शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

नवी मुंबई पालिका उतरविणार ५०० कोटींच्या वास्तूंचा विमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 05:53 IST

नवी मुंबई महापालिकेने आता आपल्या ग्रीन बिल्डिंग म्हणून देशभरात ख्याती प्राप्त केलेल्या बेलापूर येथील मुख्यालयासह वाशी येथील विष्णुदास नाट्यगृह आणि ऐरोली येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

- नारायण जाधवठाणे : नवी मुंबई महापालिकेने आता आपल्या ग्रीन बिल्डिंग म्हणून देशभरात ख्याती प्राप्त केलेल्या बेलापूर येथील मुख्यालयासह वाशी येथील विष्णुदास नाट्यगृह आणि ऐरोली येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.या तिन्ही वास्तूंची किंमत जागेसह ४५० ते ५०० कोटींवर आहे. यासाठी इच्छुक कंपन्यांकडून त्या कमीतकमी हप्त्यात जास्तीतजास्त किती नुकसानभरपाई देतात, यासाठी देकार मागवले आहेत.नवी मुंबई महापालिका क्षेत्रात या तिन्ही वास्तू त्यांच्या स्थापत्य आणि वास्तुसंरचनेमुळे आकर्षण ठरल्या आहेत. वर्षभरातून हजारो नागरिक त्यांना भेटी देतात, यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या आदेशानुसार प्रशासनाने त्यांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापालिकेचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी लोकमतला सांगितले.संभाव्य अपघात झाल्यास नुकसानभरपाई मिळून त्यातून झालेले नुकसान भरून काढणे, हाच उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने अर्थसंकल्पात केलेल्या एक कोटीच्या तरतुदीतून या विम्याचा हप्ता भरला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या गोष्टींचा काढणार विमाइच्छुक विमा कंपन्यांकडून महापालिकेने चार धोक्यांचा विचार करून प्रस्ताव मागवले आहेत. यात पहिला धोका म्हणजे आग, स्फोट, वादळ, पूर, भूकंप या नैसर्गिक आपत्तींचा समावेश आहे. दुसऱ्या धोक्यात सध्याच्या जगभरातील दहशतवादी हल्ले पाहता बॉम्बस्फोटांचा धोका लक्षात घेऊन प्रस्ताव मागवला आहे. कारण, यापूर्वी विष्णुदास भावे नाट्यगृहात हिंदुत्ववादी संघटनांनी एकदा स्फोट घडवला आहे.तिसरा धोका गॅसपाइपलाइनचा स्फोट, लिकेजसह शॉर्टसर्किटमुळे लागणाºया आगीचा आहे, तर चौथा धोका म्हणून प्रशासनाने दहशतवादी संघटना किंवा अपघात म्हणून वाहन किंवा विमानाची टक्कर या वास्तूंना बसल्यास होणाºया नुकसानीची भरपाई म्हणून विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारी विमा कंपन्यांना प्राधान्यविम्यासाठी सरकारी कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, जास्तीतजास्त नुकसानभरपाई द्यायला हवी, तसेच यात एजंटला थारा नसणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई