य अपघात झाल्यास नुकसानभरपाई मिळून त्यातून झालेले नुकसान भरून काढणे, हाच उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने अर्थसंकल्पात केलेल्या एक कोटीच्या तरतुदीतून या विम्याचा हप्ता भरला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या गोष्टींचा काढणार विमाइच्छुक विमा कंपन्यांकडून महापालिकेने चार धोक्यांचा विचार करून प्रस्ताव मागवले आहेत. यात पहिला धोका म्हणजे आग, स्फोट, वादळ, पूर, भूकंप या नैसर्गिक आपत्तींचा समावेश आहे. दुसऱ्या धोक्यात सध्याच्या जगभरातील दहशतवादी हल्ले पाहता बॉम्बस्फोटांचा धोका लक्षात घेऊन प्रस्ताव मागवला आहे. कारण, यापूर्वी विष्णुदास भावे नाट्यगृहात हिंदुत्ववादी संघटनांनी एकदा स्फोट घडवला आहे.तिसरा धोका गॅसपाइपलाइनचा स्फोट, लिकेजसह शॉर्टसर्किटमुळे लागणाºया आगीचा आहे, तर चौथा धोका म्हणून प्रशासनाने दहशतवादी संघटना किंवा अपघात म्हणून वाहन किंवा विमानाची टक्कर या वास्तूंना बसल्यास होणाºया नुकसानीची भरपाई म्हणून विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारी विमा कंपन्यांना प्राधान्यविम्यासाठी सरकारी कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, जास्तीतजास्त नुकसानभरपाई द्यायला हवी, तसेच यात एजंटला थारा नसणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई